शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

उद्योजकांचे खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:01 IST

मुंबईत भारतीय उद्योजक महासंघाची जी बैठक झाली त्यात अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते. मोदींच्या ‘मेक इन इंडिया’च्या यशापयशावर सखोल चर्चा झाली.

मुंबईत भारतीय उद्योजक महासंघाची जी बैठक झाली त्यात अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते. मोदींच्या ‘मेक इन इंडिया’च्या यशापयशावर सखोल चर्चा झाली. भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष राकेश मित्तल यांनी ‘मेक इन इंडिया’ने उद्योजकांचा कोणताच फायदा झाला नसल्याचे स्पष्ट केले. केंद्राच्या आवाहनानुसार अनेक उद्योजकांनी पुढाकार घेऊन, बँकांची कर्जे घेऊन गुंतवणूक केली. पण गेल्या तीन वर्षांतील दुष्काळी स्थिती, नोटाबंदी आणि जीएसटी या गर्तेत हे उद्योजक अडकले. मागणी नसल्याने उद्योगातील गुंतवणूक तशीच पडून राहिली. भारतीय अर्थव्यवस्थेतील चलन घसरल्याने बाजारावर नैराश्य पसरले. लोकांनी हात आखडता घेतला. त्यामुळे बाजारातील तरलता संपुष्टात आली. अर्थव्यवस्थेतील निराशेचे हे मळभ बराच काळ टिकल्याने उद्योजकांचे मनोधैर्यही खचले होते. त्याचे सर्व पडसाद मुंबईतील उद्योजकांच्या बैठकीवर पडले होते. गेल्या काही महिन्यांत स्थिती सुधारली असली तरी पूर्ण अर्थव्यवस्था रुळावर यायला वेळ लागणार आहे. परवा रिझर्व बँकेनेही चलनामध्ये आत्तापर्यंतचा विक्रमी नोटा असल्याचे नमूद केले. त्यावरून ‘कॅशलेस इंडिया’चा फुगा फुटल्याचे चित्र दिसते. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या अनियंत्रित दरवाढीमुळे महागाईने उच्चांक गाठला. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘रेपो रेट’ वाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे सहाजिकच कर्जे महाग होणार. त्याचाही फटका उद्योगांना बसू शकतो. आधीच ‘मेक इन इंडिया’साठी काढलेल्या कर्जाची रक्कम बुडीत जाणार अशी चिन्हे दिसत असताना नव्या ‘रेपो रेट’मुळे उद्योजकांपुढे चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. केंद्राने उद्योजकांच्या या चिंतेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. दुुसरीकडे बँकांची थकीत देणी प्रचंड वेगाने वाढत आहेत तर तिसऱ्या बाजूने बँकांची कर्जे बुडविण्याची मानसिकता वाढत आहे. या त्रांगड्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप पुरेसे यश येताना दिसत नाही. ‘मेक इन इंडिया’बरोबरच ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘स्मार्ट सिटी’ या योजनांचे नेमके फलित किती, याचे मूल्यमापन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होईलच. यंदा पुरेसा पाऊस होईल असे भाकीत असल्याने तेवढा दिलासा तूर्त दिसतो आहे. त्याचे अर्थव्यवस्थेवर निश्चितच सकारात्मक परिणाम होतील. तरीही मुंबईच्या बैठकीत उद्योजकांच्या वाट्याला अजून ‘अच्छे दिन’ आले नसल्याचे खंत व्यक्त झाली ती केंद्राच्या आर्थिक धोरणाची काळी बाजू दाखविणारी होती हे मात्र खरे.

टॅग्स :businessव्यवसायIndiaभारत