शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 07:12 IST

बोइंग ड्रीमलायनरसारख्या अद्ययावत, आधुनिक विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदांच्या अंतराने बंद होणे अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट म्हणावी लागेल.

सारे काही व्यवस्थित असताना सव्वादोनशे प्रवासी व दोन्ही पायलटसह एअर इंडियाच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन अहमदाबादवरून लंडनकडे झेपावलेल्या विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा अवघ्या सेकंदाच्या अंतराने बंद होतो. साहजिकच इंजिने बंद पडतात. विमानाला पुरेशी उंची गाठता येत नाही. ते कोसळते आणि अतिभीषण विमान अपघाताची नोंद इतिहासात होते. थोडक्यात, प्रतिकूल हवामान, पक्ष्याची धडक किंवा इंजिनासह विमानातील कोणत्याही भागात तांत्रिक बिघाड ही कारणे गेल्या १२ जूनच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील या भीषण अपघाताला कारणीभूत नाहीत, तर इंधनपुरवठा थांबल्याने दोन्ही इंजिने बंद पडली, असा निष्कर्ष एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो अर्थात एएआयबीने प्राथमिक अहवालात काढला आहे. हा निष्कर्ष अजिबात पचनी पडणारा नाही, हे स्पष्ट आहे.

कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्यातील संवादाचा हवाला या निष्कर्षासाठी एएआयबीने दिला असला तरी खुद्द सरकारचा त्यावर विश्वास दिसत नाही. हवाई वाहतूक मंत्री व राज्यमंत्र्यांनी हा अहवाल प्राथमिक असल्याचे सांगून सारवासारव केली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे या अपघाताबद्दलची सुरुवातीपासूनची उदासीनताच ठळक बनली आहे. हे सारे संतापजनक आहे. एक तर प्राथमिक अहवाल बाहेर यायलाच एक महिना लागला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, काही छोटे-मोठे उद्योजक, व्यावसायिक, इंग्लंडमधील नातेवाइकांकडे जाणारे भारतीय किंवा कोणत्या तरी निमित्ताने भारतात आलेले इंग्लंडवासी अशा अनेकांचा जीव या अपघातात गेला. अपघातावेळी विमानात असलेल्या २४२ जणांपैकी केवळ एक जण चमत्कारिक पद्धतीने वाचला.

हे विमान लगतच्या वैद्यक महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले. तेव्हा दुपारचे जेवण घेत असलेले विद्यार्थी व कर्मचारी मिळून २९ जणदेखील मरण पावले. विमानाने पेट घेतल्यामुळे मृतदेह जळून कोळसा झाले होते. इतके की डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटविण्यासाठी खूप दिवस लागले. तरीही २६० जणांचीच ओळख पटली. हे सारे काळीज पिळवटून टाकणारे असूनही सरकार किंवा विमान वाहतुकीशी संबंधित यंत्रणांची कातडी थरथरली नाही. आधी ब्लॅक बाॅक्स अमेरिकेला पाठवला जाणार असल्याचे सांगितले गेले. नंतर त्याचा इन्कार करण्यात आला. इतक्या गंभीर विषयावर टोलवाटोलवी झाली. आताही एएआयबीचा अहवाल प्राथमिकच आहे आणि त्यात केलेेला दावा कोणालाही फारसा पटणारा नाही.

बोइंग ड्रीमलायनरसारख्या अद्ययावत, आधुनिक विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदांच्या अंतराने बंद होणे अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट म्हणावी लागेल. त्याबाबत एक पायलट दुसऱ्याला विचारतो आणि दुसरा पायलट आपण तसे काहीही केलेले नाही, असे सांगतो. दोघांचे संभाषण काॅकपिट रेकाॅर्डरवर रेकाॅर्ड होते. हे सारे अकल्पित व धक्कादायक आहे. कारण, हजारो तासांच्या उड्डाणाचा अनुभव गाठीशी असलेल्या वैमानिकांच्या हातून अशी घोडचूक होणे शक्य नाही. त्यांनी ते अजाणतेपणी किंवा जाणीवपूर्वक करणेही शक्य नाही. म्हणूनच वैमानिकांच्या संघटनेने हा अहवाल पूर्णपणे फेटाळून लावला आहे. अपघातात मरण पावलेल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनीही ही शक्यता फेटाळून लावली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी अशा धक्कादायक अहवालामागे काहीतरी काळेबेरे असावे, असा संशय व्यक्त केला आहे. त्यापैकी बहुतेकांच्या आक्षेपाचा रोख आहे की, हा सारा खटाटोप बोइंग कंपनीला वाचविण्यासाठी आहे.

बोइंग ७८७ ड्रीमलायनर हे दूर अंतरावरील प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित विमान आहे, असा दावा आणि मोठा प्रचार केला जात असला तरी त्याच्या बांधणीत काही दोष आहेत, असा गाैप्यस्फोट काही व्हिसलब्लोअरनी केला होता. त्याशिवाय बोइंग ७३७ विमानातील असेच दोष उघडकीस आणणाऱ्या व्हिसलब्लोअरचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हेदेखील महत्त्वाचे की, बोइंग ही शंभर वर्षांपेक्षा जुनी अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अशा मोठ्या कंपनीचे व्यवहार, आरोप व आक्षेपांना राजकीय कंगोरे असतातच. बोइंग कंपनी तर राजकीय पक्ष, नेत्यांना निवडणुकीसाठी पैसा देते आणि त्याबदल्यात कर चुकविते, असा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी या मुद्द्यावर अमेरिकेन नागरिकांनी एक मोहीमदेखील उघडली होती. एकंदरीत एएआयबीचा हा अहवाल संशयास्पद ठरतो आणि त्यामुळे अपघाताचे गूढ उकलण्याऐवजी वाढले आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद