शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ५० वर्षे ‘शरद पवार’ हीच बातमी! कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 09:04 IST

एस.टी.  कर्मचाऱ्यांच्या पाच महिने चाललेल्या आंदोलनास शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने विधायक वळण लागते आहे.

एस.टी.  कर्मचाऱ्यांच्या पाच महिने चाललेल्या आंदोलनास शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने विधायक वळण लागते आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात एस. टी. कर्मचारी या निर्णयाचे स्वागत करीत गुलाल उधळून आणि साखर वाटून स्वागत करीत होते. दरम्यान, शंभर-सव्वाशे जणांच्या जमावाने मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेपियन्स रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंगल्यावर चाल केली. त्यात एस. टी.चे कर्मचारी किती होते, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल.

कदाचित कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही असतील; पण राज्य शासन, एस. टी. महामंडळ, परिवहनमंत्री, आदी आस्थापना आणि त्या हाताळणाऱ्या व्यक्तींना सोडून राज्यसत्तेत प्रत्यक्ष सहभागी नसणाऱ्या शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करावा; त्यांचे वय, अनुभव, ज्येष्ठता आणि त्यांचे आजारपण पाहता शिवीगाळ करीत दगड मारणे, चपला फेकणे हे वर्तन अतिशय असभ्य होते. महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक समाजघटकांसाठी लढा देणाऱ्या दोन-तीन पिढ्या होऊन गेल्या. कामगार-कर्मचारी चळवळींचा भारतातील जन्मच मुळी मुंबई महानगरीत झाला आहे.

नारायण लोखंडे, श्रीपाद अमृत डांगे यांच्यापासून भाऊ फाटक, संतराम पाटील, यशवंत चव्हाण, दत्ता देशमुख, बाबा आढाव, किशोर पवार, बा. नं. राजहंस, आडम मास्तर, के. एल. मलाबादे, माधवराव गायकवाड, र. ग. कर्णिक अशी कितीतरी नावे घेता येतील, ज्यांनी श्रमिक वर्गाच्या हक्कासाठी आयुष्य खर्ची घातले. यापैकी बाबा आढाव आणि आदम मास्तर आजही कार्यरत आहेत. कर्मचारी-कामगार यांचे लढे लढताना त्यांच्या पदरी काहीतरी पडेल आणि ज्या आस्थापनांमध्ये ते कार्यरत असतील, त्यादेखील टिकून राहतील, याची काळजी घेतली जात होती. प्रश्नांवर निर्णय घेणारे नेमके कोण आहेत, त्यांच्याकडे आग्रह केला जात होता.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांपैकी एस. टी. महामंडळाचे सरकारीकरण करण्याची मागणी मान्य होण्यासारखी नव्हतीच. तेलंगणा आणि कर्नाटक सरकारनेही संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगून मालकी तुम्ही ठरवू नका, तो अधिकार सरकारचा आहे, पगारवाढ आणि इतर सोयी-सवलतींचे निर्णय घेऊन संप मिटविले. तसाच निर्णय महाराष्ट्रातही होणे अपेक्षित होते. सरकार, एस. टी. महामंडळ आणि कर्मचारी संघटना यांचे प्रयत्न अपुरे पडतात म्हणून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून मध्यस्थी केली होती. त्यांचा प्रशासनातील अनुभव लक्षात घेऊन एस. टी. कर्मचाऱ्यांनी शहाण्यासारखे निर्णय घेणे अपेक्षित होते. शरद पवार यांनी मदतच केली होती. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाने विलीनीकरणाचे काय करायचे याचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली. त्या समितीने विलीनीकरणाची मागणी फेटाळली होती.

इतका सारा प्रपंच झाल्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर शरद पवार यांच्या घरावर हल्ला करायचे काही कारणच नव्हते. पण एक वस्तुस्थिती आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पन्नास वर्षे ‘शरद पवार’ ही बातमीच आहे. त्यांच्या घरासमोर काही केल्याशिवाय आपल्याला महत्त्व येणार नाही, आपले म्हणणे ‘ऐकले’ जाणार नाही आणि त्याला प्रसिद्धीही मिळणार नाही, असा कयास करून दंगा घडवून आणण्याचा हा प्रयत्न होता. त्यांचा हेतू साध्य झाला. शरद पवार यांची भूमिका अनेक गोष्टींत महत्त्वाची असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यांची मते पटणारी नसली तरी कालांतराने ती सत्य असल्याचे सिद्ध होते.

एन्रॉन वीज प्रकल्पावरून इतका गोंधळ आणि शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले. आता तेच धोरण मोदी सरकार केवळ वीज नव्हे, तर अनेक क्षेत्रांत राबवीत आहे. संरक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रातही खासगी क्षेत्राला प्रवेश दिला जात आहे. आता सरसकट राबवले जाणारे धोरण तीस वर्षांपूर्वीच पवार यांनी आणले होते. पवार यांच्या विरोधात आंदोलन केल्याने माध्यमांतील त्यांचा तिरस्कार करणाऱ्यांच्या अंगातही संचारते. पोलिसांपेक्षा आधी ही माध्यमे शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर पोहोचतात, इतकी हातमिळवणी आहे. दंगा करणारे आणि ही माध्यमे; दोघेही आपली पोळी भाजून घेण्यासाठी बातमीमूल्य असणाऱ्या शरद पवार यांचा वापर करतात. ज्यांनी संपातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या नावाने शिमगा करणे, याचे कारण राजकारण, बातमीमूल्य, आपले महत्त्व वाढविणे हेच आहे. पोलिसांचे अपयश वगैरे आहेच. ‘शरद पवार’ ही आजही बातमी आहे, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले !

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसST Strikeएसटी संप