शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शेतकरी मेला तरी चालेल, पथक-पोशिंदा जगला पाहिजे!

By गजानन दिवाण | Updated: December 23, 2020 06:56 IST

Farmers : ‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला.

- गजानन दिवाण(उप वृत्तसंपादक, लोकमत) 

घराच्या बाहेर निघायचे म्हटले तरी पन्नास वेळेस विचार करण्याचा हा काळ. एक कोरोना कमी होता म्हणून की काय, आता ब्रिटनमध्ये दुसरा कोरोना जन्माला आला. आपण आणि आपले घर एवढेच विश्व, असे समजण्याचे हे दिवस असताना दिल्लीच्या केंद्रीय पथकाने एवढा मोठा प्रवास करून, काही राज्ये, काही जिल्ह्यांची सीमा ओलांडून मराठवाड्यात आमच्या बांधावर यावे, हेच आमचे भाग्य. अवकाळी अतिवृष्टीने नुकसान झाले ऑक्टोबरमध्ये, ते पाहण्यासाठी आपण आलात डिसेंबरमध्ये, म्हणून काय झाले? कोरोना संकटाच्या काळात तुम्ही आलात हेच  महत्त्वाचे. येण्यास थोडा उशीर झाला म्हणून एवढे ओरडण्याचे कारण  काय? कुठल्या दुष्काळानंतर आपले पथक अगदी वेळेवर आले, ते आधी सांगा.  केंद्रीय पथक असे उशिरा येण्यालादेखील मोठी परंपरा आहे. हे पथक येऊन काय करते? पाच-दहा गावे, पाच-दहा तासांत फिरून ओला-कोरडा दुष्काळ समजून कसा घेते? व्हिडिओ आणि अहवाल पाहूनच अंतिम अहवाल द्यायचा तर मग  मोठा खर्च करून ही दुष्काळी सहल कशासाठी, असे प्रश्न उपस्थित करण्याचे चातुर्य  उगीच कोणी दाखवू नये. कारण हे पथक प्रत्यक्ष बांधावर येऊन गेल्याशिवाय केंद्राची मदत मिळतच नाही, हेही तितकेच खरे. किती बांधावर आणि काय पाहणी केली याला फारसे महत्त्व नाही. अशी ही मोठी परंपरा असताना मग तीच ती ओरड कशाला करायची? या केंद्रीय पथकाने मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील दहा, जालना जिल्ह्यातील सहा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील गावांची नुकसान पाहणी केली. सात तासांत एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दहा गावांचे बांध पालथे घातले. तब्बल १८६ किलोमीटरचा प्रवास केला.  म्हणून त्यांचे कौतुक. ‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला.  शेतात पीक कितीही चांगले आले तरी घरात येईपर्यंत त्याचा नेम राहत नाही. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ  पाठ सोडत नाही. काहीच नाही तर व्यापारी पदरात काही पडू देत नाहीत. यंदा निसर्ग अति प्रसन्न झाला. पीक तर चांगले बहरले; पण पाण्यात सारेच वाहून गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी नुकसान झाले. ते कमी म्हणून की काय, पुन्हा ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने होते नव्हते सारेच साफ केले. या पावसामुळे मराठवाड्यात ३६ लाख शेतकऱ्यांच्या २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अनेकांचे अख्खे शेत खरडून गेले. १३४६ कोटींचा मदतीचा पहिला हप्ता देण्यात आला. काहींना थोडेफार मिळाले, तर अनेकांच्या हाती एक आणाही पडला नाही. विमा काढलेल्या शेतकऱ्यांचेदेखील तेच हाल. विमा कंपनीने त्यांच्याही हातावर तुरी दिल्या. -  राज्याची  मदत मिळाली, आता केंद्राच्या मदतीसाठी हे पथक आले.  तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी पाहणी दौरे केले. पंचनामे झाले. येणाऱ्या प्रत्येकासमोर बायाबाप्यांनी  व्यथा मांडली. या केंद्राच्या पथकासमोर भरल्या डोळ्यांनी तेच सांगितले. मदत मिळेल, हीच भाबडी अपेक्षा.  या पथकाला कोणी कापूस दाखवला, तर कोणी  एका टोपल्यात अति पावसाने खराब झालेला सोयाबीन-मका. कोणी तुराट्या झालेले तुरीचे पीक दाखवले, तर कोणी सडलेले धान्य.  अनेकांसमोर व्यथा मांडून झाल्याने आता अश्रूही येत नाहीत. ...यानिमित्ताने एक बरे झाले. कोरोना झालेल्यांना, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आणि कोरोना होऊ नये म्हणून बाकी सर्वांनाच गेल्या नऊ महिन्यांपासून गाव सोडता आले नव्हते. अनेकांना घरही सोडता आले नव्हते.  सरकारी खर्चात केंद्रीय पथकाची दुष्काळी सहल तरी झाली. हवापालट झाला. तोंडालाही चव आली. या दिल्लीच्या पाव्हण्यांनी आता एकच करावे. राजधानीत पोहोचताच आपली कोरोना टेस्ट करावी आणि नंतरच नुकसानीचा अहवाल सादर करावा. आमच्यासारखे अनेक शेतकरी ओल्या-कोरड्या दुष्काळाने मेले तरी चालतील, दिल्लीतील पोशिंदा जगला पाहिजे, हीच आमची भावना.

टॅग्स :Farmerशेतकरी