शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

उद्दाम आणि मुद्दाम! चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:10 IST

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो.

चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे’ अशा आशयाचे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच केले होते. त्याचा पुरावा पुन्हा मिळाला आहे. सीमेवर जोवर शांतता नाही, तोवर उभय देशांमध्ये कोणतेही संबंध विकसित होऊ शकत नाहीत, असेही जयशंकर म्हणाले होते. भारत आणि चीन हे परस्परांचे शेजारी. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश हे भारत-चीन सीमेवरचे भारतीय प्रदेश. १९६२च्या युद्धानंतर या दोन देशांमधील प्रत्यक्ष ताबारेषा या क्षेत्रांमध्ये विभागली गेली. भारताचे भूराजकीय स्थान, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय पटलावरील महत्त्व आणि सर्वंकष क्षमता यामुळे भारताच्या विरोधात पाकिस्तानला बळ देण्याचा प्रयत्न चीनने सातत्याने सुरू ठेवला आहे. याचा अर्थ चीनचे सारे आलबेल सुरू आहे, असे नाही. सध्या तर चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ आहे. अशाच कालखंडात बाह्य आक्रमण करून स्थानिक मुद्यांवरून लक्ष विचलित करणे ही जिनपिंग यांची व्यूहरचना असू शकते.

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो. चीनमध्ये नुकतेच कम्युनिस्ट पक्षाचे  जे अधिवेशन झाले, त्या अधिवेशनात गलवान खोऱ्यामध्ये उडालेल्या चकमकीची फिल्म दाखवण्यात आली. जिनपिंग यांच्यासाठी भारत किती ‘महत्त्वाचा’ आहे, हे तेव्हाच सिद्ध झाले. दक्षिण आशियात भारत हा बलशाली देश आहे. मात्र, भारताच्या सोबत कोणताही देश असू नये, हा चीनचा प्रयत्न जुना आहे. भूतान हा भारताचा खात्रीचा मित्र. त्यामुळे चीनने भूतानलाही धमकावले. गेल्या आठवड्यातच ही माहिती उजेडात आली. काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेच्या सैन्याने उत्तराखंडमधील औली येथे संयुक्त सराव केला. त्यावर चीनचा तीव्र आक्षेप होता. भारताकडे चीनचे बारकाईने लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर तवांगमध्ये भारत आणि चीनमध्ये झालेला सैन्यसंघर्ष नवा पेच निर्माण करणार आहे. लडाखमधील तणाव कायम असताना या संघर्षाने भारताची चिंता वाढली आहे. तवांगची प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडण्याचा प्रयत्न चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केला. त्याला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरही दिले. अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेवरून काही ठिकाणी वाद आहेत. दोन्ही देशांचे सैनिक तिथे गस्त घालत आहेत. गेली दीड दशके हेच चित्र आहे.

भारत-चीनमध्ये असणारा ताण नवा नाही. मात्र, लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वीच्या संघर्षानंतरची ही अशी पहिलीच चकमक आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने तवांग परिसरात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ बरीच जमवाजमव केली आहे. चीनही शांत बसलेला नाही. प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळ सरकण्याचा चीनचा प्रयत्न  सुरू आहेच. पश्चिम क्षेत्रामध्ये ताबारेषेचा भंग करण्याचा प्रयत्न चीनने अनेक वेळा केला आहे. आताचा हल्ला आकस्मिक नाही. तो पूर्वनियोजित असावा, असे दिसते. चीन योग्य वेळेची  वाट पाहत होता. ढगाळ वातावरण आणि बर्फवृष्टी यामुळे चीनला हा संघर्ष सोपा जाईल, असा आडाखा असणार. भारतीय सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामुळे मूळ चिंता मात्र संपलेली नाही. संसदेत या मुद्यावर मंगळवारी जी चर्चा झाली, ती पक्षीय स्वरूपाची आणि उथळ होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप करून या प्रश्नाकडे पाहता येणार नाही. पंतप्रधान नेहरू असोत अथवा मोदी, चीन तेवढाच धोकादायक आहे. तरीही चीनशी संबंध, संवाद कायम ठेवण्याचे आव्हान आहे.

चीन हा सामरिक-राजकीय क्षेत्रांप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातही आक्रमक धोरण राबवणारा देश आहे. चीनच्या विस्तारवादाचा भारत विरोधक आहे; पण दुसऱ्या बाजूला चीनवरचे आपले जे आर्थिक अवलंबित्व आहे, ते आपण पूर्णपणे झुगारून देऊ शकलेलो नाही. साठच्या दशकातील ‘हिंदी-चिनी भाई भाई’ हे खरे नाही, तसेच एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातले ‘चिंडिया’चे स्वप्नही खरे नाही. तरीही दोन्ही देश एकमेकांचे शत्रू होणे दोघांच्याही हिताचे नाही. अशावेळीच  राजकीय शहाणपणाची खरी परीक्षा असते. ‘जी-२०’ शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या कार्यगटांच्या बैठका देशभर सुरू आहेत. अशावेळी उद्दाम चीन मुद्दाम या चकमकी घडवत असताना तर ही परीक्षा आणखी तातडीची झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन