शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:27 IST

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले.

- धर्मराज हल्लाळे

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले. बहुतांश लोक एका बाजूचे आहेत म्हणून त्यांचा विचार वा कृती सर्वमान्य असावी असे नाही, हेच न्यायालयाने नमूद केले होते. त्यानंतर सण-उत्सवातील डीजेला तूर्त बंदी घालताना उच्च न्यायालयानेही शासन यंत्रणेची कानउघाडणी केली. त्यावर अंतिम निर्णय यायचा असला तरी न्यायालयाने सर्वच सण-उत्सव काळात होत असलेल्या गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करुन पाठ फिरवू शकत नाही, असे म्हटले आहे. एकंदर उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने जावा ही न्यायालयाची भुमिका आहे.

विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण घेतो. स्वाभाविकच थोर परंपरा आपला सांस्कृतिक वारसा समृद्घ करीत असतात. विविधतेत एकतेचा नारा आपण देतो. अर्थात इतरांच्या विचारांचा, श्रद्घेचा सन्मान करीत आपण आपले विचार आणि श्रद्घा जपली पाहिजे हे अभिप्रेत आहे. विविध समाजातील सण, श्रद्घा या ज्याच्या त्याच्या खाजगी आयुष्याचा भाग आहेत. राज्यघटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाच्या धर्म उपासनेचे स्वातंत्र्य अबाधित राहिल, यासाठी सर्वांनी कटिबद्घ राहिले पाहिजे. मात्र, सार्वजनिक उत्सव साजरे होताना इतरांच्या स्वातंत्र्याचा, हक्काचा संकोच होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्याच हेतूने घटनादत्त तरतुदींचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाचे भक्कम कवच आहे.

कोणत्याही सार्वजनिक उत्सवाचा उत्साह प्रबोधनाच्या दिशेने गेला पाहिजे. आज लोकजागरण होत आहे. पर्यावरणपूरक उत्सवाकडे लोक वळले आहेत. शासनही प्रोत्साहन देत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही अनेक मंडळे समाजोपयोगी उपक्रम राबविताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांनी वर्षभरापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम केले. यंदा राज्यातील नामांकित गणेश मंडळांनी ३७० मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या आवाहनाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. राज्यातील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषदांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’चे आवाहन केले होते. त्यासाठीही हजारो गावांनी पुढाकार घेतला. 

गणेश मंडळांनी देखाव्यांमधून सामाजिक प्रश्न मांडले. हे सर्व व्यापक पातळीवर होत आहे. परंतु ही प्रबोधनाची गती अधिक वेगाने वाढली पाहिजे. ज्या बांधिलकीतून सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचा पायंडा निर्माण झाला, त्या बांधिलकीशी सर्वांनी स्वत:ला जोडून घेतले पाहिजे.

टॅग्स :pollutionप्रदूषणGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८