शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कैगा औष्णिक प्रकल्पाचा विस्तार पश्चिम घाटांच्या अस्तित्वासाठी धोक्याचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 21:53 IST

पश्चिम घाटांची परिस्थिती नाजूक होऊन मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आलेले असतानाच (केरळमधील पूर परिस्थितीचे एक महत्त्वाचे कारण!) कैगा अणू प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा विचार वेगाने सुरू झाला आहे. उद्या १४ डिसेंबरला त्यासंदर्भात जनसुनावणी होऊ घातली आहे.

- राजू नायक

पश्चिम घाटांची परिस्थिती नाजूक होऊन मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आलेले असतानाच (केरळमधील पूर परिस्थितीचे एक महत्त्वाचे कारण!) कैगा अणू प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा विचार वेगाने सुरू झाला आहे. उद्या १४ डिसेंबरला त्यासंदर्भात जनसुनावणी होऊ घातली आहे.

उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोव्याच्या सीमेवरील कारवार येथे कैगा अणू प्रकल्प उभारला गेला असून त्याची क्षमता कैक पटींनी वाढविण्याचा हा प्रस्ताव आहे. केंद्राने मे २०१७ मध्ये त्यासाठी मंजुरी दिली असून पीएचडब्ल्यूआर पद्धतीचे दोन दबावयुक्त हेवी वॉटर रिअॅक्टर तेथे उभारले जाणार आहेत.

या प्रकरणात पर्यावरणवाद्यांनी ज्या पश्चिम घाट पठारावर हे विस्तारीकरण होणार आहे, त्याचे संवेदनशील स्वरूप उपस्थित केले आहे. पश्चिम किना-यावरचा घनदाट जंगलाने वेढलेला हा टापू असून त्याचा जागतिक वारसास्थळांच्या पर्यावरणीय यादीत युनेस्कोने समावेश केला आहे. असंख्य दुर्मिळ प्रजातींचे ते माहेर आहे. दक्षिण भारतासाठी हा परिसर व त्याचे पर्यावरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २० वर्षापूर्वी कैगा प्रकल्पाची उभारणी चालली होती, त्यावेळी कर्नाटक व गोव्यातील पर्यावरणवाद्यांनी धोक्याचा इशारा दिला होता. त्यांच्या मते औष्णिक ऊर्जा प्रकल्प हे कधीच सुरक्षित नसतात व त्याचा परिणाम गोव्यापर्यंत जाणवू शकतो. शिवाय नवीन रिअॅक्टर उभारण्यासाठी सध्याची ४०० केव्ही रेटिंगची चार पदरी ट्रान्समिशन लाइन उपयोगाची नाही. १०० केव्हीची ७५ मीटर लांबीची नवी लाइन त्यासाठी टाकावी लागणार आहे. त्यासाठीही जंगल कापावे लागणार आहे. ज्यावेळी जगभर वातावरण बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी जंगलांचे रक्षण करण्याची हाक दिली गेली आहे, तेव्हा तर या जंगल क्षेत्राचे रक्षण करण्याची मोठीच जबाबदारी देशावर आहे. शिवाय दोन रिअॅक्टर कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारी वीज फारशी गरज भागवू शकणार नाही असे तज्ज्ञ मानतात.

आपण नेहमी ‘विकासा’चा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा पर्यावरण व मानवी सुरक्षेला फारसे प्राधान्य देत नाही. विकास हा मानवी क्षमता वाढविणारा असावा. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाबद्दल जेव्हा जगभर संशय व्यक्त होतो व त्याच्या सुरक्षिततेसंदर्भात भारतात शंकाच जादा उपस्थित केल्या जातात, तेव्हा तर कैगा प्रकल्पाच्या या विस्तारीकरणाची खरीच गरज आहे का, या प्रश्नाचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.

(लेखक गोवा लोकमत आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवा