शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खडसेंची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:21 IST

गैरव्यवहाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले, पक्षीय पातळीवर काहीसे दूर लोटले गेलेल्या एकनाथराव खडसे यांच्यादृष्टीने मतदारसंघाच्या मुख्यालयातील नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचे मोल मोठे आहे.

राजकीय मंडळींच्या कार्यकर्तुत्व आणि लोकप्रियतेचे मूल्यमापन हे निवडणुकांद्वारे होत असते. त्यामुळे भारतीय लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या पोटनिवडणुकीवरुन सरकारचे मूल्यमापन जेव्हा केले जाते, तेव्हा गैरव्यवहाराच्या आरोपावरुन मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेले, पक्षीय पातळीवर काहीसे दूर लोटले गेलेल्या एकनाथराव खडसे यांच्यादृष्टीने मतदारसंघाच्या मुख्यालयातील नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचे मोल मोठे आहे. १९९० पासून सलगपणे मुक्ताईनगर मतदारसंघाचे भाजपाकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या खडसे यांची मतदारसंघातील बहुसंख्य संस्थांवर मजबूत पकड आहे. शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, साखर कारखाना अशा संस्थांचे जाळे त्यांनी मतदारसंघात उभारले आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुक्तार्इंनगर आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रुजविण्यात चंद्रकांत मेंडकी, डॉ.राजेंद्र फडके, शुभदा करमरकर, वाडीलाल राठोड, डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यासह खडसे यांचेही योगदान आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा रोवला गेला. त्यात खडसे यांचा पुढाकार आणि गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, डॉ.बी.एस.पाटील, प्रा.साहेबराव घोडे, एम.के.अण्णा पाटील, वाय.जी.महाजन यांच्यासारख्या नेत्यांचा सक्रीय सहभाग आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची खान्देशची सूत्रे खडसे यांच्याकडेच होती. त्यांच्या रणनितीला मोठे यश लाभले. परंतु मुख्यमंत्रिपदापासून त्यांना वंचित ठेवणे, महसूल, कृषीसह १२ महत्त्वपूर्ण खाती असूनही असंतुष्ट राहणे, गैरव्यवहाराचे मोठे आरोप होणे, या लागोपाठ घडलेल्या घटनांनी खडसेंसारख्या लोकनेतृत्वास ग्रहण लागले. भाजपा नेतृत्वाकडून खडसे यांची उपेक्षा होत असल्याची स्वत: खडसे आणि त्यांच्या समर्थकांची भावना झालेली आहे. कॉंग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांशी असलेली घसट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविषयी असलेली उघड नाराजी यामुळे जळगाव जिल्ह्याच्या भाजपामध्ये दोन गट पडलेले आहेत. तीन महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर पालिकेची निवडणूक भाजपाने शतप्रतिशत जिंकली. विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. स्वाभाविकपणे मुक्ताईनगरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना जोरदार टक्कर देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. खडसेंचा विजय तेथेच निश्चित झालेला होता. विरोधकांना मर्यादेत ठेवण्याचा खडसे यांचा प्रयत्न या निवडणुकीत यशस्वी झाला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसे