शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

संपादकीय: तीन राज्यातला तमाशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 07:33 IST

केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून बहुमत नसताना विरोधी पक्षात फूट पाडणे किंवा विरोधी पक्षांच्या आमदारांना राजीनामे द्यायला लावून राज्यपालांच्या मदतीने स्वपक्षाचे सरकार स्थापन करण्याची पद्धत पडली. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांत हे प्रयोग झाले.

भारतीय  राजकारणात पक्षांतर नवीन नाही. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि बहुमतासह सत्ताधारी पक्षानेच पक्षांतर केल्याची उदाहरणे आहेत. मध्यंतरीच्या काळात पक्षांतरबंदी कायद्याने थोडी वेसण घातली गेली. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून बहुमत नसताना विरोधी पक्षात फूट पाडणे किंवा विरोधी पक्षांच्या आमदारांना राजीनामे द्यायला लावून राज्यपालांच्या मदतीने स्वपक्षाचे सरकार स्थापन करण्याची पद्धत पडली. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांत हे प्रयोग झाले. अलीकडच्या काळात ज्या प्रदेशात भाजपचा विस्तार नाही, तेथे सत्ताधारी किंबहुना जनाधार असलेल्या पक्षातील आमदार-खासदार तसेच प्रभावी नेत्यांना आमिषे दाखवून पक्षांतर करायला भाग पाडले जाऊ लागले आहे.

आसामचे नवनियुक्त मुख्यमंत्री हेमंता बिस्वा हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालचे राजकारण पक्षांतरांमुळे बरेच गाजले होते. तृणमूल काँग्रेस पक्षाला नामोहरम करताना भाजपने असंख्य आमदारांना फोडले. त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. असे पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे तेवीसजण भाजपकडून विधानसभेवर निवडूनही आले आहेत. सध्या उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ पक्षांचा अपवादवगळता सर्वच राजकीय पक्षांतून पक्षांतरबंदी कायद्याला बगल देत दोनतृतीयांश संख्या जमवून पक्षांतर करण्याच्या हालचाली चालू आहेत. बिहारमधील लोकजनशक्ती पक्षामध्ये फूट पडली आहे. या फुटीस मुख्यमंत्री नीतिशकुमार आणि त्यांचा संयुक्त जनता दल पक्ष जबाबदार असल्याची चर्चा आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्तीचे एकमेव आमदार निवडून आले होते. त्यांना पक्षात घेण्यात आले आणि विधानसभेतील त्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आणले. ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. त्यांचे चिरंजीव चिराग पासवान, बंधू पशुपती पारस यांच्यासह लोकजनशक्तीचे सहा सदस्य लोकसभेत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हा घटक पक्ष आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत या पक्षाने वेगळी भूमिका घेत संयुक्त जनता दलास प्रखर विरोध केला. परिणामी संयुक्त जनता दलाच्या ४६ उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा आहे. त्याचा रोष नीतिशकुमार यांच्या मनात होताच. शिवाय लोकजनशक्तीच्या भूमिकेमुळे संयुक्त जनता पक्षास भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि आता सरकार चालविताना भाजपची मनमानी खपवून घेण्याची वेळ आली आहे, असे नीतिशकुमार यांना वाटते आहे. आपल्या पक्षाच्या ४३ आमदारांचा आकडा भाजपच्या ७४ पेक्षा मोठा करण्याची त्यांना घाई झाली आहे.

लोकजनशक्तीच्या संसदीय पक्षात फूट पडून आपलाच पक्ष खरा, हे सिद्ध करण्याची चढाओढ काका-पुतण्यामध्ये (पशुपती पारस - चिराग पासवान) लागली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नजीकच्या विस्तारात पशुपती पारस यांना घेतले जाण्याची शक्यता आहे. हा घटक पक्ष संपविल्यास भाजपचे बिहारमधील राजकारण बदलू शकते. शिवाय नीतिशकुमार यांच्यावर अंकुश ठेवता येतो. याउलट पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये धुसफूस चालू आहे. ममता बॅनर्जी यांचे उजवे हात समजले जाणारे मुकुल रॉय यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षही केले होते. ममतादीदींची पुन्हा सत्ता येताच रॉय माघारी फिरले. आता पूर्वाश्रमीचे तृणमूलचे असणारे भाजपचे तेवीस आमदार परत फिरण्याच्या तयारीत आहेत. राज्यपालांना भेटायला जाणाऱ्या सर्व (७७) आमदारांच्या शिष्टमंडळात तेवीस आमदारांनी गैरहजेरी लावली होती. भाजपने तृणमूलच्या तीस आमदारांना निवडणूकपूर्व संध्येला पक्षांतर करण्यास भाग पाडले होते.

उत्तर प्रदेशातील सर्वच राजकीय पक्षांत खदखद आहे. भाजपमध्येही असंतोष वाढला आहे. बहुजन समाज पक्षाने एकोणीसपैकी नऊ आमदारांना पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून निलंबित केले आहे. ते सर्व समाजवादी पक्षाच्या वाटेवर आहेत. कर्नाटकात भाजपमध्ये सुंदोपसुंदी चालू आहे. गोव्यात लवकरच निवडणूक आहे. तेथे भाजपमध्ये कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही. काँग्रेसची हालत देशपातळीवर चांगली नसतानाही राजस्थान आणि पंजाबमध्ये सत्ता असताना गटबाजीने ऊत आणला आहे. तीन राज्यांतील मोठ्या तमाशाप्रमाणे उत्तर प्रदेशचे राजकारण ढवळून निघणार आहे. तेथे सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. पक्षांतराचा हा तमाशा तोवर चालतच राहणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारKarnatakकर्नाटक