शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

संपादकीय : हा तिढा तडजोडीनेच सुटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 06:25 IST

सेनेचे लोक आरंभापासून समसमान वाटपावर ठाम आहेत

निम्म्या काळासाठी मुख्यमंत्रिपद, अर्धी मंत्रिपदे व सरकारात बरोबरीचे अधिकार ही मागणी जेवढ्या गर्जून सांगता येईल तेवढ्या मोठ्या ओरड्यानिशी शिवसेनेचे नेते, प्रवक्ते व मुखपत्रे करीत असताना ‘त्यांच्याकडून आम्हाला काही प्रपोजल आलेच नाही. ते आले की मग आम्ही विचार करू,’ असे भाजपचे नेते म्हणत असतील; तर त्याचा अर्थ एकच त्यांना सेनेची मागणी ऐकून न ऐकल्यासारखी करायची आहे किंवा ती पूर्णपणे नाकारायची आहे. भाजपच्या मराठी पुढाऱ्यांना दिल्लीहून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन झाले असेल, असे दिसत नाही. संघाच्या नेत्यांशी नागपुरात झालेल्या भेटीतही केवळ ‘समझोता टिकवा’ एवढाच मोघम संदेश त्यांना मिळाला असणार. शिवसेना मात्र जराही मागे सरायला तयार नाही आणि तिचे प्रवक्ते-संपादक आपल्या तोंडात तीळ भिजू देत नाहीत. त्यांचे मुखपत्रही भाजपला दरदिवशी नव्या अस्त्राने घायाळ करीत असते. हा सारा राज्यातील भाजपचे बळ कमी झाल्याचा व त्याच्या आमदारांची संख्या १२२ वरून १०५ वर आल्याचा आणि ‘२२० च्या पुढे’ ही भाषा वल्गना ठरल्याचा परिणाम आहे.

सेनेचे लोक आरंभापासून समसमान वाटपावर ठाम आहेत. आता भाजपला कमी जागा मिळाल्याने त्यांचा ठामपणा आणखी भक्कम झाला आहे. शिवाय सेनेची माणसे शरद पवारांना भेटत आहेत. त्यांच्या पक्षाचे ५४ आमदार विजयी झाले असल्याने, त्यांची व सेनेची विधानसभेतील सदस्यसंख्या (५६) भाजपच्या बरोबरीहून अधिक, ११० पर्यंत जाणारी आहे. अशा वेळी प्रश्न उरतो तो केवळ काँग्रेसचा. तो पक्ष पवारांना खुला पाठिंबा देईल. पण सेनेला तो देणे त्याला देशाच्या इतर भागांसाठी अडचणीचे ठरेल. एक गोष्ट मात्र खरी, ४४ सदस्य असलेल्या काँग्रेसलाही एक निश्चित भूमिका घ्यावीच लागेल. तसेही त्या पक्षाचे काही तरुण आमदार शिवसेनेला साथ द्यायला व भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला आजच तयार आहेत. काय वाटेल ते करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची त्या पक्षाची खेळी कर्नाटकात एकदा यशस्वी झालीही आहे. काँग्रेसने बाहेरून, मूक पाठिंबा दिल्यास पवार व सेना यांचे राजकारण यशस्वी होऊन ते भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकतील. भाजपने जाहीर केल्याप्रमाणे सेना येईल तर तिच्यासह अन्यथा तिच्यावाचून तो पक्ष सरकार बनवील आणि मग बहुमतासाठी विनवण्या करायला बाहेर पडेल. मात्र त्या स्थितीत कोणत्याही कळपात नसलेली थोडीशीच कोकरे त्याच्या हाती लागतील; त्यांची संख्या मोठी नाही व ती भाजपला बहुमतापर्यंत नेणारी नाही. त्याहून महत्त्वाची बाब ही की ही माणसे विश्वसनीयही असणारी नाहीत.

सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची संयुक्त संख्या १५४ एवढी तर भाजपची व त्याने जमविलेल्या अपक्षांची संख्या १२२ असल्याचे ते सांगतात. ही स्थिती राज्याच्या राजकारणावर पूर्ण प्रकाश टाकणारी, प्रत्येक पक्षाची अडचण स्पष्ट करणारी, लाभार्थ्यांकडे बोट दाखविणारी व बुडत्यांनाही उघड करणारी आहे. त्याची जाणीव त्या पक्षांच्या पुढाऱ्यांनाही आहे. मात्र आपले दुबळेपण ते कुणी सांगत नाहीत. काँग्रेसच्या मनात वैचारिक गोंधळ असला तरी लोकशाहीत संख्याबळच अखेरीस प्रबळ ठरते, हे त्या पक्षाला कळणारे आहे. तसेच ते सेनेलाही कळतच असणार. एक उपमुख्यमंत्रिपद व काही कमी महत्त्वाची मंत्रिपदे घेऊन भाजप सरकारात सामील होणे त्या पक्षालाही सोईचे वाटतच असणार. मात्र आधी घेतलेल्या भूमिकांचे वजनदार भूत मानगुटीवर असल्याने व ते खाली उतरत नसल्याने त्याही पक्षाची सध्याची घुसमट व अरेरावी सुरू आहे. ही स्थिती निकालाचा सारा भर देवेंद्र फडणवीस या एकट्यावर टाकणारी आहे. लोक मात्र या खेळाला वैतागलेत. काळ जसजसा लांबेल तसतशी यातली एकेकाची भूमिका सैल होत जाईल व ती झाली तर तडजोडीला वाव राहील. हा तिढा लवकर सुटावा, राष्ट्रपती राजवट वा नव्या निवडणुकांना सामोरे जाण्याचे संकट राज्यावर येऊ नये एवढेच. पाऊस व अवर्षण यांना तोंड देऊन माणसे वाचविणे, हे सरकार बनविण्याहून अधिक महत्त्वाचे आहे.

४४ सदस्य असलेल्या काँग्रेसलाही एक निश्चित भूमिका घ्यावीच लागेल. तसेही त्या पक्षाचे काही तरुण आमदार शिवसेनेला साथ द्यायला व भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला तयार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची त्या पक्षाची खेळी कर्नाटकात एकदा यशस्वी झालीही आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना