शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

सब कुछ मराठवाडा

By admin | Updated: January 9, 2015 23:34 IST

पुढच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही नांदेडच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री विदर्भातून आलेले असले तरी, पक्षसंघटनेची सूत्रे मराठवाड्याच्या वाट्यालाच असतील.

महाराष्ट्राच्या राजकारणाची सारीच सूत्रे दिल्लीतून कसली जात असली तरी, त्याचे केंद्र आता मराठवाडा होते आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर औरंगाबादच्या, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालन्याचे आणि कदाचित पुढच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही नांदेडच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री विदर्भातून आलेले असले तरी, पक्षसंघटनेची सूत्रे मराठवाड्याच्या वाट्यालाच असतील.भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सासुरवाडीतील चंद्रकांतदादा पाटील यांची नेमणूक प्रदेशाध्यक्षपदावर होईल असे चित्र होते. फडणवीस सरकारात ते मंत्री झाले, आणि मोदी सरकारात राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब पाटील दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदाचा मुकूट घातला गेला. धोनीसारखे खेळून फडणवीस यांनी राज्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष केला, तो क्रमांक टिकवण्याची जबाबदारी दानवेंची आहे. त्यांची इनिंग आता सुरू झाली. सत्ता व संघटनेतील संघर्षही दिसून येईल. मराठवाड्यातीलच पक्षसंघर्ष मोडताना त्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे. ‘अब की बार’ म्हणत हे सरकार सत्तेत आले आहे, त्याने डुबकी घेऊ नये यासाठी दानवेंना रक्ताचे पाणी करावे लागेल. दानवेंचे चिरंजीव संतोष व जावई हर्षवर्धन जाधव दोघेही आमदार आहेत. या दोघांचीही वर्षभरातील प्रगतीपुस्तके पाहता दानवेंना पहिल्यांदा त्यांनाच आवरावे लागेल, असे भाजपातीलच ज्येष्ठांना वाटते. म्हणजे पक्ष मजबुतीची खरी सुरुवात घरातूनच करावी लागेल. छोट्याही निवडणुका भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांच्या ४० मिनिटांच्या चर्चेत सांगण्यात आल्याने त्यांनी पालघर, ठाणे व नंतर औरंगाबाद येथील निवडणुकींचेही वर्णन आव्हान म्हणून केले. मुंडे यांचे शागीर्द आहोत असे ते सांगतात, पण पक्षीय वजाबाकीत सहकारातील हसरा गडी असलेल्या दानवेंनी शहा यांची मर्जी संपादित केली. पंधरा वर्षे खासदार असलेले ते यापूर्वी दोनवेळा प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मुंडे- गडकरींच्या चढाओढीत त्यांना नेमका मार्ग सापडत नव्हता. तो शहा यांनी मिळवून दिला. केंद्रातील मंत्र्यांना राज्यात मुख्यमंत्रिपदावर पाठविण्याचा इतिहास आहे. पण दानवेंबाबत जरा वेगळेच घडले. दोनवेळा प्रदेशाध्यक्षपद हातून गेल्याने सहा महिन्यांपूर्वी पूर्ण बहुमत असलेल्या मोदी सरकारात राज्यमंत्री झाल्याने निम्मे जग जिंकल्याचेच त्यांना वाटू लागले. खरे तर, असे वाटणारे केवळ दानवे हेच एकमेव मंत्री नव्हते. बहुतेक मंत्री हुरळून गेल्याचेच दिसून आले. प्रत्यक्षात १०० दिवसांची प्रगती मांडताना उन्हाच्या झळा व सहा महिन्यांच्या कामकाजाचे ई-बुक देताना कमालीचा गारठा सुरू झाल्याने मंत्रिपदाची खुर्ची काट्याची वाटू लागली. म्हणूनच की काय दिलखूश, अघळपघळ आणि कुणालाही आपलेसे करण्याचा वकूब असलेल्या दानवेंचे सूर ‘मोदी कार्पोरेट’शी नाहीच जुळू शकले! त्यांनी मंत्रिपदाची मिजास कधीच मिरवली नाही. संसद अधिवेशनाच्या काळात त्यांच्या वाहनचालकाचा मोबाइल बंद पडला. त्याच्याशी संपर्क होत नव्हता. तेव्हा मंत्री असलेले दानवे एकटे चालत मंत्रालयात निघाले. त्यांच्या साधेपणाचे असे अनेक किस्से आहेत. पण दिल्लीचे बदललेले पक्षीय राजकारण व मोदी शिस्तीत दानवेंसारखा माणूस नक्कीच हिरमुसला असावा ! त्यांनी पक्षाकडे संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत पारदर्शीपणाने आपल्यातील उणिवांची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली. जमत नसतानाही मला मंत्री करा, असे सांगणाऱ्यांची फौज किंवा राज्यसभा मागणाऱ्यांची लाखभर नावांची यादी पक्षाकडे असताना दानवेंनी मंत्रिपदावर पाणी सोडले. नक्कीच त्यांचीही वेगळी गणिते असतील. पण सध्याच्या राजकारणात यशाचा एक्का असलेल्या मोदी सरकारातून बाहेर पडण्यासाठी मनाचा हिय्या करावा लागतो. अनेक मंत्र्यांवर मोदी नाराज आहेत, तर काही मंत्री मोदींवर ! पण बोलायची सोय नाही, आणि स्थिर सरकार सोडण्याची कुणाचीच तयारीही नाही. ती ‘दानत’ दानवे यांनी दाखविली. रघुनाथ पांडे