शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

बँकांच्या थकीत कर्जवसुलीसाठी हवेत परिणामकारक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 05:14 IST

पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेल्या निर्बंधानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तर ती भयावहकता आणखी वाढली आहे.

बँकिंगला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. अशा या बँकिंगमध्ये गेल्या काही वर्षांपासून ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात एक भीती निर्माण होत आहे. ही बाब केवळ बँकिंगपुरतीच नव्हे, तर अर्थव्यवस्थेसाठीही खूप धोकादायक सिद्ध होऊ शकते.पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेल्या निर्बंधानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तर ती भयावहकता आणखी वाढली आहे. बँकांची सुदृढता, भांडवल पर्याप्तता निधी आणि सकल किंवा निव्वळ थकीत कर्जावरून ओळखली जाते. पीएमसी बँकेचा भांडवल पर्याप्तता निधी होता १२ टक्क्यांवर, तर निव्वळ थकीत कर्जे २ टक्के. आजच्या परिस्थितीत आदर्श म्हणावे असेच हे चित्र होते. त्यामुळे या आकड्यांवर विश्वास ठेवून बँकिंग करू पाहणाऱ्यांना दोष कसा देता येईल? प्रश्न आहे तो असे अघटित काय घडले, ज्यामुळे एका रात्रीतून बँकेची इमारत पूर्ण ढासळली. आता असे सिद्ध झाले आहे की, ही सर्व आकडेवारी फसवी आहे. प्रत्यक्षात थकीत कर्जे कितीतरी जास्त आहेत, पण ती दडवली गेली होती. एकाच कर्जदाराला फार मोठ्या प्रमाणात कर्ज दिली गेली आहेत. जे करत असताना रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसविले गेले होते. खात्यांची हेराफेरी, मोठ्या प्रमाणावर केली गेली होती. थकीत कर्जे दडवली गेली होती. आता प्रश्न निर्माण होतो तो हा की, या अनियमितता बँकेच्या संचालक मंडळाच्या मॅनेजमेंट कमिटीच्या लक्षात कशा आल्या नाहीत? बँकेच्या इन्स्पेक्शन विभागाला याची माहितीच नव्हती का? बँकेचे वार्षिक आॅडिट करणाºया आॅडिटरच्या लक्षात ही बाब कशी आली नाही? रिझर्व्ह बँकेतर्फे जे इन्स्पेक्शन केले जाते, त्या इन्स्पेक्शनमध्येही या अनियमतता आढळल्या नाहीत, हे कसे शक्य आहे? याचाच अर्थ, व्यवस्थेत काही गैर होत असेल, तर ते निदर्शनास आणून देणारी व्यवस्थाही कुचकामी सिद्ध झाली आहे का? पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, व्यवस्था आतून पोखरली गेली असेल, तर काहीही शक्य आहे. आता हेच नेमके चिंता करायला भाग पाडते.आज जे पीएमसी बँकेत झाले, ते उद्या कोठेही घडू शकते, हे खूपच भयावह आहे! हेच ते कारण आहे, ज्यामुळे सामान्य माणसांचा बँकिंगवरचा विश्वास उडत आहे. म्हणूनच आजच्या बँकिंग व्यवस्थेबद्दल त्यावर नियंत्रण करणाºया संस्थांबद्दल, पद्धतीबद्दल अधिक गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

बँकांमधील थकीत कर्जाचे टक्केवारीतील प्रमाण घटवायचे असेल, तर सध्या बँका रिझर्व्ह बँकेने मान्य केलेल्या पद्धतीचा वापर करत, म्हणजे इंटर बँक पार्टिसीपेटरी नोटच्या माध्यमातून कर्जाचा पोर्टफोलिओ विकत घेतात आणि एकूण कर्जाचीे रक्कम वाढवितात. म्हणजे आपोआपच त्याच्या तुलनेत थकीत कर्जे टक्केवारीच्या प्रमाणात घटतात. म्हणजे थकीत कर्जे कमी केल्याचा आभास निर्माण केला जातो. ज्या बँकेकडून तो पोर्टफोलिओ विकत घेतला जातो, ती बँक यात संभाव्य थकीत कर्जाचा आंतरभाव जास्त करतात, ज्यामुळे थकीत कर्जाची संभाव्यता यात टाळली जाते व थकीत कर्जे आटोक्यात ठेवल्याचे समाधान मिळते.

याशिवाय बँका कर्जे मोठ्या प्रमाणावर राइट आॅफ करतात. म्हणजे थकीत कर्जापोटी १00 टक्के तरतूद करून ती एकूण थकीत कर्जातून वजा केली जातात. तरतुदीसाठी बँकेचा नफा वापरला जातो. यामुळे भलेही नफा घटेल, पण थकीत कर्जेदेखील घटतील आणि नेमके भारत सरकारने प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शनमधून बाहेर काढण्यासाठी याच मार्गाचा अवलंब केला. मोठ्या प्रमाणावर या बँकांना भांडवल उपलब्ध करून दिले व थकीत कर्जापोटी तरतूद करून ही कर्जे अखेर राइट आॅफ करून कर्जे कमी केले. रिझर्व्ह बँकेने आपल्या पद्धतीतच अशा तरतुदी केल्या आहेत, ज्यामुळे या पळवाटांचा वापर करून बँका असे आभास निर्माण करत आहेत, याला काय म्हणावे?

या परिस्थितीला ‘जैसे थे’ ठेवण्यात या सर्वांचेच हितसंबंध गुंतलेले आहेत. म्हणून तर वारंवार अर्थसंकल्पात तरतूद करून बँकांचे पुनर्भांडवलीकरण करून बँकांना वाचविले जात आहे आणि आता हे केवळ राष्ट्रीयकृत बँकांपुरतेच मर्यादित का? असे करत सहकारी बँकिंगदेखील या मदतीची अपेक्षा करत आहे आणि असे चालत राहिले, तर बँकिंग यंत्रणा अर्थव्यवस्थेला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही आणि नेमके हेच आज होऊ पाहत आहे? यावर उपाय एकच आहे, बँकांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी परिणामकारक पावले आणि आर्थिक घोटाळ्यासाठी कठोर शासन. हे सरकार करणार का? हाच खरा प्रश्न आहे.-देविदास तुळजापूरकर। बँकिंग तज्ज्ञ

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँक