शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शेतकरी मेला तरी चालेल, पथक-पोशिंदा जगला पाहिजे!

By गजानन दिवाण | Updated: December 23, 2020 06:56 IST

Farmers : ‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला.

- गजानन दिवाण(उप वृत्तसंपादक, लोकमत) 

घराच्या बाहेर निघायचे म्हटले तरी पन्नास वेळेस विचार करण्याचा हा काळ. एक कोरोना कमी होता म्हणून की काय, आता ब्रिटनमध्ये दुसरा कोरोना जन्माला आला. आपण आणि आपले घर एवढेच विश्व, असे समजण्याचे हे दिवस असताना दिल्लीच्या केंद्रीय पथकाने एवढा मोठा प्रवास करून, काही राज्ये, काही जिल्ह्यांची सीमा ओलांडून मराठवाड्यात आमच्या बांधावर यावे, हेच आमचे भाग्य. अवकाळी अतिवृष्टीने नुकसान झाले ऑक्टोबरमध्ये, ते पाहण्यासाठी आपण आलात डिसेंबरमध्ये, म्हणून काय झाले? कोरोना संकटाच्या काळात तुम्ही आलात हेच  महत्त्वाचे. येण्यास थोडा उशीर झाला म्हणून एवढे ओरडण्याचे कारण  काय? कुठल्या दुष्काळानंतर आपले पथक अगदी वेळेवर आले, ते आधी सांगा.  केंद्रीय पथक असे उशिरा येण्यालादेखील मोठी परंपरा आहे. हे पथक येऊन काय करते? पाच-दहा गावे, पाच-दहा तासांत फिरून ओला-कोरडा दुष्काळ समजून कसा घेते? व्हिडिओ आणि अहवाल पाहूनच अंतिम अहवाल द्यायचा तर मग  मोठा खर्च करून ही दुष्काळी सहल कशासाठी, असे प्रश्न उपस्थित करण्याचे चातुर्य  उगीच कोणी दाखवू नये. कारण हे पथक प्रत्यक्ष बांधावर येऊन गेल्याशिवाय केंद्राची मदत मिळतच नाही, हेही तितकेच खरे. किती बांधावर आणि काय पाहणी केली याला फारसे महत्त्व नाही. अशी ही मोठी परंपरा असताना मग तीच ती ओरड कशाला करायची? या केंद्रीय पथकाने मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील दहा, जालना जिल्ह्यातील सहा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील गावांची नुकसान पाहणी केली. सात तासांत एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दहा गावांचे बांध पालथे घातले. तब्बल १८६ किलोमीटरचा प्रवास केला.  म्हणून त्यांचे कौतुक. ‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला.  शेतात पीक कितीही चांगले आले तरी घरात येईपर्यंत त्याचा नेम राहत नाही. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ  पाठ सोडत नाही. काहीच नाही तर व्यापारी पदरात काही पडू देत नाहीत. यंदा निसर्ग अति प्रसन्न झाला. पीक तर चांगले बहरले; पण पाण्यात सारेच वाहून गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी नुकसान झाले. ते कमी म्हणून की काय, पुन्हा ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने होते नव्हते सारेच साफ केले. या पावसामुळे मराठवाड्यात ३६ लाख शेतकऱ्यांच्या २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अनेकांचे अख्खे शेत खरडून गेले. १३४६ कोटींचा मदतीचा पहिला हप्ता देण्यात आला. काहींना थोडेफार मिळाले, तर अनेकांच्या हाती एक आणाही पडला नाही. विमा काढलेल्या शेतकऱ्यांचेदेखील तेच हाल. विमा कंपनीने त्यांच्याही हातावर तुरी दिल्या. -  राज्याची  मदत मिळाली, आता केंद्राच्या मदतीसाठी हे पथक आले.  तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी पाहणी दौरे केले. पंचनामे झाले. येणाऱ्या प्रत्येकासमोर बायाबाप्यांनी  व्यथा मांडली. या केंद्राच्या पथकासमोर भरल्या डोळ्यांनी तेच सांगितले. मदत मिळेल, हीच भाबडी अपेक्षा.  या पथकाला कोणी कापूस दाखवला, तर कोणी  एका टोपल्यात अति पावसाने खराब झालेला सोयाबीन-मका. कोणी तुराट्या झालेले तुरीचे पीक दाखवले, तर कोणी सडलेले धान्य.  अनेकांसमोर व्यथा मांडून झाल्याने आता अश्रूही येत नाहीत. ...यानिमित्ताने एक बरे झाले. कोरोना झालेल्यांना, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आणि कोरोना होऊ नये म्हणून बाकी सर्वांनाच गेल्या नऊ महिन्यांपासून गाव सोडता आले नव्हते. अनेकांना घरही सोडता आले नव्हते.  सरकारी खर्चात केंद्रीय पथकाची दुष्काळी सहल तरी झाली. हवापालट झाला. तोंडालाही चव आली. या दिल्लीच्या पाव्हण्यांनी आता एकच करावे. राजधानीत पोहोचताच आपली कोरोना टेस्ट करावी आणि नंतरच नुकसानीचा अहवाल सादर करावा. आमच्यासारखे अनेक शेतकरी ओल्या-कोरड्या दुष्काळाने मेले तरी चालतील, दिल्लीतील पोशिंदा जगला पाहिजे, हीच आमची भावना.

टॅग्स :Farmerशेतकरी