शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

ओबामा यांनी जे केलं तशी ‘इच्छाशक्ती’च सरकारमध्ये हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 06:53 IST

जग आजच्यासारखेच प्रदूषित होत राहिले, तर येत्या काळात हॉलंड व मॉरिशससारखे देश पाण्याखाली जातील आणि मुंबईसह अनेक समुद्री शहरांचे किनारे जलमय होतील. जगाची जेवढी चिंता करायची, तेवढीच ती आपण आपलीही केली पाहिजे.

देशात व जगात काल पर्यावरण दिन साजरा झाला. जगाचे पर्यावरण कधीचेच काळजी करण्याजोगे झाले आहे. अमेरिकेच्या ट्रम्पसारखे काही आडमुठे पुढारी सोडले, तर बाकीचे जग याबाबत काही करण्याच्या तयारीला लागले आहे, परंतु यातील प्रामाणिक प्रयत्नांना साथ देणे व जग योग्य दिशेने नेणे ही बाब महत्त्वाची आहे. पी. व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान असताना, रिओडी जानिरो येथे भरलेल्या पर्यावरण परिषदेत म्हणाले होते, ‘ज्या औद्योगिक देशांनी जगाचे पर्यावरण नासविले, त्यांनीच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा सर्वाधिक भार उचलला पाहिजे.’ अमेरिका व अनेक पाश्चात्त्य देश त्यावेळी त्यांच्यावर नाराज झाले होते, परंतु त्यांच्या प्रतिपादनाचे महत्त्व मोठे होते व ते हळूहळू जगाच्याही लक्षात आले. जग आजच्यासारखेच प्रदूषित होत राहिले, तर येत्या काही काळात हॉलंड व मॉरिशससारखे देश पाण्याखाली जातील आणि मुंबईसह अनेक समुद्री शहरांचे किनारे जलमय होतील. जगाची जेवढी चिंता करायची, तेवढीच ती आपण आपलीही केली पाहिजे. दिल्ली व चंद्रपूर ही देशातली सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत.

अंतरिक्षातून संगणकाद्वारे पाहिले, तर या शहरांवर काळ्याकुट्ट रंगाचा गडद पडदाच तेवढा दिसतो. वास्तविक, चंद्रपूर हे जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात दरवर्षी कोट्यवधी झाडे लावण्याची वल्गना सरकार करीत असते, पण सरकार व केंद्र यांची ताजी आकडेवारी पाहिली की, प्रत्यक्षात तेथे जंगल कमी व पातळ होत असल्याचेच आढळले आहे. त्याचमुळे वाघांसारखे वन्यप्राणी त्यात तडफडून व पाण्यावाचून मरताना दिसले आहेत. त्यातून केंद्राची आकडेवारी राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीहून अधिक चिंताजनक व खरी आहे. हे केवळ जंगलांबाबतच खरे नाही. यमुनेपासून देशातील अनेक मोठ्या नद्यांचे आता नाले झाले आहेत. बारमाही नद्या दोन व तीन महिने वाहून कोरड्या होतात. धरणांचे तळ दिसतात आणि आकाश धूर व धूळ यांनी व्यापलेले दिसते. चंद्रपूरसारख्या शहरात सहा वर्षांखालील बहुतेक मुलांना त्यामुळे श्वसनाचे दोष जडले आहेत. आपली मुले अशी अडचणीत असली, तरी मंत्री व सरकार मात्र हवेत व मजेत आहेत. जे कारखाने प्रदूषित धूर सोडतात, त्यांच्यावर पर्यावरणाच्या यंत्रणा बसवायला सांगण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. परिणामी, त्यांचे धूर ओकणे तसेच चालू असते.

गंगेच्या शुद्धिकरणासाठी त्यात येणारे सांडपाणी व कातड्याच्या कारखान्यातील प्रदूषित पाणी थांबविले गेल्याचा गवगवा होतो, परंतु बल्लारपूरचा कागद कारखाना गेली ७० वर्षे वर्धा नदीसारखी मोठी नदी नासवीत आहे. मात्र, आजवरच्या एकाही सरकारने त्याचा कधी बंदोबस्त केला नाही. देशातील बहुतेक सर्व जागी असेच दुर्लक्ष होत राहिले आहे. पाणी प्रदूषित झाले की, त्यातले जीव मरतात. त्यावर इरकुनिया वाढतो. हवामान बिघडते, पण त्याची काळजी करायची कुणी? उद्योगपती काही करीत नाहीत आणि सरकार पर्यावरणाचा दिवस आला की, काहीतरी थातूरमातूर कारवाई करते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेतील पिट्सबर्ग हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर झाले होते. कोळसा, पोलाद व अ‍ॅल्युमिनियमच्या खाणी तेथेच होत्या. त्याच बळावर अमेरिकेने युद्धात मोठी मजलही गाठली, पण त्यामुळे झालेल्या प्रदूषणाने माणसांचे बळी घेतले. लोक शहर सोडून दूर गेले. परिणामी, त्यांची संख्या सहा लाखांहून तीस हजारांवर आली.

बराक ओबामा हे अध्यक्ष असताना त्यांनी त्याचे पुनर्वसन हाती घेतले व तेथे जागतिक पर्यावरण परिषद बोलावली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत प्रस्तुत प्रतिनिधीनेही तेव्हा त्या शहराला भेट दिली. त्याची लोकसंख्या तीन लाखांवर आली होती. तिथल्या तीनही नद्या शुद्ध होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळ होती आणि तिथे ससे बागडत होते. पिट्सबर्गच्या पुनर्वसनासाठी ओबामांची ताकद व इच्छाशक्ती लागली. आपले सरकार ते बळ व ती इच्छा कुठून व कशी आणणार?

टॅग्स :environmentवातावरण