शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल

By यदू जोशी | Updated: September 19, 2025 07:55 IST

सर्वाधिक बंडखोरी महायुतीत दिसेल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खिचडी पकेल.

यदु जोशी सहयोगी संपादक, लोकमत

तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार म्हणजे विरोधकांची मोठी दमछाक होणार, असे दिसते. साधारणतः दिवाळीच्या आसपास पहिली आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर तीन-सव्वातीन महिने टेम्पो टिकवायचा म्हणजे गंमत नाही. साम, दाम, दंड, भेद असे सगळे लागत असते निवडणुकीत. सत्तारूढ महायुतीकडे ते भरपूर आहे, विरोधक त्याबाबत लंगडे दिसतात. ऑक्टोबरपासून सर्वांनाच दम लावावा लागेल आणि तो जानेवारीपर्यंत टिकवावा लागेल. निवडणुकीत सरस्वतीपेक्षा लक्ष्मी महत्त्वाची असते. काँग्रेसकडे खूप धनवान नेते आहेत, पण पक्षासाठी काही काढायचे म्हटले की ते हात आखडता घेतात हा अनुभव हर्षवर्धन सपकाळ यांना येतच असणार. दहा बड्या नेत्यांनी आपल्या मिळकतीतला एक-दोन टक्का वाटा पक्षाला दिला तरी हजारएक कोटी रुपये उभे राहू शकतात.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

सत्याचे प्रयोग करत असलेले सपकाळ यांना आता सत्तेचे प्रयोग करायचे आहेत. त्यासाठी पक्षाच्या सर्व मोठ्या नेत्यांना उत्तरदायी करणे त्यांना अद्याप जमलेले नाही. सपकाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जरूर आहेत, पण या सर्वांचे नेते वाटत नाहीत. सात महिने झाले त्यांना अध्यक्ष होऊन. पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना त्यांनी स्वीकारणे आणि त्यांना नेते कार्यकर्त्यांनी स्वीकारणे हे दोन्ही भाग आहेत.

रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होऊन अडीच महिने झाले तरी चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्षावरील गारुड कायम आहे. बावनकुळेंच्या काळातील कार्यकारिणीसोबत ते काम करत असल्याचा तो परिणाम आहे. आता प्रदेश कार्यकारिणीसाठी प्रत्येक विभागातून प्रदेशाने नावे मागविली आहेत. पंधरा दिवसात प्रदेश भाजपची नवीन कार्यकारिणी झाल्यानंतर चव्हाण त्यांची मांड पक्की करतील असे दिसते. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष पदातून अजूनही मनाने मोकळे झालेले नाहीत. ते साहजिकही आहे, आपण वाढवलेल्या झाडाच्या सावलीखाली राहणे कोणालाही आवडते. शरद पवार गटात जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मेहनत खूप घेत आहेत, परवा नाशिकचा मोर्चा त्यांनी यशस्वी केला. इतरांचे ऐकून घेण्याचा आणि त्यानुसार शक्य ते करण्याचा गुण शिंदे यांना मोठा करणारा आहे.

नवीन खिचडी अटळ

आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र राहतील का? कारण, 'मविआ' की काँग्रेस यापैकी एकाची निवड उद्धव ठाकरेंना करावी लागेल. उद्धव-राज या जोडीसह मविआ टिकविण्यात काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना रस नाही, वेगळे लढण्याची आणि त्या माध्यमातून विस्तारण्याची हीच ती वेळ असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. 'दिल्ली बोले, इथली काँग्रेस हले' असे पूर्वापार समीकरण असल्याने दिल्लीहून येईल तोच आदेश स्वीकारला जाईल. मात्र मित्रांचे आणि

विशेषतः उद्धव सेनेचे 'जड झाले ओझे' असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना वाटत आहे. सगळीकडे महायुती वा महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजिबात राहणार नाही. स्थानिक नेते आपल्या सोईनुसार निर्णय घेतील. एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल, सर्वाधिक बंडखोरी महायुतीमध्ये दिसतील. महाराष्ट्राच्याराजकारणात एक नवीन खिचडी पकेल. गावागावात-शहराशहरात वेगवेगळ्या रंगांचे गुलाल उधळले जातील. वेगळेच झेंडे एकत्र येतील, असे दिसते. काही ठिकाणी मोठे पक्ष स्थानिक आघाड्यांना अनुमती देतील आणि निवडून आल्यानंतर त्यांना आपल्यात घेतील.

महायुतीतील तिन्ही पक्षांनी गेल्या काही महिन्यांमध्ये बाहेरच्यांची जी मेगाभरती केली आहे, ती बंडाळीसाठी मोठे कारण ठरेल. तीन-साडेतीन वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा जाण्याची गळेकापू स्पर्धा बघायला मिळेल. वरवर एकत्र दिसणारे आतून एकमेकांना पाडण्यासाठी कारवाया करतील, असेही होऊ शकते. थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा फायदा महायुतीला जास्त होईल. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कायकाय

करते आहे याची माहिती घेऊन काँग्रेसने रणनीती आखली तर बरे होईल, नाहीतर निवडणुकीनंतर मतचोरीचा आरोप करणे तेवढे हाती राहील.

सामाजिक समीकरणे महत्त्वाची

महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवल्याची चिंता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. परवा बीडमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जातीपातीपलीकडे जाऊन माणूस म्हणून बघा, असे आवाहन केले. वीण कशामुळे उसवली याचे आत्मचिंतन ज्याने त्याने केले तर उत्तर तर मिळेलच; शिवाय भविष्यात जातींवरून वादही होणार नाहीत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरवरून ओबीसी समाजात खदखद आहे. तिकडे बंजारा समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचेही मोर्चे सुरू आहेत. सामाजिक वीण लगेच शिवली जाईल, असे काही वाटत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जातीपातींच्या संदर्भाचे पडसाद काही भागांमध्ये तरी उमटतील. सर्वदूर परिणाम जाणवणार नाही. जातींचा विषय पेटला की विकासाचे मुद्दे मागे पडतात हे आधीही बघायला मिळालेले होतेच. दोन्ही बाजूंनी जातीय समीकरणे आपल्या बाजूने कशी वळतील याचे प्रयत्न निश्चितच होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण सामाजिक वळणावरून पुढे जाताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत जातींच्या पलीकडे पाहत मतदारांनी महायुतीला आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पसंती दिली होती. मतदारांनी ती वीण कधीच शिवली आहे, नेते आता शिवायला निघाले आहेत. सुया, दाभण हातात घेऊन ते विणकाम करताना लवकरच दिसतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण