शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी खूप जास्त ताणले; आता तुटू देऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:20 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप पासंगालाही पुरणार नाही, एवढा प्रदीर्घ काळ संप मुंबईतील गिरणी कामगारांनी चालवला होता. त्याचे काय झाले, हे संपकरी कर्मचाऱ्यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांनी खूप जास्त ताणले आहे, आता तुटू देऊ नये!

अखेर ज्याची आशंका होती तेच झाले! अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा सोमवारी कामगार न्यायालयाने दिला. एसटीच्या इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ काळ चाललेला संप! वेतनवाढ आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यापैकी वेतनवाढ ही मागणी बव्हंशी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मात्र मान्य होण्यासारखी नव्हतीच! भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी प्रारंभी या मागणीला बळ दिले होते. परंतु वस्तुस्थिती ही आहे, की त्या पक्षाचे सरकार सत्तेत असते तरी त्यांनाही ती मागणी मान्य करता आली नसती! तांत्रिक अडचणी हे त्यामागचे सर्वात प्रमुख कारण; पण त्यापेक्षाही मोठे कारण हे आहे, की सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य केल्यास, राज्य सरकारच्या अखत्यारीतील इतरही अनेक महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनीही तशाच मागण्या रेटून धरल्या असत्या.

विलिनीकरणाची मागणी मान्य होणे शक्य नाही, हे संपकरी कर्मचाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे होते. दुर्दैवाने काही निहित स्वारस्य असलेल्या मंडळीनी एसटी कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि त्यांना संप रेटून धरण्यास भाग पाडले, असे दिसते. वस्तुत: सरकारने कमाल ४२ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ यापूर्वीच जाहीर केली आहे. त्या टप्प्यावर संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असता आणि इतर वैधानिक मार्गांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठीचा लढा सुरु ठेवला असता, तर त्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती गमावण्याची वेळ आली नसती. दुर्दैवाने त्यांना ते तारतम्य बाळगता आले नाही आणि त्यामुळेच आज संप बेकायदा ठरविला गेल्याचे बघण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.सर्वसामान्य मराठी माणसाचे एसटीसोबत एका वेगळेच जिव्हाळ्याचे नाते आहे. तो दैनंदिन प्रवासासाठी `लाल परी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या सर्वसाधारण बसेसवरच अवलंबून असतो. त्याला कोणत्याही सुखदु:खाच्या प्रसंगाच्या निमित्ताने प्रवास करावा लागतो, तेव्हा एसटीच वर्षानुवर्षांपासून त्याच्या सेवेत तत्पर असते. नादुरुस्त, गळक्या, खडखडाटामुळे डोके उठवणाऱ्या एसटी बसेसला मराठी माणूस लाख शिव्याशाप वाहत असेल, प्रसंगी विलंबाने धावणाऱ्या बसेससाठी कर्मचाऱ्यांवर त्याची चिडचिड होत असेल; पण प्रवासासाठी त्याची पहिली पसंती एसटीलाच असते! त्यामुळेच संपाच्या प्रारंभीच्या टप्प्यात सर्वसामान्यांची संपूर्ण सहानुभूती संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना लाभली होती. दुर्दैवाने आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. वाचकांच्या पत्रव्यवहारात प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याकडे जी पत्रे प्राप्त होतात, त्या पत्रांचा बदललेला सूर त्याची प्रचिती देत आहे.
सरकारने वेतनवाढ जाहीर केल्यानंतर आता संपकरी कर्मचाऱ्यांनी पुरे करायला हवे, तुटेपर्यंत ताणू नये, अशीच सर्वसामान्य माणसाची भावना होती. कोणत्याही लढाईत कुठे थांबायला हवे, याची सेनापतींना जाण असणे फार महत्त्वाचे असते. प्रत्येक लढाईचा अंत एका पक्षाच्या संपूर्ण नि:पाताने होत नसतो. तह हादेखील लढाईतील महत्त्वाचा भाग असतो. प्रत्यक्ष खडाजंगीपेक्षाही यशस्वी तह करणे यामध्येच सेनापतीचे खरे नैपुण्य असते. ती जाण ज्यांना असते, ते इतिहासाच्या पानांवर अजरामर होतात; अन्यथा प्रचंड शूर योद्ध्यांचेही नामोनिशाण शिल्लक राहात नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करीत असलेल्या मंडळींना दुर्दैवाने ती जाण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, या प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.संपापूर्वी अर्धीमुर्धी भाकर खाऊन निदान पित्याच्या छत्राखाली जगत असलेली त्यांची चिल्लीपिल्ली आज उघड्यावर आली आहेत. आताही संपाच्या नेत्यांनी समजूतदारपणा दाखवावा आणि जे पदरात पडले आहे, ते पावन करून घेत, उर्वरित मागण्यांसाठी वैधानिक मार्गांनी लढा द्यावा! अन्यथा गत काही दिवसात संपकरी कर्मचाऱ्यांची जी फाटाफूट सुरु झाली आहे, तिला न्यायालयाच्या निर्णयामुळे आणखी वेग येण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप पासंगालाही पुरणार नाही, एवढा प्रदीर्घ काळ संप मुंबईतील गिरणी कामगारांनी चालवला होता. त्याचे काय झाले, हे संपकरी कर्मचाऱ्यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांनी खूप जास्त ताणले आहे, आता तुटू देऊ नये!

टॅग्स :ST Strikeएसटी संप