शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

खडसेंची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:21 IST

गैरव्यवहाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले, पक्षीय पातळीवर काहीसे दूर लोटले गेलेल्या एकनाथराव खडसे यांच्यादृष्टीने मतदारसंघाच्या मुख्यालयातील नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचे मोल मोठे आहे.

राजकीय मंडळींच्या कार्यकर्तुत्व आणि लोकप्रियतेचे मूल्यमापन हे निवडणुकांद्वारे होत असते. त्यामुळे भारतीय लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या पोटनिवडणुकीवरुन सरकारचे मूल्यमापन जेव्हा केले जाते, तेव्हा गैरव्यवहाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले, पक्षीय पातळीवर काहीसे दूर लोटले गेलेल्या एकनाथराव खडसे यांच्यादृष्टीने मतदारसंघाच्या मुख्यालयातील नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचे मोल मोठे आहे. १९९० पासून सलगपणे मुक्ताईनगर मतदारसंघाचे भाजपाकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या खडसे यांची मतदारसंघातील बहुसंख्य संस्थांवर मजबूत पकड आहे. शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, साखर कारखाना अशा संस्थांचे जाळे त्यांनी मतदारसंघात उभारले आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुक्तार्इंनगर आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रुजविण्यात चंद्रकांत मेंडकी, डॉ.राजेंद्र फडके, शुभदा करमरकर, वाडीलाल राठोड, डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यासह खडसे यांचेही योगदान आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा रोवला गेला. त्यात खडसे यांचा पुढाकार आणि गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, डॉ.बी.एस.पाटील, प्रा.साहेबराव घोडे, एम.के.अण्णा पाटील, वाय.जी.महाजन यांच्यासारख्या नेत्यांचा सक्रीय सहभाग आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची खान्देशची सूत्रे खडसे यांच्याकडेच होती. त्यांच्या रणनितीला मोठे यश लाभले. परंतु मुख्यमंत्रिपदापासून त्यांना वंचित ठेवणे, महसूल, कृषीसह १२ महत्त्वपूर्ण खाती असूनही असंतुष्ट राहणे, गैरव्यवहाराचे मोठे आरोप होणे, या लागोपाठ घडलेल्या घटनांनी खडसेंसारख्या लोकनेतृत्वास ग्रहण लागले. भाजपा नेतृत्वाकडून खडसे यांची उपेक्षा होत असल्याची स्वत: खडसे आणि त्यांच्या समर्थकांची भावना झालेली आहे. कॉंग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांशी असलेली घसट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविषयी असलेली उघड नाराजी यामुळे जळगाव जिल्ह्याच्या भाजपामध्ये दोन गट पडलेले आहेत. तीन महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर पालिकेची निवडणूक भाजपाने शतप्रतिशत जिंकली. विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. स्वाभाविकपणे मुक्ताईनगरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. खडसेंचा विजय तेथेच निश्चित झालेला होता. विरोधकांना मर्यादेत ठेवण्याचा खडसे यांचा प्रयत्न या निवडणुकीत यशस्वी झाला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसे