शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

एका थराराची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:19 IST

तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता.

तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता. अनेक धक्कादायक निकाल यंदाच्या स्पर्धेत लागले असले तरी यंदाची स्पर्धा आतापर्यंतची सर्वात अटीतटीचीही ठरली. विशेष म्हणजे ज्या संघांकडून फारशा अपेक्षा ठेवल्या जात नव्हत्या त्या संघांनी चक्क बाद फेरीत धडक मारताना बलाढ्य संघांना बाहेरचा रस्ता दाखवला. यावरूनच जागतिक फुटबॉल किती उच्च स्तरावर पोहचले याची प्रचिती येते. महिनाभरापूर्वी कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या फ्रान्सने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे काहीसे आश्चर्यकारक असले तरी अनपेक्षित मात्र नव्हते. गेल्या दशकात या खेळातल्या एकंदर व्यूहरचनेत झपाट्याने झालेल्या बदलांची फलश्रुती केवळ या अंतिम सामन्यातच नव्हे तर स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून दिसू लागली होती. एखाद्या नामचीन आणि अर्थातच कुशल खेळाडूभोवती संघाचा संपूर्ण खेळ बेतणाऱ्या संघावर उपउपांत्य फेरीपर्यंत कसेबसे जात मग माघार घेण्याची नामुष्की आली. लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल किंवा नेमारचा बलाढ्य ब्राझील ही याची ठळक उदाहरणे. आघाडीच्या फळीत खेळणाºया आपल्या स्टार खेळाडूला केंद्रस्थानी ठेवून या संघांच्या डावपेचांची रचना करण्यात आली होती. तिला प्रत्युत्तर देताना अन्य संघांनी या स्टार खेळाडंूना जखडून ठेवण्याची आणि त्याचबरोबर संधी मिळताच आपल्या आक्रमणाचे रूपांतर आघाडी मिळवण्यात करण्याची नीती अवलंबिली. या स्पर्धेतील उपविजेता क्रोएशिया, स्वीडन आणि बेल्जियमचे संघ काही तरी अकल्पित करून दाखवतील अशी अटकळ काही तज्ज्ञ व्यक्त करीत होते. या संघांचा बचावावर आधारलेला खेळ संधी मिळाल्यावर क्षणार्धात आक्रमकतेत परिवर्तित व्हायचा. सुसाट खेळासाठी परिचित असलेल्या उरुग्वे, ब्राझील, पेरू, अर्जेंटिना, कोलंबिया या लॅटिन अमेरिकन संघांना हे डावपेच भारी पडले. याचे एक कारण हेही आहे की, फुटबॉलचा केंद्रबिंदू आता युरोपकडे सरकलेला आहे. या केंद्रबिंदूत आहे ते अब्जावधींची उलाढाल असलेले क्लब स्तरावरचे फुटबॉल. ही उलाढाल अविश्वसनीय मोल देऊन खेळाडू विकत घेत असते. तिला अपयश मान्य नसते. त्यातून बेफाम फुटबॉलच्या डावपेचांना आवरून घेणारी संयत व्यूहरचना आकारास आली. ही व्यूहरचना आधी आपली बाजू सुरक्षित करते आणि मग प्रतिस्पर्ध्यांच्या रचनेतील कच्चे दुवे शोधते. रोनाल्डो, मेस्सी वा नेमारच्या यशात तिचा वाटा मोलाचा राहिला आहे. तिच्यात आघाडीच्या फळीइतकेच महत्त्व मध्य आणि बचावफळीला असते. मात्र देशाचा संघ घडवताना प्रशिक्षकांवर प्रचंड मर्यादा येत असतात. परिणामी उपांत्य फेरीत खेळलेले चारही संघ एकाच खंडातले निघाले. फुटबॉलला पेले ते मॅराडोना या मन्वंतरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया गेली दोन दशके सुरु होती; ती आता अंतिम टप्प्यात आली आहे, असेच या स्पर्धेतील उपांत्य फेरी व अंतिम सामना सुचवतो. या प्रक्रियेत आफ्रिका आणि आशिया या खंडांचेही महत्त्वाचे योगदान आहे. उर्वरित जगाबरोबर भारतालाही विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चढला होता. लाखो भारतीयांनी रात्र जागवत ही स्पर्धा पाहिली. ‘मेरी दुसरी कन्ट्री’ म्हणत एकेका देशाला समर्थन दिले. पण सव्वाशे कोटींच्या या देशाला इतरांसाठी टाळ््या वाजवण्यावरच समाधान मानावे लागते आहे. जागतिक क्रमवारीतले आपले आजचे स्थान आहे ९७ वे. जपान, दक्षिण कोरिया, चीन, इराण, सौदी अरेबिया यासारखे आशियायी देश आपली अमीट छाप खेळावर सोडत असताना आपण मात्र आपल्याच पायात पाय घालून पडल्यासारखे पिछाडीवर आहोत. क्रिकेटच्या भावविश्वात रमलेल्या भारतीयांना आता फुटबॉलचा थरार समजला आहे. वेळ आहे ती या थरारमध्ये भारतीय तरुण किती लवकर उतरतो याची. त्यासाठी अंतिम सामन्यात धडकलेल्या छोट्या क्रोएशियाचे उदाहरण पुरेसे ठरेल, हे नक्की.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Franceफ्रान्सCroatiaक्रोएशिया