शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

आयुषसाठी एक्झिट टेस्ट ही बदलाची नांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 01:01 IST

नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसिन बिल २०१८’ला मान्यता दिली आहे.

- डॉ. अमोल अन्नदाते (आयुर्वेद महाविद्यालय अध्यक्ष)नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसिन बिल २०१८’ला मान्यता दिली आहे. येणाऱ्या काळात आयुष ग्रॅज्युएट्स प्रवेश परीक्षेबरोबरच एक्झिट टेस्ट म्हणजेच आपले ज्ञान व कौशल्य सिद्ध करण्यासाठी अजून एक परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर, अध्यापकांसाठीही मानक तयार करण्यात येणार आहेत. ज्या आयुष डॉक्टरांना शिक्षण संपल्यावर अध्यापनात जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी नेट-सेटप्रमाणे ही परीक्षा असणार आहे.खरे तर आयुष शिक्षणाचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांनी २१, २२ जानेवारी रोजी देशातील सर्व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन व अध्यापकांची परिषद बोलावली आहे. याचा हेतू हाच आहे की, ज्याप्रमाणे एक्झिट टेस्ट ही आयुष शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नेमक्या समस्या काय आहेत, हे शिक्षक, व्यवस्थापनाकडूनही जाणून घेणे आवश्यक आहे. एक्झिटविषयी अजून एक परीक्षा म्हणून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असणे साहजिक आहे, पण आज शासनाच्या आयुष शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नेमके काय करावे, हा शासनापुढे अनेक वर्षांपासून यक्षप्रश्न कायम आहे. आयुष महाविद्यालयांमध्ये अर्धवेळ व पूर्णवेळ शिक्षकांचा तुटवडा हा प्रश्न आधी होता. आता काही ठिकाणी शाळांप्रमाणे विद्यार्थी हे फक्त नावाला असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कसून तपासणी हा चांगला मार्ग असू शकतो, म्हणून एक्झिट परीक्षेला पर्याय नाही.खरे तर सध्याची आयुष कौन्सिल ही अनेक मार्गांनी आयुष शिक्षणाचे नियमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता नवे नॅशनल कमिशनही येईल, पण आयुष शिक्षणाचा स्तर वाढविण्याचा प्रश्न फक्त नियमन करणाºया शासकीय संस्थांच्या माध्यमातून सुटणार नाही. यासाठी अध्यापक, कॉलेज चालविणारे व्यवस्थापन व समाज म्हणजेच विद्यार्थ्यांचे पालक यांचा यात मोठा व सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आज समाजात आयुष डॉक्टर कमी बाहेर पडतात असे नाही, पण त्यातून किती जण त्यांच्या पॅथीची प्रॅक्टिस करतात. बरेच विद्यार्थी हे केवळ आयुषच्या डिग्रीचे कुंकू कपाळी लावून अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, हे का होते, यावर सखोल अभ्यास व्हायला हवा.हे विचार रुजण्यास मुलाच्या पहिल्या वर्षाच्या मानसिकतेपासून सुरुवात होते. जर मुलांवर पहिल्या वर्षापासून आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी, सिद्ध यांचे शुद्ध संस्कार झाले, तर नक्कीच महाविद्यालयीन शिक्षणातच त्यांच्या मनात स्वत:च्या शिक्षणाची अस्मिता जागृत होईल. यासाठी आयुष कॉलेज व्यवस्थापनाची जबाबदारी खूप मोठी आहे. मी स्वत: आयुर्वेद महाविद्यालय चालवितो व अत्यंत जबाबदारीने सांगतो की, महाविद्यालयात आयुर्वेदाचे वातावरण असण्यासाठी पैशाची गरज नसते. त्यासाठी मानसिकतेची व मुलांना स्वत:च्या पॅथीबद्दल प्रेम आणि जिद्द निर्माण करणारे शिक्षक हवे असतात.म्हणूनच विद्यार्थी, महाविद्यालयांनी एक्झिट टेस्टला मुळीच घाबरू नये, तसेच नवे कमिशन आले, तर जास्त गुंता व नियम न वाढविता, आयुष शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले सीसीआयएम, विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापन या सर्वांच्या समस्या लक्षात घेऊन, त्यांना एका ध्येयात कसे बांधता येईल हे पाहावे.

टॅग्स :Healthआरोग्य