शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घटलेले ध्वनी आणि वायू प्रदूषण ही तर दिवाळीची खरी पहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 13:24 IST

अंधाराला दूर करणारा सण म्हणजे दिवाळी. खरं म्हणजे संस्कार शिकवणारा हा सण आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण यांच्या अनमोल उपदेशांना चिरंतर ठेवणारा हा सण आहे. दिवे, रांगोळी, कंदील ही या सणाची खरी ओळख.

विनायक पात्रुडकरअंधाराला दूर करणारा सण म्हणजे दिवाळी. खरं म्हणजे संस्कार शिकवणारा हा सण आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण यांच्या अनमोल उपदेशांना चिरंतर ठेवणारा हा सण आहे. दिवे, रांगोळी, कंदील ही या सणाची खरी ओळख. गेल्या काही वर्षांपासून हा सण अबालवृद्धांना त्रास देणारा ठरत आहे. ध्वनी, वायू प्रदुषणाला हा सण बळ देत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या सणाचे महत्त्व लुप्त होऊन मुजोरी, उन्माद जन्माला आला. या उन्माला निर्बंध घालणे अत्यावश्यक होते. प्रशासन व पोलीस स्तरावर हे शक्य नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या सणाला त्याचे मुळ रूप देणारा आदेश दिला. दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडू शकता, असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिले. गेली अनेक वर्षे पर्यावरण प्रेमी पर्यावरणपूरक दिवाळीचे आवाहन करत आहेत. या आवाहनाला न्यायालयाच्या आदेशाची साथ मिळाली आणि यावर्षी दिवाळी सण अपेक्षापेक्षा अधिक पारंपारिक पद्धतीने व कोणालाही त्रास देता साजरा झाला. याला अपवाद म्हणून रात्री १० नंतरही फटाके फोडण्याच्या घटना घडल्या. या घटना तुरळकच होत्या. त्याच्या तुलनेत ध्वनी व वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात घटले. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीपेक्षा या वर्षी प्रदुषण खूप कमी झाले. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. यासाठी न्यायालय, पर्यावरण प्रेमी व मुंबईकरांचे कौतुकच करायला हवे. शेवटी न्यायालयाचा मान राखणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

दिवाळीत होणारा कचरा उचलण्यासाठी मुंबई महापालिकेनेही तयारी केली होती. फटाके सर्वाधिक फोडले जात असलेल्या ठिकाणी तातडीने स्वच्छता करण्यासाठी पालिकेने खास पथक तयार केले होते. त्यामुळे सकाळपर्यंत कचरा राहिला नाही. पालिकेच्या दक्ष कारभारालाही शब्बासकी द्यायला हवी. गेल्या तीन दशकाचा काळ बघितला तर उत्सावातील उन्माद व अतिरेक झपाट्याने वाढत गेला. मिरवणुकीतील डीजे, दहिहंडीचे थर यात स्पर्धा सुरू झाली होती. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहिहंडी फोडण्यासाठी लागलेल्या थराने सर्वाधिक उंची गाठली होती. येथील ध्वनी प्रदुषणानेही उच्चांक गाठला होता. अखेर ठाण्यातीलच डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात ध्वनी प्रदुषणाविरोधात जनहित याचिका दाखल केली. दहिहंडीतील उंच थरांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने या दोन्ही याचिकांची दखल घेत उत्सवातील ध्वनी प्रदुषणाला व दहिहंडीतील थरांना निर्बंध घातले. या आदेशामुळे टेंभीनाक्यावरील ध्वनी प्रदुषण कमी झाले व त्यासोबतच राज्यभरात उत्सव मिरवुणकांतील आवाजावर निर्बंध आले. आता तर उत्सवात मिरवुणकीत डीजे नकोच अशी भूमिका राज्य शासनानेही न्यायालयात मांडली. अशा प्रकारे हळूहळू का होईना उत्सवातील उन्माद कमी होऊ लागला आहे. नागरिकांनीदेखील स्वत:हून पर्यावरणपूरक उत्सावासाठी पुढाकार घेतला आहे. गणपतीच्या मुत्या, विसर्जन या सर्व गोष्टीतून पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. होळीला पर्यावरणपूरक रंग वापरले जात आहेत. उत्सवांचे अशाप्रकारे चित्र बदलत असताना मुंबईकरांनी या वर्षी पर्यावरणपूरक दिवाळीवर अधिक भर दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस व प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे हे शक्य झाले आहे. यापुढेही नागरिकांनी उत्सावाचे मुळ स्वरूप कायम ठेवत सण आणि उत्सव साजरे करायला हवेत. कारण कोणाला त्रास देऊन उत्सव साजरे करणे हे  शोभण्यासारखे नाही. येणाऱ्या पिढीलाही ते आदर्श देणारे नाही. 

टॅग्स :Diwaliदिवाळीpollutionप्रदूषण