शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पाकिस्तानातले कैदीही पोलिसांना भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:18 IST

Pakistan: आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो. 

दहशतवादाला सातत्यानं खतपाणी घातल्यानं, अतिरेक्यांना पोसल्यानं पाकिस्तानची जगभर छी-थू होतेच आहे; पण आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो. 

कराची येथील मालिर तुरुंगातून दोन जूनच्या रात्री तब्बल २१६ कैदी फरार झाले. विशेष म्हणजे हे कैदी तुरुंगातून पळून गेल्यानंतर तिथला हेड कॉन्स्टेबल राशीद चिंगारीही फरार झाला. कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेमुळे पाकिस्तान हादरलं असून, आयजीसह २३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.  कैदी पळून गेल्यानंतर सिंध सरकारनं लगेच त्यांच्या अटकेचे आदेश दिले, पण अजून तरीही बरेच कैदी फरार आहेत. तुरुंगातून कैदी पळून जाण्याची ही घटना कराचीच्या तुरुंग इतिहासातली सर्वांत मोठी सुरक्षा चूक समजली जात आहे. त्यामुळेच तुरुंग सुरक्षा विभागाचे मोठमोठे अधिकारी आयजी, डीआयजी, सुपरिंटेंडंट.. इत्यादी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

तुरुंगातून इतके कैदी पळून गेल्यामुळे झालेली नाचक्की टाळण्यासाठी सिंध सरकारनं या कैद्यांनाच आमिषही दाखवलं होतं.. ‘तुरुंगातून तुम्ही पळून गेलात, पण २४ तासांच्या आत जर तुम्ही पुन्हा तुरुंगात आलात तर तुमच्यावर दया दाखवली जाईल, तुमच्यावर सक्त कारवाई केली जाणार नाही; पण पळून गेलेल्यांपैकी जे कैदी या काळात परत येणार नाहीत, त्यांना तुरुंग तोडून पलायन केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त सात वर्षांची शिक्षा दिली जाईल!  आणखी नामुष्कीची गोष्ट म्हणजे तुरुंगातून एवढे कैदी पळून गेले, पण तुरुंगात साधे सीसीटीव्हीदेखील नव्हते. तुरुंग अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे नेमके कोणते कैदी, केव्हा पळून गेले, हे कळण्यातही अडचणी आल्या. 

..पण पाकिस्तानी तुरुंगांतून कैदी फरार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकव्यात काश्मीरमधील रावळकोट तुरुंगातून १९ कैदी फरार झाले होते. त्यातील सहा जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या घटनेनंतरही पाकिस्तानचे वाभाडे निघाले होते. रविवारचा दिवस होता. दुपारचे अडीच वाजलेले. एका कैद्यानं पहारेकऱ्यालाच आपल्यासाठी लस्सी आणायला सांगितली, तीही त्याच्या बरॅकपर्यंत. पहारेकरी लस्सी घेऊन त्याच्या बरॅकपर्यंत येताच कैद्यानंच त्याची मानगुट दाबली. त्याची बंदूक हिसकावून त्याच्यावर ताणली. त्याच्याकडच्या तुरुंगाच्या चाव्याही हिसकावून घेतल्या. या चाव्यांद्वारे त्यानं स्वत:च्या बरॅकचं कुलूप तर उघडलंच, पण इतरही बरॅकची कुलुपं उघडून त्यातल्या कैद्यांचीही सुटका केली. नंतर सर्वजण पळून गेले. हे कैदी पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यातील एक कैदी ठार झाला होता.

इतरही अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण २०१२च्या घटनेनंही पाकिस्तानी सुरक्षेचं नाक कापलं गेलं होतं. त्यावेळीही तब्बल ४०० कैदी तुरुंगातून पळून गेले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPrisonतुरुंगInternationalआंतरराष्ट्रीय