शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

श्रमाला मिळाली प्रतिष्ठा, गावे झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:40 IST

कुदळ-फावडे खांद्यावर घेऊन मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना मुलगी द्यायची म्हणजे हजार वेळा विचार करणारी मंडळी असताना याच कुदळ-फावड्याने गेल्या

कुदळ-फावडे खांद्यावर घेऊन मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना मुलगी द्यायची म्हणजे हजार वेळा विचार करणारी मंडळी असताना याच कुदळ-फावड्याने गेल्या तीन वर्षात कोट्यवधी लिटर पाणी गोळा करून राज्याची तहान भागवण्यात मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या श्रमाला खºया अर्थाने प्रतिष्ठा मिळाली असून आता सामूहिक श्रमदानाशिवाय पर्याय नसल्याचे दिग्गजांनाही पटले आहे. दुष्काळाने होरपळणाºया अन् शेतकºयांच्या आत्महत्येने विव्हळणाºया राज्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून एक वेगळा मार्ग सापडला आहे.सरकारने पाणी अडवणे व जिरवण्याबरोबर मोठी धरणे बांधून जलसिंचनावर अब्जावधी रुपये खर्च केले तरी शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र चालूच राहिले होते. दुष्काळात होरपळणाºया शेतकºयाला वाचवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज होती. हिवरेबाजारसारखे गाव केवळ एकीमुळे दुष्काळमुक्त होऊ शकते तर इतर का नाहीत? असा प्रश्न पडतो. हिंदी चित्रपट अभिनेता अमिर खान, सत्यजित भटकर या मंडळीनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेऊन गावागावात श्रमाचे अन् एकीचे महत्त्व पटवून दिले. गावागावातील लोकांना यात सहभागी करून घेतले. मोजक्या लोकांना प्रशिक्षण देऊन २०१६ साली सुरू करण्यात आलेल्या या चळवळीमध्ये पहिल्या वर्षी केवळ तीन तालुक्यातील ११६ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्याच वर्षी १३६८ कोटी लिटर पाणी गोळा करण्यात या चळवळीला यश आले. पाणलोट क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे महसुली अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माण खटाव तालुक्यात या क्षेत्रात मोठे काम केले आहे. साताºयाचे डॉ. अविनाश पोळ हे गेली २२ वर्षे याच क्षेत्रात जनजागृती करत आहेत. वॉटर कप स्पर्धेचे ते राज्य समन्वयक आहेत.गावागावात सुरू असलेलं काम अन् काम करणारी मंडळी आणि प्रत्यक्ष झालेला लाभ पाहून इतर गावांनाही या चळवळीचे महत्त्व पटले आणि गावेच्या गावे या चळवळीकडे आकृष्ट होऊ लागली आहेत. प्रशिक्षण घेण्यासाठी कार्यकर्ते फाऊंडेशनकडे धावू लागले.मागच्या वर्षी ३० तालुक्यातील १३२१ गावांमधील ६००० कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेऊन कार्यक्रम राबवला. दररोज ६५००० लोकश्रमदानात सहभागी होत होते. स्वत: अमिर खान व पत्नी किरण राव हातात फावडे घेत असल्याने गावागावातील सर्व थरातील लोक आपापल्या घरातून कुदळ-फावडे घेऊन कामाला लागले. त्याचा परिणाम असा झाला गेल्या तीन वर्षात श्रमदान करण्यासाठी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, सरकारी कर्मचारी, डॉक्टर मंडळी, चित्रपट अभिनेते, विविध स्वयंसेवी संघटना समूह सहभागी होऊ लागली आहेत. श्रम करण्यात प्रत्येकाला वेगळा अभिमान वाटू लागला. त्यामुळे गतवर्षी ८२१६ कोटी लिटर पाणीसाठा करण्यात चळवळीला यश आले.यावर्षी या चळवळीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून ७५ तालुक्यातील ४०२५ गावांनी यात सहभाग नोंदवला आहे. या गावातील २० हजार कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेतले. ८ एप्रिल ते २२ मे पर्यंत चाललेल्या या मोहिमेचे अद्याप मोजमाप झालेले नाही. तरीही श्रमकºयांनी बदलाचे ‘तुफान आलंया’ हा संदेश मात्र दिला आहे.-बाळासाहेब बोचरे