शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

ताराक्का नव्हे, समृद्धी हवी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:25 IST

नर्मदा आक्काच्या हाताखाली 'ती' तयार झाली आणि अनेक बाबतीत जिवंतपणीच दंतकथा बनली. नक्षल्यांच्या वर्तुळात क्राैर्यासोबतच साैंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जायची.

एकविसाव्या शतकातील पंचविसाव्या वर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्राच्या पूर्व टाेकावरील गडचिरोलीत समृद्धी, बरकतीची नवी पहाट घेऊन उजाडला. अमाप खनिजसंपत्तीचे कोठार असलेली गडचिरोली देशाची स्टील सिटी बनेल, इथे काही वर्षांत किमान एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, याची चर्चा वर्ष-दोन वर्षांत होतीच. तिथल्या कोनसरी पोलाद कारखान्याच्या विस्ताराचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बहुचर्चित सुरजागड लोहखाणीतील खनिज आता रस्त्यांंनी नव्हे तर बंदिस्त पाइपलाइनने आणले जाईल. लोहखनिजांची वाहने इंधनाऐवजी विजेवर चालतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथल्या आदिवासींच्या शिक्षण व आरोग्याच्या लाॅयड्स स्टील कंपनीने उभ्या केलेल्या सुविधांचे लोकार्पण झाले. अहेरी ते गर्देवाडा रस्त्यावरील नव्या पुलाचे उद्घाटन झाले. त्यामुळे महाराष्ट्राचा हा आग्नेय कोपरा छत्तीसगडशी जोडला गेला. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत प्रथमच त्या रस्त्यावर एसटी बस धावली. मुख्यमंत्र्यांनी त्या बसमधून प्रवास गेला. राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा दुर्गम भागातील पेनगुंडा येथे पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी खेडूत, महिलांशी संवाद साधला. 

या दिवसाचा उत्तरार्ध अधिक रोमांचक होता. हा परिसर कथित क्रांतीच्या नावाने रक्तरंजित वळणावर नेणारे अकरा जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण आले. नात्याला जंगलात अर्थ मिळालेल्या दोन जोडप्यांसह त्या आठ महिला व तीन पुरुषांच्या डोक्यावर तब्बल एक कोटीहून अधिक रकमेचे बक्षीस होते. या सर्वांनी बंदूक खाली ठेवून शरणागतीचा निर्णय घेतला. भारतीय राज्यघटनेची प्रत देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मुख्य प्रवाहात स्वागत केले. 

आता सरकारकडून त्यांचे पुनवर्सन केले जाईल. या शरणागतांमध्ये एक नाव धक्कादायक होते. ते म्हणजे साठी ओलांडलेली विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ ताराक्का. दंडकारण्य झोनल समितीची सदस्य. मूळची अहेरी तालुक्यातील किष्टापूरची ताराक्का नक्षली चळवळीत दाखल झालेली गडचिरोलीतील पहिली महिला. नर्मदा आक्काच्या हाताखाली ती तयार झाली आणि अनेक बाबतीत जिवंतपणीच दंतकथा बनली. नक्षल्यांच्या वर्तुळात क्राैर्यासोबतच साैंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जायची. मध्य भारतात ताराक्का नावाची एकेकाळी प्रचंड दहशत होती. अनेक नक्षली हल्ल्यांचा मास्टरमाइंड मल्लूजोला वेणूगाेपाल ऊर्फ भूपती हा तिचा पती तर कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी याची ती वहिनी. ताराक्काने पोलिस व संरक्षण दलांवरील अनेक हल्ल्यांचे नेतृत्व केले. ऑक्टोबर २००९ मध्ये भामरागडजवळ लाहेरी येथे १७ पोलिसांचा बळी घेणारा हल्ला त्यापैकी सर्वाधिक बहुचर्चित. नक्षल चळवळीत तिने तब्बल ३८ वर्षे काढली. या कालावधीत तिच्यावर ६५ हून अधिक गुन्हे नोंदले गेले. ती मोस्ट वाँटेड महिला नक्षली होती. तिला जिवंत वा मृत पकडून देण्यासाठी पंचवीस लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पंधरा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील अनेक दलममध्ये महिलांचा बोलबाला होता.

 साउथ गडचिरोली डिव्हिजनल कमिटीत नर्मदा आक्का व ताराक्का, टिपागड दलममध्ये ज्योती, चाटगाव दलममध्ये रणिता, देवरी दलमची सुनीता, सुरगाडची रंजिता, जिमलगट्टा दलमची सरोजा, अशा किती तरी महिला नक्षली सरकारविरोधातील रक्तरंजित लढाईत पहिल्या फळीत असायच्या. सरोजाला २००९ मध्ये अटक झाली. तिचा पती लंकापती रेड्डी ऊर्फ लचन्नानंतर वारंगल पोलिसांपुढे शरण आला. सेंट्रल कमिटीतील नर्मदा आक्काला नंतर पती सुधाकर ऊर्फ किरणसोबत अटक झाली. दोन वर्षांपूर्वी तिचे मुंबईत एक खासगी इस्पितळात कर्करोगाने निधन झाले. तसे मरण नको म्हणूनही ताराक्का शरण आली असावी. बाकी नावे हळूहळू विस्मृतीत गेली. मिलिंद तेलतुंबडे मारला गेला. नक्षल चळवळ खिळखिळी झाली. आता तिचे अखेरचे आचके सुरू आहेत. 

ताराक्काची शरणागती हा त्या भरकटलेल्या चळवळीला मोठा धक्का आहेच. शिवाय अनेक दशके रक्तात न्हाऊन निघालेल्या नक्षलग्रस्त भागाची नवी दिशा या शरणागतीने अधोरेखित केली आहे. ही दिशा समृद्धीची, आदिवासींच्या बदलत्या मानसिकतेची आहे. माओवादी चळवळीचे आकर्षण संपले आहे. नवी भरती बंद झाली आहे. दुसरीकडे लाॅयड्ससारख्या मोठ्या पोलाद उत्पादक कंपनीने रोजगाराचे मोठे दालन उघडले आहे. हजारो आदिवासी तरुण-तरुणींना रोजगार मिळू लागला आहे. त्या कंपनीने काल एक हजार कोटींचे समभाग कामगारांच्या नावाने केले. परिणामी, ते कामगार कंपनीचे मालक बनले. थोडक्यात या अरण्यप्रदेशाने, समाजाने रक्ताचा इतिहास पाठीवर टाकला आहे. तो आता ताराक्काच्या नव्हे तर समृद्धीच्या वाटेने भविष्याचा वेध घेईल.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीBJPभाजपा