शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

मुलायमसिंह जिवंत नाही राहिला तरी, क्रांतिरथ चालत राहिला पाहिजे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 09:01 IST

मुलायमसिंह यादव यांचा मूळ पिंड हा नेहमी ग्रामीण शेतकरी वर्गाचा राहिला. सत्तेवर असताना त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांच्या संघर्षाच्या राजकारणात शेतकरी वर्गानेही त्यांना नेहमी साथ दिली.

‘क्रांतिरथ एक वाहन नही है, एक विचारधारा है! मुलायमसिंह जीवित रहेें या न रहें, क्रांतिरथ चलता रहना चाहिए!’ असे उद्गार १९८७ च्या ऑक्टोबरमध्ये मुलायमसिंह यादव यांनी क्रांतिरथ यात्रेवर हल्ला झाला तेव्हा काढले होते. मुलायमसिंह यादव यांना लखनौ आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नेताजी म्हणून संबोधले जात असे. बोफोर्सप्रकरणी दलालीच्या आराेपाने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या राजवटीवर शिंतोडे उडत होते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातही चौधरी चरणसिंह यांच्यानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मुलायमसिंह यादव यांनी आपले गुरुवर्य जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया आणि राजनारायण यांच्या शिकवणीनुसार बिगर काँग्रेसवादाची आघाडी उत्तर प्रदेशात उघडली होती. तत्पूर्वी मुलायमसिंह  उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एक दमदार विरोधी पक्षनेता म्हणून उदयास येत होते. मात्र,  क्रांतिरथ यात्रेने त्यांना बिगर काँग्रेस पक्षांच्या आघाडीचे ‘नेताजी’ बनविले. त्या यात्रेला  संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत होता.

लखनौमध्ये या यात्रेच्या सभेला दहा लाख लोक जमले होते. अनेक राष्ट्रीय नेत्यांनी त्या सभेत मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाचा गौरव केला होता. तेव्हापासून या देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील आणि निर्णायक अशा उत्तर प्रदेश राज्याच्या केंद्रस्थानी मुलायमसिंह यादव राहिले. १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करीत मुलायमसिंह जनता दलातर्फे प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री झाले. उत्तर प्रदेशात नेताजींच्या रुपाने नवे नेतृत्व उभे राहिले असतानाच त्यांना धक्का देऊन बिगर काँग्रेसवादाची जागा घेण्यास कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपही प्रयत्नशील होता. परिणामी पुढील तीन दशके भाजप विरुद्ध मुलायमसिंह यांच्या नेतृत्वाखालील अगोदर जनता दल आणि नंतर त्यांनीच स्थापन केलेला समाजवादी पक्ष असा संघर्ष होत राहिला. राममंदिर, बाबरी मशीद आणि मंडल आयोग या राजकारणाची रणभूमीच उत्तर प्रदेश होती. त्या संघर्षात मुलायमसिंह नेहमी आघाडीवर राहिले. १९९२ मध्ये वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्यानंतर मुलायमसिंहांनीच भाजप विरोधातील आपला लढा अधिक तीव्र केला. बरोबर एका वर्षाने झालेल्या विधानसभा निवडणुकीत काशीराम यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाशी प्रथमच समाजवादी पक्षाने आघाडी केली. परिणामी भाजपचा पराभव करण्यात नेताजींना यश आले. ते पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आरुढ झाले. ते तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अनेक वर्षे विरोधी पक्षनेता राहिले. १९९६ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. केंद्रात एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार आले. त्यात संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी मुलायमसिंह यादव यांच्याकडे आली होती. दहावेळा विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या नेताजींनी लोकसभेच्या देखील   सातवेळा निवडणुका जिंकल्या होत्या. मैनपुरी, कनौज, आझमगढ अशा विविध मतदारसंघातून ते लाेकसभेची निवडणूक लढवत आणि सहज विजयी होत असत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही ते निवडून आले. संसदेच्या राजकारणात एक वजनदार आणि अनुभवी नेता म्हणून नेताजींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुलायमसिंह यादव यांचा मूळ पिंड हा नेहमी ग्रामीण शेतकरी वर्गाचा राहिला. सत्तेवर असताना त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांच्या संघर्षाच्या राजकारणात शेतकरी वर्गानेही त्यांना नेहमी साथ दिली. त्या जोरावर त्यांनी बिगर काँग्रेस-बिगरभाजपा आघाडीच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यांना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील राजकारण पूर्ण नसे, असा एक काळ देशाने पाहिला आहे. जनता पक्ष आणि जनता दल यांच्यातील फाटाफुटीला कंटाळून मुलायमसिंह यांनी समाजवादी पक्षाच्या रुपाने  नवा पर्याय दिला.  उत्तर प्रदेशच्या राजकारणात आजही हाच पक्ष नेताजींचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ भाजपला पर्यायी विरोधक म्हणून उभा आहे. याचे सारे श्रेय नेताजींना जाते. देशाच्या राजकारणात प्रचंड दबदबा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे राजकारण एकहाती यशस्वीपणे लढण्यात मुलायमसिंहांचे मोठे योगदान आहे. मृदू भाषिक, आक्रमक शैली असलेले मुलायमसिंह  सामाजिक ऐक्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले. हिंदीचा अभिमान बाळगणाऱ्या जुन्या समाजवाद्यांचे गुण त्यांच्यातही होते. त्यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा असल्या तरी धर्मांध राजकारणाची उघड चर्चा सुरू झाली त्या विरुद्ध लढणारे, शेतकऱ्यांचे नेते म्हणून मुलायमसिंह यादव भारतीय राजकारणात नेहमीच लक्षात राहतील.

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव