शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

...आभाळ कोसळलेले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 08:28 IST

गुणांचा फुगवटा, सूज अन्‌ कोरोनाकाळात परीक्षा न देताच पुढच्या वर्गात गेलेली मुले, अशी दूषणे देत बसण्यापेक्षा आता पुढे काय यावर पालक, शिक्षक अन्‌ समाजाने चिंतन केले तर बरे होईल.

अखेर निकाल लागला, दहावी संपली..! गुणांचा फुगवटा, सूज अन्‌ कोरोनाकाळात परीक्षा न देताच पुढच्या वर्गात गेलेली मुले, अशी दूषणे देत बसण्यापेक्षा आता पुढे काय यावर पालक, शिक्षक अन्‌ समाजाने चिंतन केले तर बरे होईल. पहिली ते आठवीपर्यंतचा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण भेद यापूर्वीच पुसला गेला होता, कोरोनाच्या निमित्ताने तेच दहावीचेही झाले. नव्या शैक्षणिक धोरणात दहावीला उरले-सुरले महत्त्वही राहणार नाही. कोरोनाच्या असाधारण परिस्थितीत शाळा बंद राहिल्या. वर्ग भरले नाहीत. ऑनलाइन शिक्षण कुठे पोहोचले, कुठे नाही. वर्गात न जाता, परीक्षा न देता मुले उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जात असतील तर त्यांच्या शैक्षणिक भविष्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. अंतर्गत मूल्यमापन किती परिपूर्ण झाले, यावर चर्चा होऊ शकते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा आधार घेऊन निकाल हाती आले आहेत, असे गृहीत धरले तरी आजवरचे निकाल आणि यंदाचा निकाल यात मोठी तफावत आहे. राज्यभरातून केवळ ९१६ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र असून, ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. 

एकूणच यावर्षीच्या निकालात परीक्षा नसल्याने उपस्थित, अनुपस्थित विद्यार्थी हा मुद्या नाही. परिणामी, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले. शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे इतक्या प्रचंड गुणवत्तेचे (!) करायचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आजच्या विपरीत परिस्थितीत चांगले काय घडू शकेल, याबद्दल उपाय सुचविणाऱ्यांची शिक्षण व्यवस्थेला गरज आहे. राज्याच्या ९९.९५ टक्के उत्तीर्णतेच्या गुणवत्तेने काय साधले याचा सकारात्मकपणे विचार करता येऊ शकेल. कदाचित ग्रामीण भागात या निकालाचे काही चांगले परिणामही दिसतील. खेड्यात दहावी अनुत्तीर्ण झाल्यानंतर  बहुतांश मुलींचे शिक्षण तिथेच थांबते. वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याच्या आतच त्यांचे विवाह उरकले जातात. आता किमान काही मुलींच्या वाट्याला पुढची दोन वर्षे शिक्षण येऊ शकेल.  

मुलांनाही दहावी अनुत्तीर्णतेचा शिक्का बसल्यावर पुढचे शिक्षण घेण्याऐवजी शेताची वाट धरावी लागते. महानगरांसह शहरांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा, तर ग्रामीण भागात अजूनही शिक्षणाच्या विस्ताराचा मुद्दा आहे. गळतीचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना किमान गुणवत्तेचे कमाल शिक्षण मिळाले तरी जीवनमान सुधारणार आहे. त्यामुळेच अंतर्गत मूल्यमापनावर आधारित दहावीच्या निकालाने आभाळ कोसळल्याची भावना नको. किंबहुना आजवर झालेले शैक्षणिक नुकसान निकालाने नव्हे, तर वर्षभर वर्ग न भरल्याने झाले आहे. यावर्षीच्या निकालाने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय केला असेही वाटत नाही. जे गुणवान आहेत, त्यांना गुण मिळालेच आहेत. फरक इतकाच जे अनुत्तीर्ण होणार होते, ज्यांना काही कमी गुण मिळाले असते ते चांगले गुण घेऊन पुढच्या वर्गात जाणार आहेत. त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली, मात्र स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यास करावा लागेल. 

स्वत:ला सिद्ध करावे लागेल. याउपरही निकालावर ज्यांचे समाधान नाही, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी आहे. गुणवत्ताधारक, स्वयंप्रेरणेने, स्वयंअध्ययन करणारे विद्यार्थी मागे पडणार नाहीत. त्यामुळे निकालावर उथळपणे भाष्य न करता समाजाने परिपक्व भूमिका घेऊन मुलांच्या मानसिकतेचा विचार करावा. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी असणार आहे. याशिवाय, दहावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाल्यानंतर  गुणवत्तेशिवाय पुढे जाता येणार नाही. पालकांना आपल्या पाल्याची गती अन्‌ प्रगती ज्ञात असते. त्यामुळे पुढच्या वर्गात प्रवेश देताना मुलांचा कल लक्षात घेतला पाहिजे. त्यांची क्षमता, आवड याचे अवलोकन करून शिक्षकांच्या मदतीने पुढचा शिक्षणक्रम ठरविला पाहिजे. अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनात उत्तीर्ण झाले असतील तर त्यांना मिळालेली संधी लक्षात आणून दिली पाहिजे. 

त्यांच्यासाठी कोरोना आपत्ती काळातील दहावीचा निकाल इष्टापत्ती ठरली आहे. जिथे ऑनलाइन शिक्षणही पुरेसे पोहोचले नाही, ज्यांना प्रत्यक्ष शिक्षकांशी संवाद साधता आला नाही, कुटुंब अल्पशिक्षित असल्याने योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, अशा शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतील. त्यांना खंबीर साथ देणारे पालक अन्‌ दिशा देणारे शिक्षक हवे आहेत. जबाबदारी आणि उत्तरदायित्व जपणाऱ्या शिक्षणसंस्था हव्या आहेत. त्यासाठी शासनकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि जाणकारांचा पाठपुरावा, ही आजची खरी गरज आहे.

टॅग्स :ssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालMaharashtraमहाराष्ट्र