शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

महिला धोरणाची नवी झेप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 08:55 IST

यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण स्वीकारण्यापूर्वी त्याचा मसुदा चर्चेसाठी खुला केला आहे. हे नवे वळण नाही. त्या मसुद्याच्या नावापासूनच ही नवी झेप आहे, असे त्याचे वर्णन करावे लागेल.

महाराष्ट्राच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे नवे महिला धोरण जाहीर होण्याच्या आणि ते स्वीकारण्याच्या आधीच अभिनंदन करायला हवे ! विधिमंडळात त्या अनेक वर्षे कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथमच मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सत्तेचा प्रयोग हा नवे धोरण आणि कृती करण्यासाठी करायचा असतो, याची जाणीव असलेल्या यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण स्वीकारण्यापूर्वी त्याचा मसुदा चर्चेसाठी खुला केला आहे. हे नवे वळण नाही. त्या मसुद्याच्या नावापासूनच ही नवी झेप आहे, असे त्याचे वर्णन करावे लागेल. एकविसाव्या शतकाची भाषा बोलणारा हा मसुदा आहे.

थेट लैंगिक समानतेच्या मुद्याला हात घालून केवळ महिला कल्याणाची भाषा बोलून चालणार नाही, तर त्याला आरोग्य, आहार, शिक्षण, कौशल्य, हिंसा, उपजीविका, पायाभूत सुविधा, शासन आणि राजकीय सहभाग या सात मुद्द्यांच्या भोवती नवे धोरण आखले आहे. ते केवळ महिलांचे कल्याण या अर्थाने स्वीकारायचे नाही, याचाही स्पष्ट उल्लेख उद्दिष्टांमध्ये नमूद करण्यात आला आहे. महिलेला किंवा मुलींना तृतीयपंथीय, समलैंगिक व्यक्तीला लैंगिकतेच्या आधारेच वेगळी वागणूक मिळते. त्यांना आरोग्य, शिक्षण, आहार, कौशल्य, उपजीविकेचे साधन, राजकारण आणि प्रशासनात बाजूला ठेवले जाते. या लिंग प्रतियोगी भेदाभेदांवरच हल्ला चढविण्याचे धोरण स्वीकारून येणाऱ्या महिला धोरणात एक नवी झेप घेण्यात आली आहे.

त्यामुळे आजवर आखण्यात आणि स्वीकारण्यात आलेल्या चार धोरणासारखे आणखी एक पाचवे वळण नाही. ही नवी एकविसाव्या शतकातील बदलत्या समाजरचनेची स्पंदने ओळखण्याची पायरी आहे. जी सात उद्दिष्टे मसुद्यात नमूद केली आहेत. त्या प्रत्येक उद्दिष्टासाठी कृती आराखडा कोणता असेल याचाही स्पष्ट उल्लेख आणि कार्यक्रम मांडण्यात आला आहे. लिंगाधारित हिंसेला आळा घालण्याचा उल्लेख महिला धोरणात प्रथमच आला असेल. महिलेच्या नैतिक बळाचे खच्चीकरण करण्यासाठी लैंगिकतेचा वापर करण्यात येतो. ही हिंसा खूप भयावह असते. त्याला आळा घालणारी यंत्रणा पुरुषी मानसिकतेची असल्याने कायद्याची भीतीच वाटत नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा योग साधून हा मसुदा घेऊन यशोमती ठाकूर प्रतापगडावर गेल्या आणि शिवरायांच्या चरणी तो अर्पण केला.

महिलांविषयी आदर आणि भाव शिवाजी राजांच्या मनात काय होता, याची सर्वांना कल्पना आहे. जय भवानी, जय शिवाजीचा घोष देणाऱ्या या पुरुषांकडून महिलांचा लैंगिकतेच्या पातळीवर जेव्हा अपमान होताे, त्यांच्यावर अत्याचार होतात, त्यांना विकासाची आणि कौशल्यानुसार नवी झेप घेण्याची संधी डावलण्यात येते तेव्हा हा पुरुष पेटून उठत नाही. हे आपल्या समाजाचे अपयश आहे. तेव्हा ती शिवभक्ती किती दांभिक असते याचा प्रत्यय येतो.

यशोमती ठाकूर यांचा रोख मात्र योग्य दिशेने आहे. हे नवे महिला धोरण यशस्वी व्हायचे असेल तर उजवा हात काय करतो, हे डाव्या हाताला समजले पाहिजे. शासकीय यंत्रणेत ही मोठी उणीव आहे. लिंगाधारित हिंसेला आळा घालायचा असेल तर संपूर्ण गृहखात्याने या धोरणातील उद्दिष्टाच्या यशासाठी झटले पाहिजे. त्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत. आज पोलीस यंत्रणेचा महिला आणि तृतीयपंथीयांच्या विषयीचा व्यवहार कसा असतो, याचा अनुभव प्रत्ययाला येतो. अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. त्यात बदल अपेक्षित आहे. आरोग्य, शिक्षण, कौशल्य शिक्षण, उपजीविकेचे साधन, पायाभूत सुविधा आदींच्यासाठी लिंग भेदाभेद होऊ नये अशी अपेक्षा असेल तर त्या संबंधित शासकीय यंत्रणेचा त्यात सक्रिय सहभाग असायला हवा.

गेल्या चार दशकात लैंगिकतेशी जवळचा संबंध असलेला एड्सविरोधी कार्यक्रम राबविताना आरोग्य खात्याच्या धोरणांची कोणतीही माहिती गृहखात्याला असायची नाही. परिणामी, यात काम करणाऱ्या एका शासकीय कार्यक्रमासाठी दुसऱ्या शासकीय यंत्रणेशी झगडा करावा लागत असायचा. त्यात बराच कालापव्यय व्हायचा. आता येणारे महिला धोरण त्याच्या नावापासून बदलत आहे. ही खरेच नवी झेप असणार आहे. महिलांच्यावर लैंगिक असमानतेतून होणारी हिंसा रोखण्यासाठी आणि त्यांना सर्व पातळीवर समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांना यात सामावून घ्यावे लागेल, अन्यथा मोठ्या अपेक्षेने तयार केलेले नवे महिला धोरण त्या खात्यापुरतेच मर्यादित राहील.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र