शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

संपादकीय: तो सुदिन कधी उगवेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 09:30 IST

आपल्या देशाने १९९१ मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला. त्याच मार्गावरील हे आणखी एक पाऊल आहे. कोणत्याही मुद्द्यावर साधकबाधक चर्चा ना करता आक्रस्ताळी भूमिका घेण्याची सवयच आपल्या देशातील राजकीय मंडळींना गत काही काळापासून जडली आहे.

कोणत्याही मुद्द्यावर साधकबाधक चर्चा ना करता आक्रस्ताळी भूमिका घेण्याची सवयच आपल्या देशातील राजकीय मंडळींना गत काही काळापासून जडली आहे. राष्ट्रीय चलनीकरण रूपरेषेच्या निमित्ताने नुकताच पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच ही रूपरेषा जाहीर केली. केंद्र सरकारच्या मालकीची जी संसाधने अनुत्पादक बनली आहेत, त्यांना ठरावीक काळासाठी खासगी क्षेत्राच्या हाती देऊन उत्पादनक्षम बनविणे आणि त्यातून होणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग सरकारी तिजोरीत आणणे, हा त्यामागचा सरकारचा हेतू आहे. येत्या चार वर्षांत या माध्यमातून सरकारी तिजोरीत सहा लाख कोटी रुपयांची भर पडण्याची अपेक्षा सीतारामन यांनी बोलून दाखवली आहे.

अपेक्षेप्रमाणे लगेच मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, अशी भूमिका घेत विरोधक सरकारवर तुटून पडले. आपल्या देशाने १९९१ मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला. त्याच मार्गावरील हे आणखी एक पाऊल आहे. दरम्यानच्या काळात देशात उजवे, डावे आणि मध्यममार्गी अशा तिन्ही विचारधारांच्या राजकीय पक्षांचा सहभाग असलेली सरकारे केंद्रात सत्तेत होती. त्या प्रत्येक सरकारने आपापल्या परीने खुल्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेल्या खासगीकरणास चालना दिली. मात्र, सर्वच राजकीय पक्षांना ते सत्तेतून पायउतार झाल्यावर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खासगीकरणाची भाषा केली, की देश विकायला निघाल्याचा साक्षात्कार होतो. तसा तो आता पुन्हा एकदा झाला आहे. दुर्दैवाने खासगीकरणाच्या वाटेतील खरे खाचखळगे आणि धोके दाखवून देण्याची भूमिका मात्र कुणीही घेत नाही. लोकशाहीचा खरा आधारस्तंभ असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितांचे सरकारने सर्वार्थाने रक्षण करणे लोकशाही प्रणालीमध्ये अभिप्रेत असते. खासगीकरणाचे निर्णय घेताना आव जरी सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचा आणला जात असला, तरी प्रत्यक्षात तसे होते का, हा खरा कळीचा  मुद्दा आहे. दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलताना दिसत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील संसाधने देशाच्या म्हणजेच जनतेच्या मालकीची आहेत. ती खासगी क्षेत्राच्या हाती देताना, त्या संसाधनांपासून सर्वसामान्य जनता वंचित राहू नये, हे बघण्याची जबाबदारी सरकारची आहे.

खासगीकरणाच्या माध्यमातून उभा राहणारा पैसा नव्या संसाधनांच्या निर्मितीसाठी खर्ची पडेल आणि त्यातून सर्वसामान्य जनतेचे जिणे सुखकारक होईल, अशी स्वप्ने सरकार दाखवते; पण प्रत्यक्षात तसे होते का, हे तपासणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यापासून सरकारी मालकीच्या असलेल्या रेल्वेच्याही खासगीकरणास प्रारंभ झाला आहे. अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्या हे त्याचे फलित! खासगी मालकीच्या या चकाचक व आलिशान गाड्या धावतात मात्र सरकारी मालकीच्या रुळांवरूनच! या गाड्या विलंबाने धावल्यास प्रवाशांना तिकिटाची ठरावीक रक्कम परत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या मालकीच्या इतर गाड्यांमुळे किंवा इतर तांत्रिक कारणामुळे या खासगी गाड्यांना विलंब झाल्यास दंडाची जबाबदारी तर खासगी कंपनी स्वीकारणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्यामुळे खासगी गाड्यांना विलंब होऊ नये, असाच रेल्वेचा प्रयत्न असेल. त्यासाठी रेल्वेच्या स्वतःच्या प्रवासी व मालगाड्या रोखल्या जातील आणि खासगी गाड्यांना वाट दिली जाईल. यामध्ये नुकसान होईल ते रेल्वेचे आणि सरकारी मालकीच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य  नागरिकांचे! खासगी गाड्यांचे तिकीट घेण्याची ऐपत असलेली मूठभर मंडळी आणि त्या गाड्या चालविणारे उद्योगपती तेवढे खूश असतील. खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना कसा फटका बसू शकतो, याचे हे छोटेसे प्रातिनिधिक उदाहरण आहे. खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर आपल्या देशात एका वर्गाची झपाट्याने प्रगती झाली आणि इतरांना मात्र अजूनही दोन वेळच्या भाकरीची भ्रांत पडली आहे.

खुल्या अर्थव्यवस्थेत `आहे रे’ आणि `नाही रे’ या दोन वर्गांमधील दरी अरुंद होणे अभिप्रेत होते. दुर्दैवाने ती अधिकाधिक रुंदावताना दिसत आहे. पायाभूत सुविधा बळकट झाल्याशिवाय जनतेला गरिबीतून वर काढणे शक्य नाही, त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी खासगीकरणाशिवाय पर्याय नाही आणि खासगीकरण तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत व गरिबांना अधिक गरीब बनवीत आहे! हे दुष्टचक्र कुठे तरी भेदण्याची गरज आहे. ते कसे साध्य करता येईल यावर सखोल चर्चाविनिमय सुरू होण्याची देश प्रतीक्षा करीत आहे. तो सुदिन कधी तरी उगवेल का?

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी