शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शीला दीक्षितांच्या जाण्याने राजकारणातील प्रामाणिक अन् विश्वासू नेतृत्व हरपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:17 IST

काही नेते एका पक्षाचे असले तरी सर्व पक्षांना त्यांच्याविषयी आदर वाटत असतो. शीला दीक्षित त्या थोड्या नेत्यांत होत्या. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीवर कार्यक्षमता आणि सचोटीचा शिक्का होता. कुणालाही कोणताही आरोप करता आला नाही.

शीला दीक्षित यांच्या निधनाने केवळ दिल्ली शहर व काँग्रेस पक्ष यांचीच नव्हे तर साऱ्या देशाची फार मोठी हानी झाली आहे. निष्ठावान, पारदर्शी, अनुभवी आणि कार्यक्षम अशा विशेषणांवर अधिकार सांगणारी जी थोडी माणसे देशाच्या राजकारणात होती व आहेत त्यात शीला दीक्षित या फार वरच्या क्रमांकावर राहिल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर ओळीने तीन वेळा निवडून आलेल्या शीलाजी यांनी त्या शहराचा चेहरामोहरा बदलून त्याला जागतिक दर्जाचे शहर बनविले.

तसे करीत असताना त्याचा ऐतिहासिक व पारंपरिक वारसाही त्यांनी अतिशय काळजीने जपला. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीवर कार्यक्षमता, सचोटी आणि स्वच्छता यांचा शिक्का होता. त्या सबंध काळात त्यांच्यावर कुणालाही कोणताही आरोप कधी करता आला नाही आणि ज्या राजकारण्यांनी तो केला त्यांना लोकांनी फारसे महत्त्व दिले नाही. १९९४ मध्ये त्यांचे श्वसूर व इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सदस्य दिवंगत उमाशंकर दीक्षित यांनी त्यांना राजकारणात आणले. त्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही होत्या. संयुक्त राष्ट्रसंघटनेत त्यांनी अनेकवार भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

गेल्या दोन निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या केजरीवालांनी त्यांच्यावर कमालीची विषारी टीका केली. ती त्यांच्या मनाला लागलीही. त्याचमुळे आम आदमी पार्टीशी समझोता नको अशी ठाम भूमिका त्यांनी गेल्या निवडणुकीत घेतली. केजरीवालांनाही आपल्या टीकेचा नंतर पश्चात्ताप झाला. कारण जनतेच्या मनात शीला दीक्षित यांनी केलेली कामे होती, दिल्लीची मेट्रो रेल्वे त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाली व ती नफ्यातही चालली. त्यांचा स्वभाव व सामान्य माणसांशी असलेले त्यांचे आत्मीयतेचे संबंधही लोकांच्या स्मरणात होते. त्याचमुळे जानेवारी महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींनी त्यांचेच नाव पक्षाच्या नेत्या म्हणून पुढे केले. त्या कामालाही लागल्या होत्या. शहरात ब्लॉक व इतर समित्यांच्या नेमणुकांचे काम त्यांनी हाती घेतले होते. तशात त्यांना हा मृत्यू आला. दु:ख याचे की ज्या काळात काँग्रेस पक्ष देश व लोकशाही यांना प्रामाणिक व विश्वासू नेत्यांची गरज आहे त्या काळात तो आला. दिल्लीत आप पक्ष संपला आहे आणि काँग्रेसकडे कार्यक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे भाजपला तेथे लोकसभेच्या सातही जागा जिंकता आल्या. विधानसभेसाठी होणारी लढत चांगली करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले असताना शीला दीक्षित यांना असे जावे लागले आहे. देशाच्या राजकारणात स्त्रियांचे प्रमाण फार कमी आहे. तशातही यशस्वी व स्वतंत्र राजकारण करणाऱ्या आणि तशा भूमिका घेणाऱ्या स्त्रिया फारच थोड्या आहेत.

बहुसंख्य स्त्रिया नेत्यांच्या सांगण्यानुसार व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आहेत. आपले ज्ञान, वय व अधिकार यांच्या बळावर नेतृत्वात मार्गदर्शन करण्याचे अधिकार फारच थोड्या स्त्रियांना आजवर मिळविता आले आहेत. शीला दीक्षित यांचा अधिकार असा होता. त्यांनी प्रसंगी इंदिरा गांधींना मार्गदर्शन केले आणि अनेकदा राहुल गांधींना त्यांचा निर्णय त्यांनी बदलायला लावला. राष्ट्रीय नेतृत्वावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा असा प्रभाव याआधी क्वचितच कुणा स्त्रीला प्राप्त करता आला आहे. शीला दीक्षित यांचे व्यक्तिमत्त्व सौम्य, संयमी व त्यांना पाहताच कुणालाही त्यांच्याविषयी आस्था वाटावी असे होते. त्या राजकारणी कमी व गृहस्थाश्रमी अधिक होत्या.

लोकांशी असणारे त्यांचे संबंधही राजकीय असण्याहून सामाजिक व कौटुंबिक पातळीवरचे अधिक होते. त्याचमुळे त्यांच्या निधनाविषयीची हळहळ देशातील जवळजवळ प्रत्येकच पक्षांनी व पक्षनेत्यांनी व्यक्त केली आहे. सामान्य माणसेही त्यांच्या जाण्याने अशीच मनातून दु:खी झाली आहेत. ज्या दिल्ली शहराला त्यांनी आपली कर्मभूमी मानले व ज्याच्या सेवेत आपले सारे आयुष्य त्यांनी घालविले त्या शहराला यापुढे त्यांची उणीव कायमच जाणवणार आहे. त्याचवेळी राहुल गांधींसह काँग्रेस पक्षालाही त्यांचे जाणे कायमचे दुखावणारे ठरणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण