शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अजातशत्रू कॉम्रेड..! थेट इंदिरा गांधींच्या निवासस्थानी पोहचले अन् काही दिवसांतच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 07:47 IST

एसएफआयला देशभरात रुजवण्यात येचुरी यांचा वाटा खूप मोठा. पुढे ते पॉलिटब्युरोचे सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीसही झाले.

सप्टेंबर १९७७ मधील घटना! देशातील आणीबाणी हटली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला. तरीही त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ‘चॅन्सेलर’पद म्हणजे पदसिद्ध असे कुलपतीपद सोडले नव्हते. विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीचा एक तरुण नेता थेट इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचला. या आंदोलकांच्या आग्रहामुळे गांधी घराबाहेर आल्या. त्या तरुणाने मागण्यांचे निवेदन ठामपणे वाचून दाखवले. त्यात इंदिरा गांधी यांच्या राजीनाम्याचीही मागणी होती. सुरुवातीला त्या बधल्या नाहीत. पण काही दिवसांतच इंदिरा गांधींनी ते पद सोडले.

हे घडवून आणणारा तरुण होता- कॉम्रेड सीताराम येचुरी. त्यांच्या निधनानंतर या प्रसंगाचे छायाचित्र समाजमाध्यमांवरून ‘व्हायरल’ झाले आणि येचुरींचा अवघा जीवनपटच समोर आला. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील बुद्धिमान आणि जनमान्य नेत्यांपैकी ते एक. आजच्या या वातावरणात त्यांची सर्वाधिक गरज असतानाच त्यांचे नसणे व्याकुळ करणारे आहे. येचुरी यांचा जन्म तेव्हाच्या मद्रासमध्ये झाला. आई सरकारी अधिकारी आणि वडील आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता. येचुरी मात्र सरकारी नोकरीच्या दिशेने गेले नाहीत.

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत, त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले. बारावीच्या ‘सीबीएसई’ परीक्षेत संपूर्ण भारतात अव्वल स्थान मिळवणारे येचुरी हे मुळातच स्कॉलर. मात्र,स्वतःच्या करिअरपेक्षा शोषित-वंचितांसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. शहाण्यांच्या या जगात वेडा ठरलेला हा माणूस त्यामुळेच संधिसाधू राजकारण्यांच्या भाऊगर्दीत वेगळा ठरला. स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी जन्मलेल्या येचुरींनी राजकारणातील खूप बदल पाहिले. मात्र, आपल्या मूल्यांवर अढळ निष्ठा असलेल्या येचुरींनी अखेरच्या क्षणापर्यंत आपली वाट सोडली नाही. जेएनयूत असताना, स्टुडंट्स युनियनचे ते सलग तीन वेळा अध्यक्ष होते. हा तरुण एसएफआयच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत आणि पुढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) माध्यमातून राजकारणात सक्रिय झाला.

एसएफआयला देशभरात रुजवण्यात येचुरी यांचा वाटा खूप मोठा. पुढे ते पॉलिटब्युरोचे सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीसही झाले. चळवळीच्या दिवसांतील सहकारी प्रकाश करात यांच्यासह त्यांनी पक्षाचे जुने-जाणते नेते हरकिशन सिंग सुरजित, ज्योती बसू यांच्या मनातही स्थान मिळवले. येचुरी अस्खलित मराठी बोलत. मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या. त्यांचे वाचन अफाट होते. तसेच त्यांनी स्वतः निर्माण केलेली ग्रंथसंपदाही मोठी आहे. २००५ ते २०१७ या काळात येचुरी राज्यसभेचे खासदार होते. ‘आमची लोकशाही प्राचीन आहे’, असे म्हणणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांना- बराक ओबामांना- त्यांनी सुनावले होते. ‘१९६५ पर्यंत तुमच्या देशात प्रत्येकाला मताधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येक स्त्री-पुरुषाला पहिल्या दिवसापासून मताधिकार आहे. म्हणून प्राचीन लोकशाही आमचीच आहे!’

लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेशी असलेली निष्ठा त्यांनी अखेरपर्यंत जपली. प्रसंगी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊनही. साम्यवाद्यांची पोथीनिष्ठ म्हणूनही संभावना होतेच, येचुरी मात्र एकाच वेळी महात्मा गांधी आणि फिडेल कॅस्ट्रो अशा दोघांचेही चाहते! निवडणुकीच्या राजकारणात उतरूनही येचुरी यांचे मैत्र पक्षाच्या सीमा ओलांडत राहिले. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार आणण्यात त्यांची भूमिका बरीच महत्त्वाची होती. एकाच वेळी धर्मांधता आणि जागतिकीकरणाला विरोध करत असतानाच, आपला प्राधान्याचा शत्रू कोण, हे त्यांनी ओळखले होते. यूपीए-१ सरकारच्या काळात त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे पाठपुरावा करून मनरेगा, माहितीचा कायदा, अन्नसुरक्षेचा कायदा आदी निर्णय तडीला नेण्यात मोठी भूमिका बजावली. मनमोहन सिंग सरकारने भारत-अमेरिका नागरी आण्विक करार केला, तेव्हा त्यांचे सहकारी प्रकाश करात यांची भूमिका ताठर होती. पण येचुरी यांनी समंजस भूमिका घेतली.

१९९०च्या दशकानंतर जगभर सर्वत्र साम्यवादी सरकारांची पडझड होत होती आणि डाव्या विचारसरणीला ओहोटी लागली होती. देशातही पश्चिम बंगाल आणि केरळसारखे गड डाव्यांच्या हातून निसटत होते. या पडत्या काळातही त्यांची आपल्या विचारांवरची श्रद्धा ढळली नाही. माकपच्या विचारांची मशाल पेटती ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न त्यांनी केला. राजकीय नेते कसे नसावेत, याची भरमसाठ उदाहरणे समोर दिसत असताना, असा एक नेता आपल्या देशात होता, यावर उद्या कदाचित अनेकांचा विश्वास बसणार नाही!

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधी