शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बेरोजगारांची फॅक्टरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:22 IST

जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडतात किंवा टीव्हीवर क्रिकेटच्या मायाजालात अडकून पडतात.

जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडतात किंवा टीव्हीवर क्रिकेटच्या मायाजालात अडकून पडतात. स्पर्धेचे जग, खासगी कंपन्यांमधील अस्थिर वातावरण आणि लहानपणापासून मनावर बिंबविले गेलेले सरकारी नोकरीचे महत्त्व यामुळे अख्ख्या पिढ्या आपला उमेदीचा काळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीत घालवितात. त्यांच्या हाती काय पडते, हे सध्या राज्यभरात निघणाºया विद्यार्थ्यांच्या मोर्चांनी दाखवून दिले आहे. शेतावर पोट भरत नाही आणि किमान पोट भरेल, एवढ्या पैशांची नोकरी कुठेच मिळत नाही. हीच या तरुणांची मुख्य अडचण आहे. कॉलेजेस वाढले. स्पर्धा वाढली. एकट्या मराठवाड्यात ३० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि ७५ तंत्रनिकेतन संस्था आहेत. वर्षाला सहा हजार पदवीधारक आणि १६ हजार पदविकाधारक अभियंते बाहेर पडतात. काय होते त्यांचे? पाच-सहा हजारांची नोकरी मिळाली तरी बेहतर. काय करायचे या पदव्यांचे? बेरोजगारांची फॅक्टरी बनलेल्या या महाविद्यालयांचे? २०१४-१५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशभरातील बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. २०१५-१६ साली तो वाढून ५ टक्क्यांवर आला. २०१४ ची निवडणूक लढविताना मोदी सरकारने दरवर्षी एक कोटी रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले. एका खासगी सर्वेक्षणानुसार, २०१४ नंतर तीन वर्षांत केवळ १५ लाख रोजगार निर्मिती झाली. याउलट २०१४ च्या आधी तीन वर्षांत २५ लाख रोजगार निर्मिती झाली. १ मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार देशभरात शासकीय नोकºयांमधील ४ लाख १२ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. या लोकसेवा आयोगाला वेळेचे काही देणेघेणेच राहिले नाही. जागांची जाहिरात काढायची पहिल्या वर्षी. परीक्षा घ्यायची दुसºया वर्षी. निकाल तिसºया वर्षी. पुढे एखादा कोर्टात जातो आणि पूर्ण प्रक्रियेवरच स्थगिती मिळवितो किंवा निकाल लागूनही आॅर्डर हाती पडत नाही. जुन्या जागा भरल्या जात नाहीत आणि नव्या निघत नाहीत. कुणी म्हणेल, ‘नोकरीच कशाला हवी? धंदापाणी करावा. मोक्याच्या ठिकाणी साधे पकोडे विकले तरी भरपूर कमाई होईल तरुणांची.’ मग पकोडेच विकायचे असतील, तर शिक्षणावर लाखोंचा खर्च करायचा कशासाठी?

टॅग्स :Indiaभारत