शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सारेच शेजारी उपद्रवी; दररोज वाढवताहेत अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 05:56 IST

निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत.

निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत. अगदी आताचे उदाहरण म्हणजे बांग्लादेशचे. दुर्गापूजेचा उत्सव पश्चिम बंगालमध्येही वर्षानुवर्षे उत्साहाने, आनंदाने साजरा होतो; कारण बांग्लादेश व पश्चिम बंगाल यांचे पूर्वापर नाते आहे. ते जसे भाषिक आहे, तसेच सांस्कृतिकही आहे. धर्म भलेही वेगळे असोत; पण दोन्हीकडील लोकांमधील सांस्कृतिक वीण इतकी वर्षे टिकून आहे. खरे तर आता ती टिकून होती, असे म्हणायची वेळ आली आहे, याचे कारण दुर्गापूजेच्या काळात यंदा बांग्लादेशात झालेला हिंसाचार. यंदाचा हा हिंसाचार धार्मिक आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम असे स्वरूप त्याला आले आहे. त्यामुळेच बहुसंख्य हिंदू राहत असलेल्या भारताला त्याची दखल घेणे, काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

या हिंसाचारात दुर्गापूजेचे मंडप तोडून टाकण्यात आले, इस्कॉन मंदिराचे नुकसान करण्यात आले आणि काहींना तर ठारच मारण्यात आले. अलीकडील काळातच काय, पण पूर्वीही बांग्लादेशात हिंदूंवर इतके हल्ले झाले नव्हते; पण सर्वच देशांत अतिरेकी वा टोकाचा धार्मिक विचार करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे असहिष्णुता वाढणे स्वाभाविकच आहे. याला बांग्लादेशही अपवाद राहिलेला नाही. बांग्लादेशचे सरकार हिंसाचाराच्या विरोधात बोलत आहे, अनेक जणांवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. पण दुर्गापूजा उत्सवामुळे एरवी जो धार्मिक सलोखा वाढत असे, त्याला यंदा तडाच गेला आहे. त्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. अगदी अमेरिकेतही बांग्लादेशातील हिंसाचाराविरोधात निदर्शने झाली, अन्य देशांनीही त्याची निर्भर्त्सना केली. भारतात त्याची उलटी प्रतिक्रिया आली नाही, हे सुदैवच म्हणायला हवे. आपल्याकडेही टोकाचा विचार करणारे व असहिष्णू लोक आणि त्यांच्या संघटना बक्कळ आहेत. तरीही इथे अद्याप शांतता आहे, ही बाब समाधानाची.
बांग्लादेश हे अलीकडील काळातील उदाहरण; पण भारताचे अन्य शेजारी देशही गेल्या काही काळात उपद्रवी बनले आहेत किंवा त्यांच्या उपद्रवाचे प्रमाण वाढले आहे, असे म्हणता येईल. भारत आणि या शेजारी राष्ट्रांमधील संबंध पूर्वीइतके मधुर वा चांगले न राहिल्याचाच हा परिणाम म्हणता येईल. पाकिस्तान तर कायमच त्रास देणारा शेजारी आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर सतत तणाव असतो, तेथून घुसखोरी होत असते. तेथील गुप्तचर यंत्रणा भारतातील तरुणांना, गुन्हेगारांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत असतात. काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यात आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात पाकिस्तानचाच हात असतो. आपण भारताविरुद्धचे युद्ध कधीही जिंकू शकणार नाही, हे माहीत असल्याने पाकिस्तान अशा उपद्रवी कारवाया करीत असतो. पाकिस्तानच्या कारवायांमुळेच गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये अशांतता आहे. रोज चकमकी होत आहेत, अतिरेकी मरत आहेत आणि भारताच्या सुरक्षा दलाचे जवानही शहीद होत आहेत.
लडाख आणि अरुणाचलच्या सीमेवर चीनचे सैनिक रोजच त्रास देत आहेत. गेल्या वर्षी ते गलवान खोऱ्यात घुसले. यंदा उत्तराखंडात घुसून त्यांनी एक पूल तोडून टाकला. अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग आहे, असा दावा चीन सतत करतो आणि तिथेही कुरापती काढत असतो. आता तर चीनने युद्धाची भाषा सुरू केली आहे. तसे प्रत्यक्ष घडणार नाही, ही बाब वेगळी; पण त्या सीमेवरही आपल्याला सावध राहावे लागणार आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या भूतानच्या सीमा सांभाळण्याचे काम आपण आतापर्यंत करीत आलो, त्या भूताननेच अलीकडे चीनशी परस्पर व आपल्याला अंधारात ठेवून एक करार केला आहे.  नेपाळ हा भारताचा दोस्त असे आपण मानत राहिलो; पण आता नेपाळलाही आपल्यापेक्षा चीनच अधिक जवळचा वाटू लागला आहे. नेपाळ, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका यांना अर्थसाहाय्य करून चीन त्यांना आपल्या कवेत घेत आहे. आपणही या देशांना मदत करतोच; पण त्या देशांशी आपले संबंध पूर्वीइतके उत्तम राहिले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ते सुधारावे लागतील. पाकिस्तान व बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, म्हणून आपण तसे वागून चालणार नाही. तसे केल्याने संबंध आणखी बिघडतील. चीनच्या हातात कोलीत मिळता कामा नये. त्यासाठी शेजारी अधिक उपद्रवी असून चालणार नाही. ती जबाबदारीही आपलीच आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशindia china faceoffभारत-चीन तणावPakistanपाकिस्तानNepalनेपाळ