शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

संपादकीय - लोक कुणाचे सांगाती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 06:28 IST

अलीकडच्या दोन घटनांचा या अनुषंगाने आवर्जून उल्लेख करायला हवा.

महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींच्या मालिकेतील आणखी एक घटना मंगळवारी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील निकालाने नोंदली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तसेच त्याचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह यावर १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडून  तो पक्ष स्थापन करणाऱ्या शरद पवारांची नव्हे तर अजित पवार यांची मालकी असल्याचा हा निकाल उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या शरद पवारांना प्रचंड धक्का आहे. केंद्रातल्या ज्या महाशक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ व आश्रय दिला, त्याच महाशक्तीमुळे हा निकाल आल्याच्या प्रतिक्रिया शरद पवारांच्या गोटातून उमटल्या आहेत.  विधिमंडळ पक्षात अजित पवार गटाचे तर मूळ पक्षाच्या संघटनेत शरद पवार यांचे वर्चस्व, अशी स्थिती दिसत होती. आयोगापुढील सुनावणीवेळी स्वत: शरद पवार हजर राहत होते. त्यामुळे निवडणूक आयोग काहीतरी समतोल निकाल देईल, अथवा चिन्ह गोठवून अंतिम सुनावणीपर्यंत हा मामला पुढे रेटला जाईल, असे वाटत असताना हा निकाल आला आहे. त्याची पृष्ठभूमी वेगळी आहे.

भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा संसार गुण्यागोविंदाने सुरू असल्याचे वाटत असताना गेल्या जुलैच्या प्रारंभी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. नऊ प्रमुख नेते बाहेर पडले व त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांची बंडाळी हा भूकंप समजला तर अजित पवार यांचे बंड ही त्सुनामी होती. कारण, त्यांनी थेट स्वत:च्या काकांना, राज्याच्या व देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या शरद पवारांना कात्रजचा घाट दाखवला होता. शिंदेंना किमान मुख्यमंत्रिपद मिळाले होते. अजित पवार आधीही उपमुख्यमंत्री हाेते व नंतरही. पंतप्रधानांनी दोन दिवस आधी महाराष्ट्रातील कथित सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर सोडलेल्या टीकास्त्रांचा वेगळा संदर्भ अजित पवारांच्या बंडाला होता, इतकेच. असो! स्वत:च स्थापन केलेल्या पक्षातून शरद पवार बेदखल होणे ही अनेक दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे. राज्यात उण्यापुऱ्या साठ वर्षांत अशी एकही घटना नसेल की जिचा संदर्भ शरद पवार यांच्याशी जोडला गेला नसेल. अगदी दुरान्वयेही संबंध नसलेल्या राजकीय विचारांच्या पक्षातील घटना, घडामोडींमागेही त्यांचाच हात असावा, अशी वदंता महाराष्ट्र ऐकत आला आहे.

अलीकडच्या दोन घटनांचा या अनुषंगाने आवर्जून उल्लेख करायला हवा. २०१४ ची विधानसभा निवडणूक पंचवीस वर्षांची युती मोडीत काढून भारतीय जनता पक्ष व शिवसेना स्वतंत्र लढले. आधीची पंधरा वर्षे राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या दोन्ही काँग्रेसही स्वतंत्र लढल्या आणि निकाल लागताच, राजकीय अस्थिरता नको म्हणत बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपला पाठिंबा देण्याची एकतर्फी घोषणा राष्ट्रवादीने करून टाकली. २०१९ च्या निवडणुकीत भाजप व सेना एकत्र लढली आणि स्पष्ट बहुमत मिळविले तरी निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार केला. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तर अशा रीतीने इतर पक्षांचेही डावपेच जिथे रचले जातात, शह-काटशहाचे राजकारण शिजते त्या पवारांना प्रथमच राजकीय शह दिला गेला आहे.

अजित पवारांनी लढाई जिंकली असली तरी युद्ध जिंकण्यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागतील. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक साधने व त्या बळावर कार्यकर्ते त्यांच्याकडे असले तरी आता त्यांचे रुसवेफुगवे काढण्यासाठी काका सोबत नाहीत. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणे, स्वत:चा नवा पक्ष व नवे चिन्ह घेऊन पुन्हा लोकांमध्ये जाणे, सहानुभूतीच्या बळावर पक्ष पुन्हा उभा करणे, गेल्या तीस-पस्तीस वर्षांत उभ्या झालेल्या नेत्यांना पर्याय तयार करणे आणि सोबतच काँग्रेस व शिवसेना सहभागी असलेल्या महाविकास आघाडीला राज्यात तर देशपातळीवर इंडिया आघाडीला बळ देणे, असे प्रचंड आव्हान शरद पवारांना पेलावे लागणार आहे. आपण आधीही अशा लढाया जिंकल्या आहेत, हा आत्मविश्वास कदाचित त्यांच्याकडे असेलही. तथापि, ८३ वर्षांचे वय तसेच आजाराचा अडथळा मोठा आहे. त्यांना आधार आहे तो लोकांशी, मतदारांशी थेट संपर्काचा. ते म्हणतात त्याप्रमाणे ‘लोक माझे सांगाती’साठी हा कसोटीचा काळ आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस