शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: शेतकऱ्याचा जीव घ्याल का? मंत्रालयातले अधिकारी बांधावरचे वास्तव कधी पाहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:00 IST

सरकारनेच पुरस्कृत केलेल्या नॅनो युरिया खरेदीला शेतकरी तयार नाहीत हे वास्तव आहे.

‘शेत सुगीला आलं आहे, चारही कोपऱ्यातून त्याची  राखण करा,’ असे संत तुकाराम आपल्या अभंगातून सांगतात. जरी पीक चांगले आले तरी त्याचे जतन करा, राखण करा, विसावा घेऊ नका, असे ते सावधही करतात. खरिपाच्या तोंडावर आढावा बैठक घेऊन आपणही शेतकऱ्यांचे राखणदार आहोत, असा संदेश सरकार दरसाल देते. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत करण्याची प्रथा रूढ होत आहे. तसेच आता खरिपाचेही झाले आहे. दरवर्षीच सरकारमधील प्रमुख खरिपाच्या तोंडावर खतांची लिंकिंग आणि बोगस बियाणे विक्री खपवून घेणार नाही असा इशारा देतात. विक्रेते आणि पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्याचा दम भरतात. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा मनोदय व्यक्त केला. मात्र, प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षांपासून आलटून-पालटून आलेली आघाडी आणि महायुतीची सरकारे शेतकऱ्यांची लिंकिंगमधून सुटका करू शकलेली नाहीत. सरकारनेच पुरस्कृत केलेल्या नॅनो युरिया खरेदीला शेतकरी तयार नाहीत हे वास्तव आहे. 

नॅनो  युरियाच्या किमतीपेक्षा त्याच्या औषध फवारणीचा खर्च दुप्पट होऊन बसला. पर्यायाने पिकांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी उत्पादन खर्च दुपटीने वाढला, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. मायबाप सरकार पुरवठादारांना नॅनो युरिया विक्रीचे टार्गेट देते. मग, दुकान विक्रेते त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीला धरतात. खतांबरोबर या नॅनो खरेदीशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर नाही, अशी ही लिंकिंग. दुकानातील दर्शनी भागावर खतांचा साठा लिहिण्याचे आदेश सरकार देते. पण, प्रत्यक्षात कृषी खात्याकडून त्याची अभावानेच तपासणी होते. विक्रेत्यांच्या गोदामावर धाड पडली आणि खत डेपो शेतकऱ्यांना खुले झाल्याचे फारसे ऐकिवात येत नाही. एखाद दुसऱ्या प्रकरणात दुकानदारांचे लायसन्स रद्द होते. सरकार एकीकडे सबसिडी, अनुदान देते आणि दुसरीकडे अनावश्यक खतांच्या खरेदीची वेळ लिंकिंगमुळे शेतकऱ्यांवर ओढवते.

बोगस बियाणांच्या विरोधात राज्यात अनेक जिल्ह्यांत ग्राहक मंचाकडे तक्रारी दाखल आहेत. यातील गंमत म्हणजे बीज गुणनियंत्रक, तालुका कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांच्या पथकाने बियाणे बोगस असल्याचा अहवाल दिला म्हणजे शेतकऱ्याला न्याय मिळाला असे नव्हे. कारण पोलिस ठाण्यात संबंधित बियाणे कंपनीवर एफआयआर दाखल करण्यास अधिकारी धजत नाहीत. त्याऐवजी 'आमचा अहवाल घ्या अन् तुम्हीच ग्राहक मंचाकडे दाद मागा व नुकसानभरपाई घ्या', असा सरकारी सल्ला ही समिती देते. शेतकऱ्याला सरकार वकीलही देत नाही. शेतकऱ्यानेच हा खटला ग्राहकमंचात लढायचा. त्यासाठी जिल्हा मुख्यालयी ग्राहक मंचाकडे खेटा मारायच्या. शेतातली कामे सोडून अन् पोटाला चिमटा घेऊन त्यानेच बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीशी लढायचे. एवढे करूनही शेतकरी हा खटला हरला तर खटल्याचा खर्चही अंगावर पडतो. म्हणजे पीकही गेले, उलट कोर्टकचेरीतूनही खिशाला चाट ती वेगळीच! कृषी विभाग मात्र नामानिराळा राहणार व किती पेरणी झाली याचे गोंडस आकडे फेकत राहणार.

मंत्रालयात बसून धोरणे ठरविणारे अधिकारी बांधावरचे हे वास्तव कधीतरी पाहणार आहेत का? बोगस बियाणांच्या प्रकाराबाबत सरकार जागरुकता दाखवत आहे याचे स्वागतच. केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवर शेतकऱ्यांनी बियाणे विकत घ्यावे, जेणेकरून फसवणूक टळेल असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पण, सरकारवर असे आवाहन करण्याची वेळच का येते? बोगस बियाणे तयार करणारे व खतांचे लिकिंग करणारे सरकारला घाबरत का नाहीत? त्यांची हिंमत का आणि कशामुळे वाढते आहे? केवळ खरीपच नाही, शेतीच्या इतर योजनांबाबतही पुनर्विचार व्हायला हवा. वैयक्तिक लाभाच्या योजना अनेक दिवसांपासून बंद होत्या. या योजनांतही अटी-शर्ती मोठ्या आहेत. साधी कांदाचाळ बांधायची असेल तरी ढीगभर अटी! शेतकऱ्याकडील जागेची उपलब्धता व त्याची गरज लक्षात न घेता सरकार स्वत:च्या अटी शेतकऱ्यावर लादते. बियाणे कंपन्यांनी कसे बियाणे पुरविले हे प्रशासन पाहत नाही. पण कांदाचाळीचे मोजमाप अचूक घेऊन शेतकऱ्यावर मात्र बारीक नजर. ही उफरटी धोरणे बदलायला हवीत. शेतावरील गोफण ही पीक लुटणारे थवे थांबविण्यासाठी आहे. या गोफणीने शेतकऱ्यांचा जीव घेऊ नये.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार