शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 07:24 IST

कोणत्याही व्यवस्थेचा केंद्रबिंदू माणूस असायला हवा. इथे मात्र ‘सिस्टिम’च्या नावाखाली माणूस चिरडला जातो आहे. भारतात पाऊल ठेवताच त्यांचं आयुष्य पासपोर्टच्या कव्हरमध्ये बंद झालं आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि सगळ्यांचेच जगणे त्यांनी अवघड करून टाकले. ‘अमेरिका फर्स्ट’ असे म्हणताना त्यांना अमेरिकेशिवाय अन्य कोणाचाही विचार करायचा नाही, असे ठरवून टाकले. ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर आणि संकुचित भूमिकेमुळे जगाला धोक्याच्या वळणावर उभे केले आहे. कधी ते टेरिफ वाढवतात, तर कधी व्हिसावर निर्बंध लादतात. व्हिसासंदर्भात नवीन नियम आणतात. शुल्क वाढवतात. आता नवीच चिंता उभी ठाकली आहे. अमेरिकेतील कामाच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी भारतात आलेले शेकडो भारतीय एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत! अमेरिकेच्या वाणिज्यदूत कार्यालयांनी अचानक व्हिसा मुलाखती रद्द केल्या. काही पुढे ढकलल्या. काहींची स्वप्ने बेचिराख झाली. कैकजण शब्दशः ‘त्रिशंकू’ झाले आहेत. एचवन-बी व्हिसा हा काही फक्त कागदाचा तुकडा नाही. तो आयुष्याचा आराखडा असतो. नोकरी, घर, कर्ज, मुलांचे भविष्य हे सगळे त्या एका स्टॅम्पवर अवलंबून असते. तो स्टॅम्प उशिरा मिळाला, की आयुष्याचा संपूर्ण ताळेबंदच कोलमडतो. आज जे शेकडो लोक भारतात अडकले आहेत, त्यांची अडचण वैयक्तिक नाही; ती संस्थात्मक आहे. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट ठळकपणे दिसते आहे. व्यवस्था महत्त्वाची आहे, पण माणूस कुठे आहे?

कोणत्याही व्यवस्थेचा केंद्रबिंदू माणूस असायला हवा. इथे मात्र ‘सिस्टिम’च्या नावाखाली माणूस चिरडला जातो आहे. या व्हिसाधारकांपैकी अनेकांनी अमेरिकेत घरं घेतली आहेत. कर्जे घेतली आहेत. मुलं शाळेत घातली आहेत. नोकऱ्यांवर अवलंबून जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत, पण भारतात पाऊल ठेवताच त्यांचं आयुष्य पासपोर्टच्या कव्हरमध्ये बंद झालं आहे. ‘थोडा उशीर होईल’, असं सांगितलं जातं; पण या ‘थोड्या’चा कालावधी कोणालाच माहीत नाही. अनिश्चिततेचा हा काळ केवळ प्रशासकीय नाही. तो मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेबाहेर प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला म्हणजे अप्रत्यक्ष कबुली आहे. व्यवस्थेवर कंपन्यांचाही विश्वास उरलेला नाही. यांना कौशल्य हवे आहे, पण माणसाला स्थैर्य द्यायची तयारी नाही! एचवन-बी व्हिसा हा मुळात तात्पुरता कार्यक्रम. तीन वर्षांचा कालावधी, त्यानंतर आणखी तीन वर्षांची वाढ. अटी पूर्ण केल्यास पुढे मुदतवाढ. कागदोपत्री सगळे नीट आहे, पण वास्तवात हा ‘तात्पुरता’ शब्द अनेकांच्या आयुष्यभराचा होतो. वर्षानुवर्षे अमेरिका चालते त्यांच्या कौशल्यावर; पण त्यांना कायमचे स्वीकारण्याची तयारी मात्र नसते. काम स्वीकारले जाते; माणूस मात्र संशयाच्या भोवऱ्यात असतो. या कार्यक्रमाचा सर्वांत मोठा लाभार्थी भारत आहे. ७१ टक्के एच वन-बी व्हिसाधारक भारतीय आहेत. हे कौतुकाचे आहे आणि विचार करायला लावणारेही. कारण एकीकडे आपण जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळ पुरवतो, तर दुसरीकडे तेच मनुष्यबळ परदेशी व्यवस्थांच्या निर्णयांवर पूर्णपणे अवलंबून असते. आज अमेरिकेतील निर्णयांचा फटका भारतात बसतो आहे. अमेरिकेने आता एचवन-बी आणि एचफोर व्हिसा अर्जदारांसाठी व्यापक डिजिटल तपासणी लागू केली आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन उपस्थिती, डिजिटल वर्तन हे सगळे तपासले जाणार आहे. हेतू समजण्यासारखा आहे. पण प्रश्न असा आहे की, तपासणीच्या नावाखाली प्रक्रिया इतकी संथ, अस्पष्ट का? एवढी मनमानी का? ‘जागतिक इशारा’ देऊन सगळ्यांना संशयित ठरवणे हा कोणता न्याय? ज्या स्थलांतरितांनी अमेरिकेला घडवले, वाढवले, त्यांना असे छळणे हा कृतघ्नपणा आहेच, पण प्रश्न केवळ अमेरिकेचा नाही; भारताचाही आहे.

आपल्या कुशल नागरिकांना परदेशात अडकून पडावे लागत असेल, तर भारतात त्यांच्यासाठी पर्याय का नाहीत? परत यायचे ठरवले तरी त्यांना योग्य संधी, पायाभूत सुविधा, सुरक्षितता हे सारे मिळते का? आपल्या देशात अधिक उज्ज्वल भविष्य आहे, असे आपल्याच माणसांना का वाटत नाही? ‘अमेरिकन ड्रीम’ त्यांना खुणावते, पण भारतात राहणे स्वप्नभंगाचे का वाटते? अमेरिकेने काय करायचे ते करावे. आपण मात्र आपले भविष्य अमेरिकेवर अवलंबून ठेवता कामा नये. आपल्याला अमेरिकेची गरज आहे, हे नाकारण्याचे कारण नाही. मात्र, तेवढीच अमेरिकेलाही आपली आवश्यकता आहे. आपण असे याचकाच्या भूमिकेत असता कामा नये. प्रसंगी अमेरिकेला ठणकावायला हवे. शिवाय, तसे पर्याय आपणही उभे करायला हवेत. नाही तर, माणसं अशीच त्रिशंकू होतील आणि व्यवस्था अधिकच अमानुष होत जाईल!

English
हिंदी सारांश
Web Title : H-1B Visa Holders in Limbo: A Crisis of Uncertainty and Insecurity

Web Summary : H-1B visa holders face uncertainty as renewals stall, disrupting lives and careers. The US system prioritizes process over people, leaving Indian professionals stranded. India needs to create opportunities at home, reducing reliance on foreign policies and offering a secure future for its talent.
टॅग्स :Americaअमेरिका