शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

अग्रलेख: शेतकऱ्याचा जीव घ्याल का? मंत्रालयातले अधिकारी बांधावरचे वास्तव कधी पाहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:00 IST

सरकारनेच पुरस्कृत केलेल्या नॅनो युरिया खरेदीला शेतकरी तयार नाहीत हे वास्तव आहे.

‘शेत सुगीला आलं आहे, चारही कोपऱ्यातून त्याची  राखण करा,’ असे संत तुकाराम आपल्या अभंगातून सांगतात. जरी पीक चांगले आले तरी त्याचे जतन करा, राखण करा, विसावा घेऊ नका, असे ते सावधही करतात. खरिपाच्या तोंडावर आढावा बैठक घेऊन आपणही शेतकऱ्यांचे राखणदार आहोत, असा संदेश सरकार दरसाल देते. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत करण्याची प्रथा रूढ होत आहे. तसेच आता खरिपाचेही झाले आहे. दरवर्षीच सरकारमधील प्रमुख खरिपाच्या तोंडावर खतांची लिंकिंग आणि बोगस बियाणे विक्री खपवून घेणार नाही असा इशारा देतात. विक्रेते आणि पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्याचा दम भरतात. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा मनोदय व्यक्त केला. मात्र, प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षांपासून आलटून-पालटून आलेली आघाडी आणि महायुतीची सरकारे शेतकऱ्यांची लिंकिंगमधून सुटका करू शकलेली नाहीत. सरकारनेच पुरस्कृत केलेल्या नॅनो युरिया खरेदीला शेतकरी तयार नाहीत हे वास्तव आहे. 

नॅनो  युरियाच्या किमतीपेक्षा त्याच्या औषध फवारणीचा खर्च दुप्पट होऊन बसला. पर्यायाने पिकांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी उत्पादन खर्च दुपटीने वाढला, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. मायबाप सरकार पुरवठादारांना नॅनो युरिया विक्रीचे टार्गेट देते. मग, दुकान विक्रेते त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीला धरतात. खतांबरोबर या नॅनो खरेदीशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर नाही, अशी ही लिंकिंग. दुकानातील दर्शनी भागावर खतांचा साठा लिहिण्याचे आदेश सरकार देते. पण, प्रत्यक्षात कृषी खात्याकडून त्याची अभावानेच तपासणी होते. विक्रेत्यांच्या गोदामावर धाड पडली आणि खत डेपो शेतकऱ्यांना खुले झाल्याचे फारसे ऐकिवात येत नाही. एखाद दुसऱ्या प्रकरणात दुकानदारांचे लायसन्स रद्द होते. सरकार एकीकडे सबसिडी, अनुदान देते आणि दुसरीकडे अनावश्यक खतांच्या खरेदीची वेळ लिंकिंगमुळे शेतकऱ्यांवर ओढवते.

बोगस बियाणांच्या विरोधात राज्यात अनेक जिल्ह्यांत ग्राहक मंचाकडे तक्रारी दाखल आहेत. यातील गंमत म्हणजे बीज गुणनियंत्रक, तालुका कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांच्या पथकाने बियाणे बोगस असल्याचा अहवाल दिला म्हणजे शेतकऱ्याला न्याय मिळाला असे नव्हे. कारण पोलिस ठाण्यात संबंधित बियाणे कंपनीवर एफआयआर दाखल करण्यास अधिकारी धजत नाहीत. त्याऐवजी 'आमचा अहवाल घ्या अन् तुम्हीच ग्राहक मंचाकडे दाद मागा व नुकसानभरपाई घ्या', असा सरकारी सल्ला ही समिती देते. शेतकऱ्याला सरकार वकीलही देत नाही. शेतकऱ्यानेच हा खटला ग्राहकमंचात लढायचा. त्यासाठी जिल्हा मुख्यालयी ग्राहक मंचाकडे खेटा मारायच्या. शेतातली कामे सोडून अन् पोटाला चिमटा घेऊन त्यानेच बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीशी लढायचे. एवढे करूनही शेतकरी हा खटला हरला तर खटल्याचा खर्चही अंगावर पडतो. म्हणजे पीकही गेले, उलट कोर्टकचेरीतूनही खिशाला चाट ती वेगळीच! कृषी विभाग मात्र नामानिराळा राहणार व किती पेरणी झाली याचे गोंडस आकडे फेकत राहणार.

मंत्रालयात बसून धोरणे ठरविणारे अधिकारी बांधावरचे हे वास्तव कधीतरी पाहणार आहेत का? बोगस बियाणांच्या प्रकाराबाबत सरकार जागरुकता दाखवत आहे याचे स्वागतच. केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवर शेतकऱ्यांनी बियाणे विकत घ्यावे, जेणेकरून फसवणूक टळेल असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पण, सरकारवर असे आवाहन करण्याची वेळच का येते? बोगस बियाणे तयार करणारे व खतांचे लिकिंग करणारे सरकारला घाबरत का नाहीत? त्यांची हिंमत का आणि कशामुळे वाढते आहे? केवळ खरीपच नाही, शेतीच्या इतर योजनांबाबतही पुनर्विचार व्हायला हवा. वैयक्तिक लाभाच्या योजना अनेक दिवसांपासून बंद होत्या. या योजनांतही अटी-शर्ती मोठ्या आहेत. साधी कांदाचाळ बांधायची असेल तरी ढीगभर अटी! शेतकऱ्याकडील जागेची उपलब्धता व त्याची गरज लक्षात न घेता सरकार स्वत:च्या अटी शेतकऱ्यावर लादते. बियाणे कंपन्यांनी कसे बियाणे पुरविले हे प्रशासन पाहत नाही. पण कांदाचाळीचे मोजमाप अचूक घेऊन शेतकऱ्यावर मात्र बारीक नजर. ही उफरटी धोरणे बदलायला हवीत. शेतावरील गोफण ही पीक लुटणारे थवे थांबविण्यासाठी आहे. या गोफणीने शेतकऱ्यांचा जीव घेऊ नये.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार