शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हे अपेक्षित स्वातंत्र्य नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 05:28 IST

कोणत्याही समाजाने प्रतीक म्हणून विवेकानंद, ज्ञानेश्वर, कबीर, विनोबांची निवड केलेली नाही. उलट लढाऊ प्रतीके शोधून निवडण्यात आली. ज्या अनुसूचित जातीबद्दल काळजी व्यक्त केली जाते, तेथेही जातींमध्ये कडवटपणा दिसतो. प्रत्येकामध्येच वरचढपणाची भावना दिसते.

हाथरससारख्या घटना घडल्या की, चार्वाकाची आठवण येते. वेद काळातील या बंडखोर ऋषीची परंपराधारा शतकागणिक रोडावत गेली; पण महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायातील सर्वच संत, तर उत्तरेत कबीर पंथाने ती जिवंत ठेवत विस्तारण्याची पराकाष्ठा केली. पुढे १९ आणि २० व्या शतकात महाराष्ट्र आणि बंगालमध्ये चळवळी उभ्या राहिल्या. प्रार्थना समाज असो की, ब्राह्मो समाज; या चळवळीचे ध्येय हे सामाजिक समानता राहिले. फुले, शाहू, आंबेडकर ते हयातभर ‘एक गाव, एक पाणवठ्या’चा ध्यास धरणारे बाबा आढाव, हे सगळेच या दिंडीचे वारकरी. सामाजिक सुधारणेच्या आघाडीवर महाराष्ट्राने जो ठसा उमटवला त्यामागे ही एवढी मोठी परंपरा आहे. असे असतानाही याच महाराष्ट्रात खैरलांजीसारख्या घटनांची संख्या लक्षणीय आहे आणि एका आकडेवारीनुसार बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो.

आज ज्या हाथरसच्या घटनेने समाजमन ढवळून निघते आहे, त्या उत्तर प्रदेशात कबीर, रविदासापासून ते राम मनोहर लोहियांपर्यंतचा धागा दिसतो; पण दुर्दैवाने लोहियांच्या शिष्यांनीच आकार दिलेल्या तिथल्या मानसिकतेची आजची अवस्था पाहा! गेल्या वर्षभरात राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये दलित आणि मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारात कमालीची वाढ झाली. या सामाजिक चळवळीच्या प्रदीर्घ परंपरेच्या पार्श्वभूमीवर समाजाचे अभिसरण का झाले नाही? साक्षरता वाढली, सुशिक्षित समाज निर्माण झाला; पण सुशिक्षितांची संस्कृती का निर्माण होऊ शकली नाही, असे प्रश्न पडतात. त्याचवेळी समाजाची धर्म आणि जातीयनिहाय उडालेली शकले आपल्या भोवती फिरताना दिसतात.धर्माचा विखार आणि जातींचा कमालीचा धारदार, टोकदारपणा बोचत राहतो. ‘आपला’ आणि ‘त्यांचा’ ही भाषा सहजपणे कानावर पडते. प्रत्येक धर्म, समाजघटकातील ‘त्यांचा’ हा धर्म-जातीअन्वये वेगळा असतो; पण ‘आपण’ आणि ‘ते’ हा सर्वांचाच स्थायिभाव आहे. या सगळ्या बोचणाऱ्या गोष्टी कोणत्याक्षणी धारदार झाल्या हे कळलेच नाही. उमगले त्यावेळी समाजागणिक आक्रमक संघटना अवतरल्या होत्या. प्रत्येकाने आपली प्रतीके लढाऊच निवडली. त्यात सामाजिक समरसतेऐवजी आक्रमपणाचा अभिनिवेश दिसतो. सामाजिक चळवळींना राजकीय बळ मिळाले, तर वरचढपणाची भावना कमी होत जाते आणि समानता रुजते; पण लोहियांनंतर उत्तर भारतात समाजवादी राजकारणाची वाताहत झाली आणि चळवळी राजकारणाच्या वळचणीला गेल्या.
उर्वरित भारतातही थोड्याफार फरकाने हेच घडले. राजकीय पक्षांनी चळवळींना पाठबळ दिले; पण त्यांचा उद्देश सामाजिक अभिसरणाचा नव्हता. याच्या आडून त्यांनी मतपेढी बांधण्याचा उद्योग केला, कोणी याला सोशल इंजिनिअरिंगचे नाव दिले; पण समाजसुधारणेच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा एक जुगाड होता. सामान्य माणूस या वरलिया रंगाला भुलत केव्हा सरंजामी मनोवृत्तीच्या दावणीला बांधला गेला, हे त्यालाच कळले नाही. आता प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र सरंजामीवृत्ती पोसून पुष्ट बनली आहे. एवढ्या चळवळी होऊनही वरचढपणाची भावना महाराष्ट्रात विरली नाही. उलट ती बळकट होत गेली. आज ती उघडपणे वेगवेगळ्या स्वरूपात सर्रास दिसते.
काँग्रेसने पुरोगामी राजकारण केले असेही म्हणता येत नाही. काँग्रेस सत्तेवर असताना राजस्थानात मनुचा पुतळा उभारण्यात आला. आरक्षण हा शब्द ज्वालाग्राही बनला. ज्यांना शिक्षणाची परंपरा नाही आणि उत्पन्नाचे साधनही नाही, अशांना आरक्षण ही मूलभूत संकल्पना आहे. एक हजार वर्षांचा द्वेष शतकागणिक जहरी बनत आहे. खरे तर राजकारणाद्वारे ही क्रांती घडू शकते; पण ते दुधारी शस्र आहे. त्याचा वापर कसा होतो, त्यावर परिणाम दिसतात. आपल्याला समाजकारणासाठी ते वापरता आले नाही. हे स्वातंत्र्य मिळताच गांधी आणि आंबेडकरांना उमजले होते म्हणून १५ ऑगस्ट ४७च्या पहाटे ‘हे माझे स्वातंत्र्य नाही’ असे म्हणत गांधीजी नौखालीत निघून गेले होते, तर या स्वातंत्र्यात माझ्या समाजाचे काय, हा सवाल करीत आंबेडकरांनीही सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता!