शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

लोकशाहीचा महत्त्वाचा खांब असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याचा विजय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 12:41 IST

वृत्तपत्रांनी काय छापावे आणि काय नाही, यावर निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका वृत्तपत्र स्वातंत्र्यास बाधा आणणारी होती. ती अमान्य करताना न्यायालयाने बरे होण्यासाठी कडू औषध घेण्याची तयारी ठेवा, असे निवडणूक आयोगाला सुनावले आहे.

वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे प्रयत्न भारतात अधूनमधून होतच असतात. मात्र अशावेळी न्यायालये वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने धावून येतात. आताही एका प्रकरणात ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य हे अबाधित आहे आणि त्या स्वातंत्र्यावर गदा आणता कामा नये’, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. वृत्तपत्रांनी काय छापावे आणि काय नाही, यावर निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका वृत्तपत्र स्वातंत्र्यास बाधा आणणारी होती. ती अमान्य करताना न्यायालयाने बरे होण्यासाठी कडू औषध घेण्याची तयारी ठेवा, असे निवडणूक आयोगाला सुनावले आहे. विषय होता विधानसभा निवडणुकांचा.  कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही निवडणुकांच्या प्रचंड गर्दीच्या प्रचारसभांना आवर न घातल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने आयोगाला फारच कडक शब्दांत खडसावले होते. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंना तुमचे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि ते प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे आयोगाच्या अधिकाऱ्यांत खळबळच माजली. आतापर्यंत असे ताशेरे आयोगाने कोणाहीकडून ऐकले नव्हते आणि ते वृत्तपत्रांमार्फत जनतेपुढे जाण्याचाही प्रश्न आला नव्हता.

मद्रास न्यायालयाने मारलेले ताशेरे आणि त्यांना मिळालेली प्रसिद्धी याविरोधात आयोगाने सर्वोच्च न्यायालयातच धाव घेतली; पण तिथेही आयोगाच्या पदरी निराशाच पडली आहे. न्यायालयाने व्यक्त केलेली मते प्रत्यक्ष  निकालपत्राचा भाग नसतील वा त्यात त्यांचा उल्लेख नसेल,  तर ती प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध करता कामा नयेत, अशी विनंती आयोगाने केली होती. याशिवाय मद्रास उच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे प्रत्यक्ष निकालपत्रात नसल्याने ते कामकाजातूनही काढून टाकावेत, असेही आर्जव केले होते; पण सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या दोन्ही विनंत्या फेटाळून लावल्या आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला. आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन करतो, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या आयोगाने न्यायालयात नेमकी त्याविरुद्ध भूमिका घेतली आणि ती अंगाशी आली. मद्रास उच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे फारच कडक आहेत, ते टाळता आले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने बोलून दाखवले. पण ते कामकाजातून काढण्याची आयोगाची मागणीही अमान्य केली.

कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे मद्रासच्या न्यायाधीशांनी ही भाषा वापरली आहे, असे नमूद केले. हा भाग झाला न्यायालयाच्या ताशेऱ्यांचा. माध्यमांनी केवळ निकालपत्रे छापावित, अशी अपेक्षा बाळगू नका, न्यायालयीन सुनावणीत जे घडते, तेही प्रसिद्ध करण्याचा अधिकार वृत्तपत्रांना आहे, असेही ठणकावून सांगितले. अनेकदा सुनावणीत न्यायाधीश काही मतप्रदर्शन करतात; पण  त्यानुसार निकाल लागत नाही वा निकालपत्रात त्या मतांचा उल्लेखही नसतो. सुनावणीत काही वेळा अधिक माहिती मिळवण्यासाठी न्यायाधीश अनेक प्रश्न करतात, टिप्पणी करतात. हा भागही प्रसिद्ध व्हायलाच हवा. त्याशिवाय कोर्टात काय  चालले आहे, ते लोकांना कळणार तरी कसे, शिवाय सुनावणी खुली असेल आणि  विषय सार्वजनिकहिताचा वा महत्त्वाचा असेल तर ती  चर्चा, युक्तिवाद, प्रश्नोत्तरे लपवून का ठेवायची? वैवाहिक खासगीपणासारखा हा विषय नाही.  संवेदनशील विषयांवर न्यायालये इन कॅमेरा सुनावणी घेतात. ती प्रसिद्ध होत नाही; पण खुल्या न्यायालयातील सुनावणी लपवून ठेवणे ही सेन्सॉरशिपच ठरेल. तसे न्यायालयाने होऊ दिले नाही आणि आयोगाची मागणीवजा विनंती अमान्य केली, याला खूपच महत्त्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये न्यायालयीन सुनावणीचे थेट प्रसारण होते. गुजरात उच्च न्यायालयातही काही प्रमाणात त्याची सुरुवात झाली आहे. 

इंटरनेटच्या  युगात आणि सोशल मीडिया वेगाने वाढत असताना असे निर्बंध घालणे चुकीचे आणि ते अंमलात येणेही अशक्य. वृत्तपत्रांवर बंधने घातली आणि सोशल मीडियात तो मजकूर दिसला तर काय करणार? मद्रास कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर आयोगाने मतमोजणीसाठी, विजयी उमेदवारांसाठी बंधने जाहीर केली. प्रचाराच्या काळात ती घडली असती तर कोणी खडे बोल ऐकवले नसते. टी. एन. शेषन देशाचे निवडणूक आयुक्त असताना त्यांनी यंत्रणेत सुधारणा केल्या, राजकीय पक्ष, नेते यांच्यावर आचारसंहितेचे बंधन आणले. ते आता राहिल्याचे दिसत नाही, अशी टीका होत आहे. टीका होते, याचा आयोगाने विचार करावा आणि लोकशाहीचा महत्त्वाचा खांब असलेल्या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग