शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोठेवाडी ते तोंडोळी; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:26 IST

गाव गोळा झाला तर महिलांच्या अब्रूला हात घालण्याची हिंमत कुणीच दाखवू शकत नाही. गाव सर्वार्थांनी पांगलेला आहे; म्हणून गुन्हेगारांचे फावते आहे.

दरोडेखोरांनी महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडोळी वस्ती हादरली. दरोडेखोरांनी अगोदर घरातील पुरुषांचे हातपाय बांधले. त्यानंतर दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केला. ते केवळ पैसे लुटून थांबले नाहीत, तर मायभगिनींना उद्ध्वस्त करून गेले. दरोडेखोरांचा हा असा काही पहिलाच हैदोस नव्हे. महिलांच्या अशाच असाहाय्य किंकाळ्या राज्यात नगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथे २००१ साली ऐकायला मिळाल्या होत्या. कोठेवाडीतही दरोडेखोरांनी महिलांवर सामूहिक अत्याचार केले. त्या घटनेने ग्रामीण महाराष्ट्राची असुरक्षितता चव्हाट्यावर आली.  कोठेवाडी इतकी दुर्गम होती की, दरोड्यानंतर त्या हादरलेल्या वाडीला धीर देण्यासाठी तेथे  विशेष पोलीस चौकी सुरू करावी लागली. आता वीस वर्षांनंतर त्या घटनेतील आरोपी शिक्षा भोगून बाहेर आले. त्यातून ही वाडी आजही भेदरलेली आहे. तेथे सध्याही रोज पोलिसांचा बंदोबस्त आहे.

ग्रामीण भागात दरोड्यासारख्या गंभीर घटना व त्यात जे अत्याचार होतात, त्यांचे संबोधन म्हणून ‘कोठेवाडी’ समोर येते, एवढी ती घटना क्रूर होती. कोठेवाडी प्रकरणानंतर आपण काय धडा घेतला? हा प्रश्न तोंडोळीमुळे जिवंत झाला आहे. आता कदाचित आपले गृह खाते दावा करील की ‘आम्ही गुन्हेगारांचे धागेदोरे लवकरच शोधू’. पण, अशा धागेदोऱ्यांच्या गाठी बांधून नंतर पतंगबाजी करण्यात काय फायदा? अशा घटनांचे सामाजिक ऑडिट कधी होणार?  कोठेवाडी व तोंडोळीत एक साम्य आहे. या दोन्ही दरोड्यांच्या पूर्वी दरोडेखोरांनी मद्यप्राशन केले होते. म्हणजे त्यांच्या हाती शस्त्रे होती व मेंदूवर मद्याचा अंमल. पोलीस दरोडेखोरांची शस्त्रे जप्त करतात. पण, पोटातील दारूने त्यांना झिंगविले व पशू बनविले ती जबाबदारी कुणाची?
जुलै २०१६ साली कोपर्डीत शालेय मुलीवर अत्याचार झाला. त्यातून महाराष्ट्र पेटला. तेही आरोपी दारू प्यायलेले होते. म्हणजे एकप्रकारे दारू अत्याचाऱ्यांना पेटविते, गुन्ह्यांना जन्म देते. या महिलांवर दरोडेखोरांसोबत दारूनेही अत्याचार केला, असाही श्लेष यातून निघतो.  सरकारला दारूतून महसूल हवा आहे. पण, ‘दारू’ आणि गुन्हेगार यांची ‘सोयरिक’ सरकार तपासात नाही. दारू पिणे हा माणसांचा अधिकार असेल, तर त्यातून आपण बेताल व विकृत होणार नाही, सामाजिक हानी करणार नाही, याची हमी या दारुड्यांकडून घ्यायला हवी. दारू पिण्यासाठी व जवळ बाळगण्यासाठी  परवाना लागतो. दारूविक्रेते असा परवाना तपासत नाहीत व त्याची नोंदही ठेवत नाहीत. रेशनवरील ग्राहकांची नोंद आहे. मद्यप्यांची मात्र नाही. दारू पिऊन बेभान होणाऱ्या या ठगांची नोंद झाली तर अनेक गुन्हे तत्काळ उघडकीस येतील. गुन्हेगार जन्माला घालणाऱ्या अनेक कारणांपैकी दारू हेही एक कारण आहे; पण, सरकार त्यावर इलाज करायला तयार नाही.तोंडोळी खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी होईल. हाही एक सोपस्कारच झाला आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी म्हणून लाखोंचे मोर्चे निघाले. त्या प्रकरणात आजही तारीख पे तारीख सुरू आहे. न्यायालयांच्या तारखा वाढत आहेत, दुसरीकडे महिलांवरील अत्याचारही. वर्षानुवर्षे अत्याचारही कोर्टांच्या फायलींमध्ये निपचित पडून असतात. न्यायाचा पुकारा तेवढा सुरू असतो. गुन्हे घडले की समाज पोलिसांना दोष देतो; पण, सामाजिक ‘पोलिसिंग’ची जबाबदारी समाजही घेत नाही. नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावाकडे ग्रामसुरक्षेसाठी एक टोल फ्री क्रमांक आहे. आपत्तीच्या प्रसंगी त्याद्वारे प्रत्येक गावकऱ्याच्या मोबाईलवर संदेश येतो. साधा डोंगर पेटला तर दहा मिनिटांत गाव गोळा होते. ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ या संस्थेने साडेतीन हजार गावांत अशी सुविधा दिली आहे. सरकारने ही यंत्रणा प्रत्येक गावात कार्यान्वित करावी यासाठी या संस्थेने सरकारचे उंबरठे झिजविले. पण, तिची दखल घेतली गेली नाही.मोबाईल व इंटरनेटची संवाद यंत्रणा खेडोपाडी पसरलेली आहे. आपल्या ग्रामपंचायती ‘ई पंचायती’ असल्याचा डांगोरा पिटला जातो. मंदिर, मस्जिद व इतरही प्रार्थनास्थळांवर गावोगावी भोंगे आहेत. ही सर्व यंत्रणा आपत्तीच्या प्रसंगी व महिलांची अब्रू वाचविण्यासाठी गावाला हाळी का देत नाही?  गाव गोळा झाला तर महिलांच्या अब्रूला हात घालण्याची हिंमत कुणीच दाखवू शकत नाही. गाव सर्वार्थांनी पांगलेला आहे; म्हणून गुन्हेगारांचे फावते आहे.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटला