शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कशाला करायचा हा खोटारडेपणा?

By किरण अग्रवाल | Updated: February 12, 2019 10:03 IST

राजकारणातील अविश्वसनीयता सर्वज्ञात आहे, कधी कोण सोबत येतील आणि कधी कशामुळे दुरावतील हे सांगता येत नाही; पण याचसोबत राजकारणात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही असेही म्हटले तर ते सर्वमान्य ठरू नये.

किरण अग्रवाल

राजकारणातील अविश्वसनीयता सर्वज्ञात आहे, कधी कोण सोबत येतील आणि कधी कशामुळे दुरावतील हे सांगता येत नाही; पण याचसोबत राजकारणात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही असेही म्हटले तर ते सर्वमान्य ठरू नये. कारण आजही अनेक राजकारणी खोटारडेपणाचा आधार न घेता स्पष्टवक्तेपणे आपली मते मांडून प्रसंगी मतदारांचा रोष ओढवून घेताना दिसतात. अर्थात, असे करण्यातून म्हणजे खोटे बोलण्यातून लोकांची फसवणूक तर होतेच शिवाय लोकप्रतिनिधित्वाच्या शपथेशीही प्रतारणाच घडून येते म्हणायचे. त्यामुळे राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या विधानाला सहज म्हणून न घेता त्याकडे गांभीर्याने बघितले जाणे गरजेचे आहे.एका पुरस्कार वितरण समारंभासाठी नाशकात आले असता राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील खोटारडेपणाची गरज बोलून दाखविली. ‘राजकारण हे एक प्रकारचे नाटकच असून, येथे नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो’ असे सांगताना, ‘अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटेही बोलावे लागते. त्याशिवाय राजकारण करताच येत नाही’, असेही सांगायला पाटील विसरले अगर कचरले नाहीत. राजकारणातील खोटारडेपणा कबूल करण्याचा प्रामाणिकपणा आणि धारिष्ट्य दाखविल्याबद्दल त्यांचे कौतुक करता यावे. शाळेत असताना नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये, असे आपल्याला सर्वांना शिकवले जात असते. त्या शिकवणुकीनुसार पाटील राजकारणातील खोटेपणाबद्दल खरे खरे सांगून गेले; पण त्यांच्या या खरेपणातील खंत एकूणच राजकीय परिघावरील अविश्वासाच्या सर्वांनी स्वीकारलेल्या स्थितीत अधिकची व खोटेपणाची भर घालणारी असल्याने त्याची चिकित्सा घडून येणे गरजेचे ठरावे. कारण, या क्षेत्रात कधी काय घडून येईल हे भरवशाचे नसते हे सहज स्वीकारता येणारे सत्य असले तरी; खोटेपणाखेरीज राजकारणच करता येत नाही असे मानणे मात्र अनेकांवर अन्याय करणारे ठरेल. कोणत्याही स्थितीत मतदार नाराज होता किंवा दुरावता कामा नये म्हणून बंडलबाजी करणारे काहीजण असतीलही; परंतु यच्चयावत सारेच राजकारणी मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोट्याचाच आसरा घेतात असे म्हणता येऊ नये. पाटील यांच्या विधानाकडे म्हणूनच गांभीर्याने बघितले जावयास हवे.मुळात, मतदारांच्या अपेक्षा असतात तरी काय, की ज्यासाठी राजकारण्यांना खोटे बोलून वेळ निभवावा लागतो? परिसराचा विकास व्हावा, प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत व लोकप्रतिनिधीने संपर्कात राहायला हवे, इतक्याच जर मतदाराच्या अपेक्षा असतील तर त्यात गैर काय आणि त्यासाठी खोटे बोलून अभिनय कशाला करायचा? पण तरी तसे करावे लागत असेल तर ते संबंधिताचेच अपश्रेय म्हणायला हवे. अपेक्षापूर्तीसाठीची धडपड प्रामाणिक असेल तर थापेबाजी करायची वेळच येऊ नये; पण प्रश्न कधी निर्माण होतो, जेव्हा एखादी बाब आवाक्यात नसते अगर करता येणारी नसते, तरी ती पूर्ण करण्याची आश्वासने ठोकून दिली जातात, तेव्हा लोकांसमोर जाताना खोटारडेपणा करण्याची नामुष्की ओढवते. त्यापेक्षा न होऊ शकणाऱ्या कामांचे शब्द देऊ नका, म्हणजे खोटेपणाचा अभिनय करावा लागणार नाही. थोडक्यात, खोटे बोलावे लागणे ही राजकारणातली अपरिहार्यता नाही, तर ते ओढवून घेतलेले दुखणे असते. खोटे बोलून मतदारांना अपेक्षा लावून ठेवणे आणि अंतिमत: त्यांचा भ्रमनिरास घडण्यापेक्षा अगोदरच स्पष्टपणे अमुक काम होणार नाही, हे सांगितलेले केव्हाही बरे. त्याने संबंधित लोक क्षणभर दुखावतील भले; पण नंतरच्या अपेक्षाभंगापेक्षा हे दुखणे सुसह्यच म्हणता यावे.महत्त्वाचे म्हणजे, खोटे बोलल्याखेरीज राजकारण करताच येत नाही, हे म्हणणे तर तद्दन खोटे आहे. कारण, आपली मते व भूमिकांवर, तत्त्वावर ठाम राहात न जमणा-या गोष्टींसाठी स्पष्टपणे नकार देणारे अनेक राजकारणी आजही पहावयास मिळतात. विकासाचे काय ते बोला, भानगडी केल्यावर पोलिसांकडे सोडवायला मुळीच येणार नाही किंवा फोनदेखील करणार नाही, असे म्हणणारेही आहेत. तेव्हा, खोटे बोलण्याची वेळच येत नाही. दुसरे असे की, विधिमंडळात सदस्य म्हणून शपथ घेताना संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगण्याबरोबरच जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठेने पार पाडण्याचा शब्द संबंधितानी दिलेला असतो. यात खोटेपणाला वाव आहेच कोठे? मग जर राजकारणात खोटेच बोलावे लागत असेल तर निष्ठेने कर्तव्य पार पाडण्याचे काय? तेव्हा, कशाला करायचा हा खोटारडेपणा? याचा खरेच विचार होण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक