शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

किती ‘झोडपणार’?; सरकारी पातळीवर विसंगतींबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:12 IST

शेतकऱ्यांनी पिकाविमा काढावा म्हणून पंतप्रधान स्वत: आवाहन करतात. मात्र, विमा मंजूर होण्याचे निकष किचकट आहेत. महसूल मंडळात किती पाऊस पडतो त्यावर ही भरपाई ठरते. विमा कंपन्या आकडे पाहतात.

जनावरांच्या गोठ्यात ‘लम्पी’ अन् शेतात पावसाचे तांडव अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. जनावरे आणि पिके ही शेतकऱ्यांची अपत्ये; पण ही दोन्ही अपत्ये संकटात आहेत. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात पावसाने हाहाकार उडविला आहे. राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. मान्सून विलंबाने दाखल झाला, मात्र तो आता धुमाकूळ घालतो आहे. विदर्भात पावसाचे थैमान मोठे आहे. येथील बहुतांश जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. नद्यांना पूर आले. धरणांचे दरवाजे उघडावे लागले. धरणांतून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला. घरे पडली. काही ठिकाणी जनावरे दगावली. मनुष्यहानीही झाली. विदर्भात ऑगस्टमध्येही पावसाने मोठे नुकसान झाले होते तेव्हाच पिके कोलमडून पडली होती. सप्टेंबरमध्ये पुन्हा पाऊस बेसुमार कोसळतोय. त्यात सोयाबीन, कपाशीचे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. कापसाची बोंडे काळी पडली. सोयाबीन भरण्याच्या अवस्थेत आहे. त्याला व धानालाही फटका बसलाय. अतिउष्म्यामुळे उन्हाळ्यात संत्र्यांची गळती झाली होती. आता उरली सुरली संत्रीही झडताहेत.

मराठवाड्यातही ४ लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसान झाले. हे नुकसान ५९९ कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जवळगावसह खान्देशातही पिकांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. कोल्हापूर पट्ट्यातही पावसामुळे सोयाबीनसारख्या पिकाला फटका बसला. कोल्हापूर ऊस उत्पादनात आघाडीवर आहे. उसाच्या वाढीसाठी उन हवे असते. पावसामुळे उन्हाचे प्रमाण घटले. त्याचा उसाच्या टनेजला फटका बसू शकतो. जे नुकसान कदाचित मोजलेही जाणार नाही. पावसाने अशा अनेक बाबी प्रभावित झाल्या आहेत. राज्य सरकारने जून ते ऑगस्टदरम्यान पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. २७ लाख शेतकरी व २३ लाख ८१ हजार हेेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा आकडा आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानीचे प्रमाण ठरलेले आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ही की यावर्षी या मदतीत वाढ करण्यात आली आहे. अगोदर ही मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत होती. ती मर्यादा आता तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मदतीच्या रकमांतही दुपटीने वाढ केली गेली. पण या मदतीने सर्व नुकसान भरून निघेल अशी परिस्थिती नाही. उत्पादन खर्चदेखील यातून भरून निघत नाही. या पावसाने बळिराजाचा पूर्ण वर्षाचा ताळेबंद बिघडणार. कदाचित रब्बीत पिके येतील; पण खरीप हातून गेला. नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान होत असेल तर सरकारइतकीच जबाबदारी विमा कंपन्यांची आहे.

शेतकऱ्यांनी पिकाविमा काढावा म्हणून पंतप्रधान स्वत: आवाहन करतात. मात्र, विमा मंजूर होण्याचे निकष किचकट आहेत. महसूल मंडळात किती पाऊस पडतो त्यावर ही भरपाई ठरते. विमा कंपन्या आकडे पाहतात. हवामानशास्त्र विभाग जे आकडे मांडेल त्यावरून या कंपन्या भरपाई ठरवितात. हा विभागच आकडे लपवतो, असा आरोप हवामान तज्ज्ञांनी केला आहे. विमा कंपन्यांविरोधात मराठवाड्यातील शेतकरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढले. त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. परंतु सर्वच शेतकरी अशी लढाई देऊ शकत नाही. जून महिन्यात पाऊस नसल्याने मूग, उडिद ही पिके गेली. त्याबाबत विमा कंपन्यांनी अद्याप काहीच भरपाई दिली नाही. स्थानिक नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली तर विमा विमा कंपन्या २५ टक्के अग्रीम देऊ शकतात. मात्र, जिल्हाधिकारी या अधिसूचनाच काढत नाहीत. पीक विमा काढण्याबाबत कृषी विभाग जनजागृती करतो. विमा भरपाई देताना या विभागाचे म्हणणे मात्र जाणून घेतले जात नाही. त्यांना पूर्ण बाजूला ठेवले जाते. सरकारी पातळीवर या विसंगतींबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अस्मानी संकट आहेच. पण पीक पदरात पडल्यानंतरही भाव मिळेल याची शाश्वती तरी कुठेय? सोयाबीनचे दर गतवर्षी बारा हजारांवर गेले होते. आता ते पाच हजारांवर आले. पिकांच्या दरातही शेतकरी असा झोडपला जातो. सर्व बाजूने त्याला झोडपणे सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी