शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमने-सामने: राजकारणातील घराणेशाही संपणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 05:56 IST

राजकारणात घराणेशाही संपणार का, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

शब्दांकन : दीपक भातुसे

पंतप्रधानांनी घराणेशाहीचा उल्लेख करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांवर टीका केलेली आहे. नरेंद्र मोदी यांना माझा साधा प्रश्न आहे. भाजपमध्ये जे संरक्षणमंत्री आहेत राजनाथसिंह त्यांचा मुलगा पंकज सिंह हा नोएडातून भाजपचा आमदार आहे. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री पी. के. धुमल यांचा मुलगा अनुराग ठाकूर हे मंत्री आहेत. उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह भाजपचा खासदार हाेता. कल्याण सिंह यांचा नातू संदीप सिंह उत्तर प्रदेशमध्ये मंत्री आहे. मनेका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी सुलतानपूरमधून भाजपचा खासदार आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत झालावाडमधून भाजपचा खासदार आहे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचा मुलगा अभिषेक सिंह राजकारणात आहे. ही महाराष्ट्रबाहेरची उदाहरणे झाली. महाराष्ट्रात सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस मंत्री होत्या, त्यांचे वडील गंगाधर फडणवीस आमदार होते. कदाचित भविष्यात त्यांची मुलगी पण राजकारणात येईल. गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही मुली राजकारणात आहेत. दिवंगत प्रमोद महाजन यांची मुलगी खासदार आहे. म्हणजे राजकारणात जर एखाद्या व्यक्तीचा मुलगा चांगले काम करत असेल आणि जनतेने त्याला स्वीकारले तर ही घराणेशाही असू शकत नाही. अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी 

मुळात भाजपमध्ये अंतर्गत घराणेशाही कुठे आहे? मुद्दा काय आहे, घराणेशाहीवरच जे पक्ष चालत आहेत त्याबाबतचा. मुलायमसिंह यादव त्यांचा मुलगा अखिलेश यादव, नेहरूंची मुलगी, त्यांचा मुलगा, मग राजीव गांधींचा मुलगा हा घराणेशाहीचा मुद्दा आहे. याचा अर्थ असा नव्हे, की एखादा व्यक्ती राजकारणात असेल तर त्याच्या मुलीने किंवा मुलाने राजकारणात यायचेच नाही. त्यावर बंदी नसते. त्यामुळे भाजप नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचे कोण नातेवाईक पक्ष चालवणार, असा पक्ष चालत नाही. मेरिटवर, कर्तृत्वावर, चारित्र्यावर माणसाचे मोठेपण मोजले जाते आणि त्याला त्या उच्च पदावर जाता येते. काँग्रेसमध्ये असे आहे का?, आज. आदित्य ठाकरे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर पहिल्या रांगेत बसतो, हे कसे काय? भाजपमध्ये असे नाही. एखाद्या नेत्याचा मुलगा आमदार झाला तर तो पहिल्या दिवशी पहिल्या रांगेत बसत नाही. अगदी महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे म्हटले तर २०१४ साली रावसाहेब दानवेंचा मुलगा आमदार झाला, पण त्याला आम्ही पहिल्या रांगेत नाही बसवले, तो मागच्या रांगेतच बसला. जे लोक पहिल्यांदा आमदार झाले होते, त्यांना मागच्या रांगेतच बसवले होते, नंतर जशी ज्येष्ठता वाढत गेली तसे त्यांना पुढच्या रांगेत आणले. घराणेशाहीची कल्पना घराणेशाहीच्या आधारावर पक्ष चालतात त्याला घराणेशाही म्हटले जाते. अतुल भातखळकर, आमदार, भाजप

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीAtul Bhatkalkarअतुल भातखळकर