शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

सबकुछ मुंबई

By admin | Updated: May 23, 2017 06:55 IST

रविवारी रात्री अत्यंत थरारक सामन्यात अवघ्या एका धावेने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला नमवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल चषक पटकावला.

रविवारी रात्री अत्यंत थरारक सामन्यात अवघ्या एका धावेने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला नमवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल चषक पटकावला. विशेष म्हणजे यासह मुंबईने तीनवेळा आयपीएल ट्रॉफी पटकावणारा पहिला संघ असे बिरुदही मिळवले. त्याचप्रमाणे, पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या पुणेकरांनीही यावेळी क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. दखल घेण्याची बाब म्हणजे दोन्ही संघांनी सुरुवातीचा आणि शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळूनच यंदाच्या सत्राची सांगता केली. त्यात, हे दोन्ही संघ यंदा तब्बल चार वेळा भिडले. त्यामुळे यंदा स्पर्धेवर एकप्रकारे महाराष्ट्राची छाप पडली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मुंबईने सलामीचा सामना पुण्याविरुद्ध गमावल्यानंतर जबरदस्त सातत्य राखताना सलग सहा सामने जिंकून प्रतिस्पर्धी संघांना एकप्रकारे इशाराच दिला. यानंतर पुन्हा त्यांचा पराभव झाला तो पुण्याविरुद्धच. मात्र, यानंतर पुन्हा मुंबईकरांनी सलग तीन सामने जिंकत बाद फेरी निश्चित केली. अखेरचा साखळी सामना होईपर्यंत केवळ मुंबईनेच प्ले आॅफमधील स्थान निश्चित केले होते. तरी, पुण्याविरुद्धचे अपयश मात्र त्यांना सलत होते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा पुण्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर एलिमिनेटर खेळावे लागलेल्या मुंबईने कोलकाताला चांगलाच दणका देत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र गेल्या तिन्ही पराभवाचे हिशेब चुकते करताना मुंबईने पुण्याला एका धावेने नमवून ट्रॉफी पटकावली. रोहित शर्माचे कल्पक नेतृत्वही लक्षवेधी ठरले. एकीकडे भारताचा कर्णधार विराट कोहली अपयशी ठरत असताना दुसरीकडे रोहितने शानदार नेतृत्व करून संघाला अव्वलस्थानी नेले. फिक्सिंगमुळे दोन वर्षांच्या बंदीला सामोरे गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्याऐवजी गुजरात लायन्स आणि पुणे संघ खेळले. आता पुढील वर्षी चेन्नई - राजस्थान यांचे पुनरागमन होणार असल्याने गुजरात - पुणे यांना कदाचित बाहेर व्हावे लागेल. मात्र या दोन्ही संघांनी चांगली छाप पाडली. गेल्यावर्षी गुजरात गुणतालिकेत अव्वल राहिले, तर यंदा पुणे उपविजेते ठरले. टी-२० क्रिकेट सुरुवातीला गोलंदाजांचा कर्दनकाळ समजले जात होते. परंतु, यंदाचा आयपीएल मुंबईने गोलंदाजांच्याच जिवावर जिंकला. टी-२०च्या निमित्ताने गोलंदाज अनेक प्रयोग करू लागले. यामुळे फलंदाजांची कसोटीही लागली.