शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 08:34 IST

भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या मालिकेदरम्यान जायबंदी झाले, काहींनी रजा घेतली. मालिका सुरू होतानाच दुखापतींनी भारतीय संघाला छळले.

सध्याचा काळच असा आहे की, केव्हा काय व्हायरल होईल याला काही धरबंद  नाही. काल जे शिखरावर होतं, ते आज विस्मृतीतही गेलेलं असतं. मात्र, काही गोष्टी अपवाद असतात आणि काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरतात. इंग्लंड संघावरच्या मालिका विजयानं भारतीय क्रिकेटनंही पुन्हा तेच सिद्ध केलं की, या बोलघेवड्या काळातही केवळ गुणवत्ता, मेहनत, सातत्य आणि ध्यास, याच गोष्टी ‘विजयी’ होण्यासाठी पुरेशा ठरतात! भारतीय फलंदाज शुभमन गिलनं चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान  प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं एक वाक्य पोस्ट केलं होतं, त्यात तरुण खेळाडूंना उद्देशून द्रविड म्हणतात, ‘इफ नॉट यू, देन हू? इफ नॉट नाऊ, देन व्हेन?’ तरुण खेळाडूंना हा थेट सवाल होता  ‘आज नाही तर कधी आणि तू नाही, तर कोण?’ भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या मालिकेदरम्यान जायबंदी झाले, काहींनी रजा घेतली. विराट कोहलीची अनुपस्थिती छळणार अशी चिन्हं होतीच. पुजारा-रहाणे या मातब्बरांना बाहेर बसवून निवड समितीने नव्या खेळाडूंवर भिस्त ठेवली. मालिका सुरू होतानाच दुखापतींनी भारतीय संघाला छळले.

कर्णधार रोहित शर्मासमोर नव्या अननुभवी खेळाडूंना सोबत घेऊन चालण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. याच क्रिकेट मालिकेत पदार्पण करणारे ध्रृव जुरेल, सरफराज खान, आकाश दीप हे एकीकडे, तर दुसरीकडे यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादवसारखे कसोटीत दावेदारी सांगणारेही तसे नवखेच. त्यात समोर उभा ठाकलेला इंग्लंडचा बेझबॉल चक्रव्यूह. बेझबॉलच्या रणनीतीवर कसोटी सामने जिंकतच इंग्लंड संघ भारतात आला होता. अशा परिस्थितीत युवा भारतीय संघाला प्रशिक्षक द्रविड विचारत होते, तू नाही तर कोण? तरुण भारतीय खेळाडूंसमोर स्वत:ला सिध्द करण्याचं आव्हान होतं. एकतर कसोटीत संधी मिळणं मुश्कील आणि मिळूनही स्वत:ला सिध्द करता आलं नाही तर पुन्हा ते कवाड कधी उघडेल याची काही खात्री नाही. या देशात अनेक गुणवान खेळाडू क्रिकेटसाठी जीव ओततात. एरवी बिहारमधल्या सासाराम  गावच्या एका क्रिकेटवेड्या तरुणानं द्रविड यांच्या हस्ते भारतीय  ‘टेस्ट कॅप’ स्वीकारली असती का? - हे होत असताना त्याच्या दोन लहान बहिणी आणि आई डोळ्यात पाणी आणून मैदानात उभ्या असतात. कारगील युद्धात लढलेल्या सैनिकाचा त्याच काळात जन्मलेला मुलगा ध्रुव मॅचविनर ठरतो तो केवळ क्रिकेटध्यासापायी. तीच गोष्ट दुनियेच्या लेखी संपलेल्या सरफराज खानची. तो कधीच भारतीय संघात पोहोचणार नाही असं वाटत असताना त्याला संधी मिळाली आणि त्यानं आपलं नाणं वाजवून दाखवलं. तसंही नव्या काळात अशा वेदनांच्या कथा यशोगाथा म्हणून सर्रास विकल्या जातात. पण या नव्या युवा खेळाडूंना स्वत:च्या संघर्षाचं भांडवल करण्याची गरज नाही, त्यांनी स्वत:ची खरी ओळख आपल्या कामगिरीने मैदानावर सिध्द केली. आपल्या कष्टांना गोंजारत न बसता त्यांनी अत्त्युत्तमाचा ध्यास घेतला. त्यांचं यश हे आज  आपल्या स्वप्नांसाठी रक्ताचं पाणी करायला निघालेल्या खेड्यापाड्यातल्या तरुण भारताचं यश आहे. त्या यशाचं काही श्रेय बीसीसीआयलाही द्यायला हवं.

दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातल्या शहरांपर्यंत क्रिकेटसुविधा पाेहचवण्याचे गेल्या अनेक वर्षांचे प्रयत्न आता फळास येत आहेत. क्रिकेट झिरपलं त्यावेगानं जर या सुविधाही पोहोचल्या तर अनेक तरुणांसाठी संधीची कवाडं उघडतील.  म्हणूनच बीसीसीआयने बड्या खेळाडूंवर देशांतर्गत स्पर्धा खेळण्यासाठी वाढवलेला दबाव उचित ठरतो. जे खेळाडू रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेट खेळायला तयार नाहीत, केवळ आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच खेळणार म्हणतात त्यांच्यावर कारवाईची चर्चा सुरूच झाली आहे. सुनील गावसकरही उघड सांगतात की ज्या खेळानं तुम्हाला नाव प्रसिध्दी पैसा दिला त्याची परतफेड म्हणून तरी बड्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवं. क्रिकेटपेक्षा मोठं कुणीच नाही हे सूत्रच देशात अधिकाधिक उत्तम क्रिकेट खेळाडू घडवत आहे. गेल्या ३० वर्षांत क्रिकेटमध्ये झालेला हा बदल आपल्या डोळ्यासमोर आहे.

एकेकाळी मुंबईकर मराठी मध्यमवर्गीय प्राध्यापकाचा मुलगा भारतीय क्रिकेटच्या गळ्यातला ताईत झाला, तेव्हा क्रिकेट बड्या शहरांपुरतं मर्यादित होतं. आता तीन दशकानंतर बिहारमधल्या सासारामजवळच्या लहानशा गावातल्या सरकारी शाळेतल्या शिक्षकाचा मुलगा भारतीय कसोटीत शानदार पदार्पण करत संघाच्या विजयात योगदान देतो ही गोष्ट बदलत्या क्रिकेटचीच नव्हे, ती बदलत्या समाजाचीही गोष्ट आहे. तिचे नायक  विचारणारच स्वत:ला, की आज नाही तर कधी? मी नाही तर कोण?

टॅग्स :Rahul Dravidराहुल द्रविडIndia VS Englandभारत विरुद्ध इंग्लंड