शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

आता अभियंत्यांसमोर तंत्रज्ञानाबरोबरच ‘नैतिक’ आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:46 IST

आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख शिल्पकार सर विश्वेश्वरय्या यांच्या गौरवार्थ आज देशभर ‘अभियंता दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने..

डॉ. दीपक शिकारपूर

अभियंता व माहिती तंत्रज्ञान अभ्यासक

जगभरातील अभियांत्रिकी क्षेत्राचे स्वरूप सतत  बदलत आहे. विसाव्या शतकात अभियांत्रिकीने जगात मोठी क्रांती घडवून आणली. सुरुवातीला, हेन्री फोर्डच्या असेम्ब्ली लाईनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झाले. यामुळे गाड्या आणि इतर वस्तू स्वस्त झाल्या. यानंतर, नागरी अभियांत्रिकीने मोठे पूल, धरणे आणि गगनचुंबी इमारती बांधल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधनाला गती मिळाली.

मानवाला चंद्रावर पाठवणे, हे एक मोठे यश होते. शतकाच्या उत्तरार्धात, ट्रान्झिस्टर आणि मायक्रोप्रोसेसरच्या शोधाने डिजिटल युगाचा पाया रचला. २०००च्या दशकात, भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक नवीन युग सुरू झाले. माहिती तंत्रज्ञान आणि संगणक अभियांत्रिकीच्या आगमनाने या क्षेत्राला नवीन दिशा मिळाली. भारताने सॉफ्टवेअर विकास, आउटसोर्सिंग आणि माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. आयटी क्षेत्रात प्रचंड रोजगार संधी निर्माण झाल्या आणि इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार  आणि जैवतंत्रज्ञान  यांसारख्या नवीन शाखांचा विकास झाला. पारंपरिक अभियांत्रिकी शाखांमध्येही आधुनिकीकरण आणि ऑटोमेशनचा वापर वाढला. कामाची गती आणि गुणवत्ता सुधारली. या काळात, भारताने अनेक प्रकल्पांमध्ये (उदा.  मेट्रो रेल्वे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ) आपली तांत्रिक क्षमता दर्शविली.

सध्या, अभियांत्रिकी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ड्रोन आणि सायबर सुरक्षा  यांसारख्या नवीन शाखांचा उदय झाला आहे. यामुळे केवळ पारंपरिक उद्योगांमध्येच नव्हे, तर आरोग्यसेवा, वित्त, मनोरंजन आणि कृषी क्षेत्रातदेखील अभियंत्यांची मागणी वाढली आहे. पारंपरिक अभियांत्रिकीच्या कल्पनाही बदलत आहेत. उत्पादन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे स्मार्ट कारखाने स्वायत्त रोबोट्स, डेटा ॲनालिटिक्स आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगसह सुसज्ज झाले आहेत. या घडामोडींमुळे केवळ उत्पादकता वाढली नाही तर मानवी चुका कमी झाल्या आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारली.

याचबरोबर इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि क्लाउड कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानांनी उत्पादनांना आणि सेवांना जोडले. दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधले जात आहेत. यामुळे, अभियंत्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर व्यवस्थापन, संवाद आणि समस्या सोडवण्याचे कौशल्यदेखील आवश्यक झाले आहे.

भविष्यात, अभियांत्रिकी क्षेत्र अधिक वैयक्तिकृत  आणि शाश्वत  बनणार आहे. क्वांटम कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानामुळे डेटा विश्लेषण आणि गणना (Computation) अधिक वेगाने शक्य होईल. बायोइंजिनिअरिंग  आणि नॅनो टेक्नॉलॉजी  या शाखांचा प्रभावी वापर मानवी आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केला जाईल. २०४० पर्यंत, रोबोटिक्स आणि ॲटोमेशन  अनेक उद्योगांमध्ये मानवी श्रमाची जागा घेतील, ज्यामुळे अभियंत्यांचे काम अधिक संशोधनात्मक आणि धोरणात्मक बनेल. ग्रीन एनर्जी  आणि सर्क्युलर इकॉनॉमी यांसारख्या संकल्पनांमुळे पर्यावरण अनुकूल उत्पादने आणि प्रक्रिया विकसित करण्यावर भर दिला जाईल. भविष्यातील अभियंत्यांना सायबर सुरक्षा आणि नैतिकता  यांसारख्या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनावर थेट परिणाम करणार आहे.

भारतीय अभियांत्रिकी क्षेत्राचा प्रवास पारंपरिक ते आधुनिक आणि स्थानिक ते जागतिक असा राहिला आहे. भविष्यात, हे क्षेत्र केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीपुरते मर्यादित राहणार नाही, तर मानवी जीवनातील आव्हानांवर नावीन्यपूर्ण आणि नैतिक उपाय शोधण्याचे केंद्र बनेल. अभियंते हे तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या  नवनवीन शोध व निर्मितीमुळे समाजाचे जीवनमान सुधारते. बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या, नवनवीन कौशल्ये शिकत राहणाऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा ऊर्फ ‘हटके’ विचार करणाऱ्या अभियंत्यांना  कायम ‘अच्छे दिन’ येणार. गरज आहे ती मानसिकता बदलायची. आजच्या अभियांत्रिकी दिवसाचा हाच संदेश आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स