शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

अग्रलेख: गांधी युगाची शताब्दी! शंभर वर्षांपूर्वी मांडलेली भूमिका अजरामर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:29 IST

काँग्रेसचे बहुमत असतानाही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकरांची निवड केली गेली. हा गांधी युगाचाच महिमा हाेता

मोहनदास करमचंद गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून १९१५ मध्ये आगमन झाले. आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि त्यामागची भूमिका सर्वत्र माहीत झाली होती. भारतात येताच त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी चालू असलेल्या राष्ट्रीय चळवळीत स्वत:ला झोकून दिले. त्यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना संपूर्ण देशाचा प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. शेतकरी, कामकरी, उपेक्षित वर्गाच्या समस्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. परिणामी, त्यांनी  चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या लढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्य लढ्याशी पहिल्यांदाच शेतकरी जाेडणारा हा सत्याग्रह हाेता. गुजरातमधील खेडा येथील सत्याग्रहदेखील त्याचवर्षी लढविला गेला. त्याचे नेतृत्वच गांधी यांनी केले हाेते.

आताच्या उत्तर प्रदेशात असलेल्या गाेरखपूरजवळील चोरीचौरा येथे सत्याग्रहाचा तिसरा  लढा १९२२ मध्ये उभा राहिला. शांततेच्या मार्गाने लढणाऱ्या सत्याग्रहींवर पाेलिसांनी बेछूट गाेळीबार केला. त्याचा प्रतिकार करताना सत्याग्रहींनी पोलिसांवर हल्ला करून काही पोलिसांना ठार केले. गांधींना हा हिंसाचार मान्य नव्हता. त्यांनी तातडीने चाैरीचाैराचा सत्याग्रह स्थगित केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अधिवेशन तत्कालीन मुंबई प्रांतातील बेळगाव येथे २६ ते २८ डिसेंबर १९२४ यादरम्यान पार पडले. या अधिवेशनासाठी महात्मा गांधींची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लाेकमान्य टिळकांचा राष्ट्रीय चळवळीवर, पर्यायाने काँग्रेसवर प्रभाव हाेता. त्यांचे निधन १९२० मध्ये झाले हाेते आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी, कामकरी, आदिवासी, हरिजन आदी समाजघटकांना स्वातंत्र्य लढ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याची एकही संधी महात्मा गांधी साेडत नव्हते.

परिणामी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला व्यापक प्रतिसाद मिळू लागला आणि गांधी युगाचा प्रारंभ झाला. विविध सत्याग्रहांतील अनुभवांच्या आधारे महात्मा गांधींनी ‘सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह’ ही त्रिसूत्री मांडायला सुरुवात केली हाेती. टिळक युगात जहाल- मवाळ हा वाद हाेऊन स्वातंत्र्य लढ्यात विभागणी झाली हाेती. बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी आज साजरी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य लढ्याच्या दीर्घ कालखंडात महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एकमेव अधिवेशनाकडे पाहिले पाहिजे. कारण पुढे काँग्रेसची राष्ट्रीय चळवळ याच त्रिसूत्रीने चालविण्यात आली. बेळगावमध्ये शंभर वर्षांपूर्वी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ऐतिहासिक महत्त्व यासाठी आहे की, याच अधिवेशनात ‘सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह’ या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा निर्णय झाला. ही राष्ट्रीय चळवळ सामान्य माणसांच्या झाेपडीपर्यंत पाेहाेचविण्याचे वळण महात्मा गांधींनी घ्यायला लावले. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी महात्मा गांधी काेलकात्यात उसळलेल्या हिंदू- मुस्लीम दंगली शमविण्यासाठी पायपीट करीत हाेते.

सत्तेचा परीघ  त्यांना कधीच स्पर्श करू शकला नाही. बेळगावचे काँग्रेस अधिवेशन अपवादात्मक ठरले आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील गांधी युग सुरू झाले. त्या अर्थाने आज हाेत असलेले शताब्दी अधिवेशन म्हणजे गांधी युगाचीच शताब्दी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आठवे दशक चालू असले तरी त्या स्वातंत्र्यावर गारूड झालेले गांधी युग ना यत्किंचितही कमी लेखले जाऊ शकते, ना इतिहासाच्या पानापानांतून बाजूला करता येते. जगभरातील राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय संघर्ष पाहिले, तर महात्मा गांधींनी बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनात मांडलेल्या ‘सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह’ या तत्त्वांना आजही तितकेच महत्त्व आहे. गांधी युगापासूनच स्वातंत्र्य लढ्याला व्यापक पाठिंबा मिळू लागला. परिणामी, लाहाेर येथे १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला. ही चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे प्रमुखपद देण्याचा आग्रह गांधींनी केला. राज्यघटना समितीत काँग्रेसचे बहुमत असतानाही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकरांची निवड केली गेली. हा गांधी युगाचाच महिमा हाेता.

सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, खान माेहम्मद अब्बास खान, खान अब्दुल गफार खान, चक्रवर्ती राजगाेपालाचारी, अनुग्रह नारायण सिन्हा, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी, माैलाना अब्दुल कलाम आझाद, अशी नेतृत्वाची फळी याच गांधी युगाने उभारली. सध्याच्या द्वेषाच्या आणि धार्मिक उन्मादाच्या पार्श्वभूमीवर शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनात मांडलेली भूमिका अजरामर झाली. त्यामुळे ही काँग्रेसच्या अधिवेशनाची नव्हे, तर महात्मा गांधी युगाची शताब्दी आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेस