शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पाकिस्तानातले कैदीही पोलिसांना भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:18 IST

Pakistan: आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो. 

दहशतवादाला सातत्यानं खतपाणी घातल्यानं, अतिरेक्यांना पोसल्यानं पाकिस्तानची जगभर छी-थू होतेच आहे; पण आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो. 

कराची येथील मालिर तुरुंगातून दोन जूनच्या रात्री तब्बल २१६ कैदी फरार झाले. विशेष म्हणजे हे कैदी तुरुंगातून पळून गेल्यानंतर तिथला हेड कॉन्स्टेबल राशीद चिंगारीही फरार झाला. कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेमुळे पाकिस्तान हादरलं असून, आयजीसह २३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.  कैदी पळून गेल्यानंतर सिंध सरकारनं लगेच त्यांच्या अटकेचे आदेश दिले, पण अजून तरीही बरेच कैदी फरार आहेत. तुरुंगातून कैदी पळून जाण्याची ही घटना कराचीच्या तुरुंग इतिहासातली सर्वांत मोठी सुरक्षा चूक समजली जात आहे. त्यामुळेच तुरुंग सुरक्षा विभागाचे मोठमोठे अधिकारी आयजी, डीआयजी, सुपरिंटेंडंट.. इत्यादी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

तुरुंगातून इतके कैदी पळून गेल्यामुळे झालेली नाचक्की टाळण्यासाठी सिंध सरकारनं या कैद्यांनाच आमिषही दाखवलं होतं.. ‘तुरुंगातून तुम्ही पळून गेलात, पण २४ तासांच्या आत जर तुम्ही पुन्हा तुरुंगात आलात तर तुमच्यावर दया दाखवली जाईल, तुमच्यावर सक्त कारवाई केली जाणार नाही; पण पळून गेलेल्यांपैकी जे कैदी या काळात परत येणार नाहीत, त्यांना तुरुंग तोडून पलायन केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त सात वर्षांची शिक्षा दिली जाईल!  आणखी नामुष्कीची गोष्ट म्हणजे तुरुंगातून एवढे कैदी पळून गेले, पण तुरुंगात साधे सीसीटीव्हीदेखील नव्हते. तुरुंग अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे नेमके कोणते कैदी, केव्हा पळून गेले, हे कळण्यातही अडचणी आल्या. 

..पण पाकिस्तानी तुरुंगांतून कैदी फरार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकव्यात काश्मीरमधील रावळकोट तुरुंगातून १९ कैदी फरार झाले होते. त्यातील सहा जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या घटनेनंतरही पाकिस्तानचे वाभाडे निघाले होते. रविवारचा दिवस होता. दुपारचे अडीच वाजलेले. एका कैद्यानं पहारेकऱ्यालाच आपल्यासाठी लस्सी आणायला सांगितली, तीही त्याच्या बरॅकपर्यंत. पहारेकरी लस्सी घेऊन त्याच्या बरॅकपर्यंत येताच कैद्यानंच त्याची मानगुट दाबली. त्याची बंदूक हिसकावून त्याच्यावर ताणली. त्याच्याकडच्या तुरुंगाच्या चाव्याही हिसकावून घेतल्या. या चाव्यांद्वारे त्यानं स्वत:च्या बरॅकचं कुलूप तर उघडलंच, पण इतरही बरॅकची कुलुपं उघडून त्यातल्या कैद्यांचीही सुटका केली. नंतर सर्वजण पळून गेले. हे कैदी पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यातील एक कैदी ठार झाला होता.

इतरही अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण २०१२च्या घटनेनंही पाकिस्तानी सुरक्षेचं नाक कापलं गेलं होतं. त्यावेळीही तब्बल ४०० कैदी तुरुंगातून पळून गेले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPrisonतुरुंगInternationalआंतरराष्ट्रीय