शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

उद्दाम आणि मुद्दाम! चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:10 IST

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो.

चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे’ अशा आशयाचे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच केले होते. त्याचा पुरावा पुन्हा मिळाला आहे. सीमेवर जोवर शांतता नाही, तोवर उभय देशांमध्ये कोणतेही संबंध विकसित होऊ शकत नाहीत, असेही जयशंकर म्हणाले होते. भारत आणि चीन हे परस्परांचे शेजारी. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश हे भारत-चीन सीमेवरचे भारतीय प्रदेश. १९६२च्या युद्धानंतर या दोन देशांमधील प्रत्यक्ष ताबारेषा या क्षेत्रांमध्ये विभागली गेली. भारताचे भूराजकीय स्थान, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय पटलावरील महत्त्व आणि सर्वंकष क्षमता यामुळे भारताच्या विरोधात पाकिस्तानला बळ देण्याचा प्रयत्न चीनने सातत्याने सुरू ठेवला आहे. याचा अर्थ चीनचे सारे आलबेल सुरू आहे, असे नाही. सध्या तर चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ आहे. अशाच कालखंडात बाह्य आक्रमण करून स्थानिक मुद्यांवरून लक्ष विचलित करणे ही जिनपिंग यांची व्यूहरचना असू शकते.

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो. चीनमध्ये नुकतेच कम्युनिस्ट पक्षाचे  जे अधिवेशन झाले, त्या अधिवेशनात गलवान खोऱ्यामध्ये उडालेल्या चकमकीची फिल्म दाखवण्यात आली. जिनपिंग यांच्यासाठी भारत किती ‘महत्त्वाचा’ आहे, हे तेव्हाच सिद्ध झाले. दक्षिण आशियात भारत हा बलशाली देश आहे. मात्र, भारताच्या सोबत कोणताही देश असू नये, हा चीनचा प्रयत्न जुना आहे. भूतान हा भारताचा खात्रीचा मित्र. त्यामुळे चीनने भूतानलाही धमकावले. गेल्या आठवड्यातच ही माहिती उजेडात आली. काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेच्या सैन्याने उत्तराखंडमधील औली येथे संयुक्त सराव केला. त्यावर चीनचा तीव्र आक्षेप होता. भारताकडे चीनचे बारकाईने लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर तवांगमध्ये भारत आणि चीनमध्ये झालेला सैन्यसंघर्ष नवा पेच निर्माण करणार आहे. लडाखमधील तणाव कायम असताना या संघर्षाने भारताची चिंता वाढली आहे. तवांगची प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडण्याचा प्रयत्न चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केला. त्याला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरही दिले. अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेवरून काही ठिकाणी वाद आहेत. दोन्ही देशांचे सैनिक तिथे गस्त घालत आहेत. गेली दीड दशके हेच चित्र आहे.

भारत-चीनमध्ये असणारा ताण नवा नाही. मात्र, लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वीच्या संघर्षानंतरची ही अशी पहिलीच चकमक आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने तवांग परिसरात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ बरीच जमवाजमव केली आहे. चीनही शांत बसलेला नाही. प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळ सरकण्याचा चीनचा प्रयत्न  सुरू आहेच. पश्चिम क्षेत्रामध्ये ताबारेषेचा भंग करण्याचा प्रयत्न चीनने अनेक वेळा केला आहे. आताचा हल्ला आकस्मिक नाही. तो पूर्वनियोजित असावा, असे दिसते. चीन योग्य वेळेची  वाट पाहत होता. ढगाळ वातावरण आणि बर्फवृष्टी यामुळे चीनला हा संघर्ष सोपा जाईल, असा आडाखा असणार. भारतीय सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामुळे मूळ चिंता मात्र संपलेली नाही. संसदेत या मुद्यावर मंगळवारी जी चर्चा झाली, ती पक्षीय स्वरूपाची आणि उथळ होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप करून या प्रश्नाकडे पाहता येणार नाही. पंतप्रधान नेहरू असोत अथवा मोदी, चीन तेवढाच धोकादायक आहे. तरीही चीनशी संबंध, संवाद कायम ठेवण्याचे आव्हान आहे.

चीन हा सामरिक-राजकीय क्षेत्रांप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातही आक्रमक धोरण राबवणारा देश आहे. चीनच्या विस्तारवादाचा भारत विरोधक आहे; पण दुसऱ्या बाजूला चीनवरचे आपले जे आर्थिक अवलंबित्व आहे, ते आपण पूर्णपणे झुगारून देऊ शकलेलो नाही. साठच्या दशकातील ‘हिंदी-चिनी भाई भाई’ हे खरे नाही, तसेच एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातले ‘चिंडिया’चे स्वप्नही खरे नाही. तरीही दोन्ही देश एकमेकांचे शत्रू होणे दोघांच्याही हिताचे नाही. अशावेळीच  राजकीय शहाणपणाची खरी परीक्षा असते. ‘जी-२०’ शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या कार्यगटांच्या बैठका देशभर सुरू आहेत. अशावेळी उद्दाम चीन मुद्दाम या चकमकी घडवत असताना तर ही परीक्षा आणखी तातडीची झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन