शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिंजो आबे : भारताचा सच्चा मित्र हरपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 08:29 IST

आबे यांनी भारत-जपान द्विपक्षीय संबंधांना नवे आयाम देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निर्घृण हत्या हा केवळ जपानच नव्हे, तर भारतासह हिंद-प्रशांत क्षेत्रातील इतरही अनेक देशांसाठी मोठा हादरा आहे. आबे यांनी भारत-जपान द्विपक्षीय संबंधांना नवे आयाम देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना चाप लावण्यासाठी जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या हिंद-प्रशांत क्षेत्रातील चार प्रमुख देशांना एकत्र आणून ‘क्वाड’ या संघटनेचे गठन करण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्या अर्थाने आबे हे केवळ जपानचेच नव्हे, तर जागतिक नेते होते. द्वितीय महायुद्धाच्या समाप्तीनंतर शांततेची कास धरणारा देश म्हणून जपान जागतिक पटलावर पुढे आला. जपानचे सर्वसामान्य नागरिकही त्यांच्या शांत, शिस्तबद्ध आचरणासाठी ओळखले जातात. अशा देशात आबे यांच्यासारख्या राजकीय नेत्याची वैचारिक मतभेदांपोटी हत्या व्हावी, ही मोठीच शोकांतिका म्हटली पाहिजे.

तशी जगाला अशा राजकीय हत्यांची नवलाई नाही. गत दोन-अडीच हजार वर्षांत ज्युलियस सीझरपासून बेनझीर भुत्तोंपर्यंत अनेक राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. भारतातही इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या पंतप्रधानपद भूषविलेल्या दोन प्रमुख नेत्यांच्या हत्या झाल्या होत्या. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग या दोन महापुरुषांनाही माथेफिरूंच्या गोळ्यांना बळी पडावे लागले होते. ते दोघेही लौकिकार्थाने राजकीय नेते नव्हते; पण त्यांचा राजकारणाशी फार निकटचा संबंध होता. आता आबे यांचाही समावेश वैचारिक मतभेदांमुळे माथेफिरूंच्या कृत्यांचे बळी ठरलेल्या नेत्यांच्या यादीत झाला आहे. आबे यांनी युद्धोत्तर काळात सर्वाधिक काळ म्हणजे नऊ वर्षे जपानचे पंतप्रधानपद भूषविले होते.

एकूण चारदा त्यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली होती. जपानमधील राजकीय विश्लेषक त्यांना उजव्या विचारसरणीचे राष्ट्रवादी म्हणून संबोधत असत. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर अमेरिकेने जपानवर अनेक अपमानास्पद अटी, निर्बंध लादले होते. जपानला केवळ स्वसंरक्षणापुरतीच सैन्यदले बाळगता येतील, या अटीचाही त्यामध्ये समावेश होता. जपानच्या राज्यघटनेमध्येच तशी तरतूद करण्यात आली होती. आबे यांनी या तरतुदीच्या विरोधात आवाज बुलंद केला आणि २०१५ मध्ये सुरक्षा सुधारणा विधेयक मंजूर करून, जपानी सेनादलांना मित्र देशांच्या सेनादलांसह जपानी सीमांपलीकडेही संरक्षणासाठी आघाडी उघडता येईल, अशी सुधारणा केली.

आबे यांना त्यांच्या कडव्या राष्ट्रवादी भूमिकेसाठीच नव्हे, तर आर्थिक सुधारांसाठीही ओळखले जाते. त्यांच्या सरकारने राबविलेल्या आर्थिक सुधारणांचे चक्क आबेनॉमिक्स असे नामाभिधान झाले, ही वस्तुस्थिती त्या सुधारणा जपानसाठी किती महत्त्वपूर्ण होत्या, हे अधोरेखित करते. आबे यांचे योगदान केवळ जपानपुरतेच मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला होता. विशेषत: आंतरराष्ट्रीय कायद्यांना अनुसरून सागरी व्यापारी मार्ग अबाधित राहावे, यासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. दक्षिण चिनी सागरात चीनद्वारा सुरू असलेल्या दादागिरीची त्याला किनार होती.

चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांमुळे शेजारी देशांना भविष्यात निर्माण होऊ शकणारा धोका वेळीच ओळखून, चीनच्या विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी त्यांनी भरघोस प्रयत्न केले. त्यासाठी भारत, दक्षिण कोरिया, तैवान इत्यादी हिंद-प्रशांत क्षेत्रातील शेजाऱ्यांसोबत जपानचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. भारताचे तर ते सच्चे मित्र होते. भारताने पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. आबे यांच्या शिवाय हा सन्मान केवळ मदर तेरेसा आणि नेल्सन मंडेला या दोनच विदेशी नागरिकांना प्रदान करण्यात आला आहे. भारताने आपली भू-राजकीय पदचिन्हे केवळ हिंद महासागरापुरतीच मर्यादित ठेवू नये, तर त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असावे, असा आग्रह त्यांनी भारताकडे नेहमीच धरला होता.

भारताने मलाक्का सामुद्रधुनीच्या केवळ पश्चिमेलाच नव्हे, तर पूर्वेलादेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभवायला हवी, असे त्यांचे मत होते. केवळ सुरक्षाच नव्हे, तर आर्थिक आघाडीवरही आबे यांनी नेहमीच भारताला पूरक भूमिका घेतली. भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी जपान बांधील असल्याचा त्यांनी अनेकदा पुनरुच्चार केला होता. असा हा भारताचा सच्चा मित्र आता कायमस्वरूपी हरपला आहे.

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेJapanजपानIndiaभारत