शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जिंदगी के साथ ही...! इतिहासात इतका मोठा आयपीओ पहिल्यांदाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 07:25 IST

चाळीस कोटी पॉलिसीधारकांच्या माध्यमातून समाजात तळागाळापर्यंत रुजलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) साडेतीन टक्क्यांच्या भागविक्रीसह २१ हजार कोटी रुपये भांडवल उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

चाळीस कोटी पॉलिसीधारकांच्या माध्यमातून समाजात तळागाळापर्यंत रुजलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी)  साडेतीन टक्क्यांच्या भागविक्रीसह २१ हजार कोटी रुपये भांडवल उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेअर बाजाराच्या इतिहासात आजवर एवढ्या मोठ्या आकारमानाचा आयपीओ प्रथमच येत आहे. त्यामुळे देशाचे नव्हे तर जागतिक भांडवली बाजाराचे लक्ष या भागविक्रीने आकृष्ट केले आहे. एका महाकाय सरकारी कंपनीने भागविक्री करत घसघशीत भांडवल उभे केले, एवढीच या घटनेची व्याप्ती नाही तर या कंपनीच्या भागविक्रीसोबत अर्थसंस्कृतीचे एक नवे आवर्तन सुरू झाले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या आणि भांडवली बाजारात पडझड होते त्यावेळी खंबीरपणे बाजार सावरण्याची क्षमता असलेल्या एलआयसीसारख्या महाकाय वित्तीय संस्थेला प्राथमिक समभाग विक्री का करावी लागत आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न! कंपनीच्या समभाग विक्रीचे प्रामुख्याने दोन हेतू असतात. भागविक्रीच्या माध्यमातून उपलब्ध भांडवलाचा वापर व्यवसायवृद्धीसाठी करणे हा महत्त्वाचा हेतू! दुसरे म्हणजे या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे तसेच समभागांच्या माध्यमातून अल्प प्रमाणात का होईना, पण समभागधारकांना मालकी प्रदान करणे.  एलआयसीसारखी कंपनी चार ते पाच लाख कोटी रुपयांची उलाढाल वर्षाकाठी करते अन् या पैशांच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत यथोचित योगदान देतानाच बाजारही सावरते. प्रसंगी, कोसळलेल्या अनेक वित्तीय संस्था आणि बँकादेखील एलआयसीने सावरल्या आहेत. इतके भक्कम भांडवल आहे, शिवाय चाळीस कोटींच्या आसपास एलआयसीचे पॉलिसीधारक आहेत. याचाच अर्थ कंपनीची मुळे तळागाळापर्यंत अगदी घट्ट रुतलेली आहेत. त्यामुळे एलआयसीला भागविक्री का करावी लागते, याचा वरील दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने अर्थ लावायचा तर हाती फार काही लागत नाही. 

त्यामुळे या भागविक्रीचा हेतू राजकीय असावा असा निष्कर्ष काढण्यास वाव आहे. या भागविक्रीतून उभे राहणारे महाकाय भांडवल सरकारी खजिन्यातील वित्तीय तूट कमी करण्यासाठी वापरले जाईल की त्यातून देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, याचा उलगडा झालेला नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या नऊ वर्षांत (१९५६) स्थापन झालेल्या एलआयसीने विमा या प्रकाराशी तोवर संपूर्ण अनभिज्ञ असलेल्या भारतीय समाजाला जीवन विम्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला. कालौघात विमा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा शिरकाव झाला असला आणि त्यांनी ग्राहकांच्या बदललेल्या जीवनशैलीच्या अनुषंगाने कितीही सुलभ योजना सादर केल्या असल्या तरी, विम्याच्या बाजारपेठेत आजही नवे ग्राहक जोडण्यात एलआयसीचा वाटा हा ६६.४ टक्के इतका आहे. 

भागविक्री करताना लहान पॉलिसीधारकांची काळजी घेत त्यांना समभागविक्रीत दोन कोटी २० लाख शेअर राखीव ठेवले आहेत. प्रतिसमभाग किंमत ही ९०२ ते ९४९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. पॉलिसीधारकांना या समभाग खरेदीत ६० रुपयांची सूट मिळणार आहे. तर सामान्य गुंतवणूकदाराला या खरेदीत प्रतिसमभाग ४५ रुपयांची सूट मिळणार आहे. एवढ्या मोठ्या आकारमानाच्या कंपनीची जेव्हा भागविक्री होते, त्यावेळी किती शेअर समभागधारकांच्या वाट्याला येतात हा संशोधनाचाच मुद्दा आहे. दोन, पाच, दहा शेअर खिशात असून काही फायदा नाही. पण यानिमित्ताने आजवर पोस्ट, पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अशा गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांभोवतीच फिरणाऱ्या समाजातील एका मोठ्या सामान्य गुंतवणूकदार वर्गाचा हात धरून एलआयसी त्यांना बाजारपेठीय वाटेवर नेत आहे, हे मात्र मान्य केले पाहिजे. 

जागतिकीकरणानंतर खासगी कंपन्यांचा वाढता वावर ही भारतासाठी नवीन गोष्ट नाही. मात्र, तरीही जेव्हा एखाद्या क्षेत्रात सरकारी कंपनी पाय रोवून उभी असते तेव्हा त्या कंपनीचे बाजारातील अस्तित्व हा सामान्यांसाठी आधार असतो, हेही खरे. एलआयसीच्या समभाग विक्रीमुळे काही प्रमाणात हिस्सेदारी जरी बाजारात खुली होणार असली तरी, त्या कंपनीचे सरकारी मालकीचे कवच भक्कम असणे हे विमा क्षेत्रासाठी आधारवड असेल. अर्थात, भविष्यात जर सरकारी टक्केवारी कमी होत गेली आणि एलआयसीसारख्या संस्थेचे पूर्ण बाजारीकरण झाले तर मात्र तिथून बाजारपेठीय अर्थव्यवस्था कोणते वळण घेईल आणि ते वळण कोणती नवी आर्थिक संस्कृती रुजवेल, याचे भाकीत आजतरी वर्तविणे कठी

टॅग्स :Lic IPOएलआयसी आयपीओshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक