शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे परत येणार? मोदी सरकार नेमकं काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 05:51 IST

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शेतकरी आंदोलनाकडे लक्ष असलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडला, की आंदोलनाने निकाल फारसे बदलले नसल्याने मागे घेतलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकार पुन्हा आणील का?

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शेतकरी आंदोलनाकडे लक्ष असलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडला, की आंदोलनाने निकाल फारसे बदलले नसल्याने मागे घेतलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकार पुन्हा आणील का? त्यावर संयुक्त किसान मोर्चाचे नेते म्हणाले, की कुठल्याही सरकारला पुढच्या दाराने हे कायदे पुन्हा आणता येणार नाहीत. २०१५च्या भूमी अधिग्रहण कायद्यासारखे मागच्या दाराने मात्र हे होऊ शकेल. सरकारकडून अजून त्यावर काही बोलले गेलेले नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे सदस्य, शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे अनिल घनवट यांनी त्या चर्चेला तोंड फोडले आहे. समितीने न्यायालयात बंद लिफाफ्यात असलेला अहवाल घनवट यांनी फोडला असून, त्यांचा दावा आहे की, ८७ टक्के शेतकऱ्यांचा त्या कायद्यांना पाठिंबा होता व कायदे परत घेऊन सरकारने सुप्त बहुमताचा अनादर केला. घनवट यांचे म्हणणे असे, की कायदे रद्द झाल्यामुळे आता या अहवालाला काही किंमत नाही आणि सरकार पुन्हा कायदे आणील, असेही नाही. तरीदेखील शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या या कायद्यांवर देशभर चर्चा व्हावी म्हणून तो अहवाल जाहीर करीत आहोत.

सर्वोच्च न्यायालयाच्या बेअदबीची जोखीम स्वीकारून अहवाल फोडण्याचे घनवटांचे औधत्य ही मागच्या दाराने कायदे पुन्हा आणण्याची सुरुवात आहे का, सरकारचे प्रतिनिधी यात कधी उतरतात आणि कायदे पुन्हा आणा म्हणून सरकारवर कोण, कसा दबाव टाकते, हे आता बघावे लागेल. शेतमाल कुठेही विकायची परवानगी, करार शेती, तसेच जीवनावश्यक वस्तूंमधून अन्नधान्य, तेलबिया, कांदा वगैरे वगळण्याच्या या तीन कायद्यांवर गेली दीड वर्षे रणकंदन सुरू आहे. तरीदेखील काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. चर्चा, मसलत न करता कायदे का आणले, ते विधेयक घाईघाईने संमत का करण्यात आले, शेतकरी आंदोलन आधी अनुल्लेखाने मारण्याचा, नंतर ते चिरडण्याचा प्रयत्न का झाला, गंभीरपणे आंदोलकांशी चर्चा का केली नाही, दिल्लीलगतच्या सिंघू, टिकरी व गाझीपूर या सीमांवर मरण पावलेल्या सहाशे - सातशे शेतकऱ्यांना साधी श्रद्धांजलीही का वाहिली गेली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे अचानक गेल्या १९ नोव्हेंबरला तिन्ही कायदे परत घेत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी का केली? संसदेत ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह अनेकांनी हे कायदे पुन्हा आणण्याचा इरादा का बोलून दाखविला?
एका बाजुला हे प्रश्न आहेत, तर दुसऱ्या बाजुला घनवट सदस्य असलेल्या समितीची कार्यपद्धती आहे. कायद्यांच्या विरोधातील संघटना, शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या चार सदस्यांच्या समितीमधून पंजाबचे भूपिंदरसिंग मान यांनी लगेच अंग काढून घेतले होते. अनिल घनवट, कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी व आंतरराष्ट्रीय शेतमाल व्यापाराचे तज्ज्ञ प्रमोद कुमार जोशी हे उरलेले तिघेही स्पष्टपणे कायद्यांचे समर्थक असल्याने संयुक्त किसान मोर्चाने त्या समितीवर बहिष्कार जाहीर केला होता. समितीचे चर्चेचे निमंत्रणही मोर्चाने स्वीकारले नव्हते. परिणामी, आंदोलनात नसलेल्या, म्हणजेच कायद्याच्या बाजूने असलेल्या ७३ संघटनांशीच समितीने चर्चा केली. या संघटना देशातील तीन कोटी १८ लाख शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात, असा शोध समितीने लावला आणि त्यापैकी बहुतांश शेतकरी कायद्यांच्या बाजूने असल्याचा निष्कर्ष काढला. तरीदेखील केवळ या अहवालाच्या आधारे पुन्हा कृषी कायदे आणणे, दिसते तितके सोपे नाही.
किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी हा त्यातील पहिला अडथळा आहे. त्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. शेतीचा उत्पादन खर्च काढण्याची पद्धत हा दुसरा प्रमुख अडथळा आहे. कृषी मूल्य आयोगाची ‘ए-२’ म्हणजे केवळ बियाणे, खते, वीज, पाणी या निविष्ठा जमेस धरण्याची पद्धत कुणालाच मान्य नाही. त्याऐवजी ‘सी-२’ म्हणजे विहीर, पाईपलाईन वगैरे मूळ भांडवली खर्च, शेतजमिनीचे भाडे, शेतकरी कुटुंबाचे श्रम, आदींचा उत्पादन खर्च काढताना विचार व्हावा, अशी मागणी आहे. ते गृहीत धरल्यानंतर मग खरोखर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होते का बघा, असे या विषयाच्या अभ्यासकांचे मत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचा मुहूर्त यंदाचाच आहे. तेव्हा आधी उत्पन्न दुप्पट होते, की पाठिंब्याच्या पावसाने दडी मारल्यामुळे पहिली पेरणी वाया गेली म्हणून कायद्यांचीच दुबार पेरणी होते, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन