शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:27 IST

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले.

- धर्मराज हल्लाळे

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले. बहुतांश लोक एका बाजूचे आहेत म्हणून त्यांचा विचार वा कृती सर्वमान्य असावी असे नाही, हेच न्यायालयाने नमूद केले होते. त्यानंतर सण-उत्सवातील डीजेला तूर्त बंदी घालताना उच्च न्यायालयानेही शासन यंत्रणेची कानउघाडणी केली. त्यावर अंतिम निर्णय यायचा असला तरी न्यायालयाने सर्वच सण-उत्सव काळात होत असलेल्या गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करुन पाठ फिरवू शकत नाही, असे म्हटले आहे. एकंदर उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने जावा ही न्यायालयाची भुमिका आहे.

विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण घेतो. स्वाभाविकच थोर परंपरा आपला सांस्कृतिक वारसा समृद्घ करीत असतात. विविधतेत एकतेचा नारा आपण देतो. अर्थात इतरांच्या विचारांचा, श्रद्घेचा सन्मान करीत आपण आपले विचार आणि श्रद्घा जपली पाहिजे हे अभिप्रेत आहे. विविध समाजातील सण, श्रद्घा या ज्याच्या त्याच्या खाजगी आयुष्याचा भाग आहेत. राज्यघटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाच्या धर्म उपासनेचे स्वातंत्र्य अबाधित राहिल, यासाठी सर्वांनी कटिबद्घ राहिले पाहिजे. मात्र, सार्वजनिक उत्सव साजरे होताना इतरांच्या स्वातंत्र्याचा, हक्काचा संकोच होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्याच हेतूने घटनादत्त तरतुदींचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाचे भक्कम कवच आहे.

कोणत्याही सार्वजनिक उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने गेला पाहिजे. आज लोकजागरण होत आहे. पर्यावरणपूरक उत्सवाकडे लोक वळले आहेत. शासनही प्रोत्साहन देत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही अनेक मंडळे समाजोपयोगी उपक्रम राबविताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांनी वर्षभरापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम केले. यंदा राज्यातील नामांकित गणेश मंडळांनी ३७० मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या आवाहनाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. राज्यातील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषदांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’चे आवाहन केले होते. त्यासाठीही हजारो गावांनी पुढाकार घेतला. 

गणेश मंडळांनी देखाव्यांमधून सामाजिक प्रश्न मांडले. हे सर्व व्यापक पातळीवर होत आहे. परंतु ही प्रबोधनाची गती अधिक वेगाने वाढली पाहिजे. ज्या बांधिलकीतून सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचा पायंडा निर्माण झाला, त्या बांधिलकीशी सर्वांनी स्वत:ला जोडून घेतले पाहिजे.

टॅग्स :pollutionप्रदूषणGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८