शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:09 IST

सिंधू जल करार स्थगित करून भारताने पाकिस्तानविरुद्ध आर्थिक युद्ध पुकारले आहे. लवकरच कठोर पावले उचलली जातील, असे अंतस्थ सूत्रांकडून समजते.

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली

‘पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या हत्येला जबाबदार असलेला प्रत्येक दहशतवादी आणि त्याला आश्रय देणाऱ्याला भारत शोधून काढून शिक्षा करील’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तेव्हा पाकिस्तानला तो अगदी स्पष्ट शब्दात इशारा होता. गुळमुळीत शाब्दिक खेळ हा मोदींचा स्वभाव नव्हे. यावेळी कोणाला कल्पनाही करता येणार नाही, अशी काही कारवाई ते करतील आणि पाकिस्तानच्या मर्मावरच नेमका आघात होईल, हे निश्चित आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सैन्यदले आणि प्रशासनाने अनेक चुका केल्या, हे अमान्य करताच येणार नाही. गेल्या ३५ वर्षांत दहशतवाद्यांकडून कधीही पर्यटकांवर हल्ला झालेला नाही. त्यामुळे ‘असे काही घडणारच नाही’, हे जणू गृहीतच धरले गेले. ‘यावेळी पर्यटनस्थळे लक्ष्य होऊ शकतात’, असा इशारा गुप्तचरांनी देऊनही हे क्रूर हत्याकांड घडले.

पहलगाममधील बैसरन परिसर मिनी स्वित्झर्लंड असूनही तिथे पर्यटन सेवा देणाऱ्यांसाठी साध्या परवान्याची पद्धतही नाही. हजारो पर्यटकांना घेऊन कुणीही कुणाच्याही परवानगीशिवाय कुठेही जावे, असे चालले होते. आता तेच दहशतवाद्यांचे सोपे लक्ष्य ठरले आहे. पुलवामात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी आत्मघातकी बॉम्बर्सनी सीआरपीएफ जवानांच्या बसवर केलेल्या हल्ल्यात ४० जवान ठार झाले होते. यासंदर्भातील डावपेचात्मक बाबी हाताळणाऱ्यांचे मत असे की, पहलगाम म्हणजे पुलवामा नव्हे. भारतीय सैन्याने त्या हल्ल्याचा सूड म्हणून पाकिस्तानमधील बालाकोटवर अचानक हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यावेळी भारत बालाकोटच्या पुढे जाईल आणि पाकिस्तानविरुद्ध दीर्घ युद्ध पुकारेल, अशी चर्चा आहे.

२०१९  मध्ये मोदी निवडणुकीच्या तणावाखाली होते. लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर होत्या. विरोधी पक्षांनी सुरक्षेत गलथानपणा झाल्याचा ठपका ठेवला होता, परंतु आज २०२५ मध्ये विरोधी पक्षही मोदींच्या ठामपणे पाठीशी आहेत. सिंधू जल करार स्थगित करून भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध आर्थिक युद्ध पुकारले आहे. पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले उचलली जातील,  असे अंतस्थ सूत्रांकडून समजते.

नितीश, बिहार आणि भाजपबिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०० जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिंकेल, असे भाजपचे म्हणणे आहे. विरोधी पक्षांमधील प्रमुख नेते आपल्या छावणीत आणण्याचाही पक्षाचा प्रयत्न चालला आहे. अलीकडेच एक केंद्रीय मंत्री काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना भेटले.  अखिलेश प्रसाद यांची बिहार प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी होताच नेमकी संधी  साधण्यासाठी भाजप लगेच पुढे सरसावला. ‘पक्षात  चांगले भवितव्य असेल. राज्यसभेतील खासदारकीही पुन्हा मिळेल’, असे आमिष दाखवण्यात आले.  तूर्तास तरी अखिलेश प्रसाद सिंह यांनी याविषयी फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षातले काही प्रमुख नेते आपल्या छावणीत आणण्याचे प्रयत्नही भाजपने चालविले आहेत. 

सरकारने कितीही नाकारले तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा स्मृतिभ्रंशाचा आजार वाढत चालल्याच्या बातम्या आहेत. माणसाची विचार करण्याची शक्ती, स्मृती आणि तर्कावर कोणकोणते आजार परिणाम करू शकतात, यावर चर्चेलाही ऊत आला आहे. नितीशकुमार यांनी स्मृतिभ्रंशामुळे काय-काय गडबडी केल्या त्याचे भांडवल विरोधी पक्ष करणार. बिहारमधील निवडणुकांवर या सगळ्याचे सावट घोंगावते आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय प्रतिमेवरही त्याची सावली दिसते. प्रशासकीय कुचंबणा टाळण्यासाठी केंद्रीय मंत्री लल्लन सिंह, भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि नितीशकुमार यांच्याजवळच्या  असलेल्या काही नोकरशहांचा  एक अनौपचारिक गट तयार करण्यात आला आहे. सर्व महत्त्वाचे निर्णय हा गट देतो आणि या व्यवस्थेबद्दल भाजपचे नेतृत्व अत्यंत समाधानी आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपने विधानसभा निवडणुकीनंतरही नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे जाहीरही करून टाकले. म्हणजे, नितीशकुमार हे नामधारी राहतील आणि प्रत्यक्षात भाजपलाच राज्य करता येईल. 

    harish.gupta@lokmat.com

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदी