शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

...हे हृदय कसे आईचे?

By किरण अग्रवाल | Updated: June 6, 2019 04:39 IST

वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा या खुळचट कल्पनेत वावरणा-या एका मातेने तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांच्या आपल्याच बाळाचे जगणे गळा आवळून संपविल्याची घटना नाशकात घडली आहे.

किरण अग्रवालकाळाच्या बदलाचा वेग कितीतरी पटीने वाढला आहे, असे आपण म्हणतो व ते खरेही आहे. परंतु या बदलात पारंपरिक किंवा बुरसटलेल्या संज्ञेत मोडणाऱ्या विचारांचा बदल कितपत होताना दिसतोय असा प्रश्न केला तर त्याचे मात्र समाधानकारक उत्तर देता येऊ नये. कारण, बदलाच्या ओघात भौतिक गरजांच्या अनुषंगाने साधन-सुविधा स्वीकारल्या गेल्या; परंतु वैचारिक उन्नयन तितकेसे घडवता आले नसावे म्हणूनच की काय, तिसरेही अपत्य स्री जातीचे जन्मास आल्याने मातेनेच पोटच्या गोळ्याचे जगणे हिरावून घेण्यासारखे प्रकार समाजात घडताना दिसत आहेत. अशा घटनांमधून माणुसकीच्या भावनेला तर नख लागतेच; पण माया-ममतेच्या दृष्टीने सर्वोच्च कोटीच्या ठरणाºया मातृत्वाच्या भूमिकेलाही आच बसून गेल्याखेरीज राहात नाही.वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा या खुळचट कल्पनेत वावरणा-या एका मातेने तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांच्या आपल्याच बाळाचे जगणे गळा आवळून संपविल्याची घटना नाशकात घडली आहे. या घटनेकडे प्रातिनिधिक म्हणून बघता यावे, कारण अपवादात्मक असल्या तरी मातृत्वाच्या नात्याला कलंक ठरणा-या अशा मातांची प्रकरणे इतरत्रही अधून मधून समोर येतच असतात. अनिच्छेने जन्मास येणा-या ‘नकोशीं’चा प्रश्न व त्यासंदर्भातील बुरसटलेली विचारधारा किती गंभीर आहे, हेच यावरून लक्षात यावे. बरे, हे काही कुठे आदिवासी वाड्या-पाड्यावर, खेड्यात घडले आहे असे नाही, तर नाशिकसारख्या शहरात व शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीच्या घरात घडलेला प्रकार आहे हा; त्यामुळे काळाच्या किंवा बदलाच्या चक्रापासून अनभिज्ञ असलेल्यांकडून असे घडल्याचे म्हणण्याची सोय नाही. ‘नकोशी’ ठरलेल्या मुलींबाबत दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१७-१८ मधील आर्थिक सर्वेक्षणात प्रथमच लक्ष वेधण्यात आले होते व देशात अशा नकोशा मुलींची संख्या तब्बल दोन कोटींवर असल्याचे त्यात नोंदविण्यात आले होते. तेव्हा, जन्मत:च नकोशीला यमसदनी धाडण्याचा प्रकार तर गंभीर ठरावाच; परंतु अनिच्छेने स्वीकारलेल्या मुलींच्या वाट्याला कसले जीणे आले असावे, यासंबंधीच्या चिंतेनेच संवेदनशील मन गहीवरून यावे.महत्त्वाचे म्हणजे, समाजात स्री-पुरुष समानतेची चर्चा नेहमी झडत असते, महिला वा मातृदिनानिमित्त नारीशक्तीच्या गौरवाचे पाट वाहताना दिसतात; त्याचा परिणामही होतो खरे; पण काही घटना अशा घडून जातात की त्या एकूणच समाजमनावर गहिरा परिणाम करून जाणा-या ठरतात. मागे एका प्रियकराच्या नादात लागलेल्या मातेने आपल्या लहानग्याला कपडे धुण्याच्या धुपाटण्याने इतके बदडले होते की त्याला जिवास मुकावे लागले होते. चालू वर्षात, म्हणजे जानेवारी ते आतापर्यंतच्या पाच महिन्यात नाशकातील कचराकुंडीवर अथवा अन्यत्र बेवारसपणे टाकून दिलेली तीन अर्भके आढळून आली आहेत. भलेही अनैतिक संबंधातून ती जन्मास आलेली असावीत, परंतु पोटच्या गोळ्याला असे कचराकुंडीत टाकून देणा-या किंवा अलीकडील घटनेनुसार त्याचा थेट जीवच घेणा-या मातेच्या निर्दयतेला काय म्हणावे? ‘स्वामी तिन्ही जागाचा, आईविना भिकारी’ असे एकीकडे म्हणतानाच ‘माता न तु वैरिणी’ असे म्हणण्याचीही वेळ जेव्हा ओढवते, तेव्हा हे हृदय कसे आईचे, असा प्रश्नही उपस्थित होऊन गेल्याशिवाय राहात नाही.अर्थात, विचारांच्या मागासलेपणातूनच असे घडून येत असल्याने विवेकाचा जागर हाच त्यावरील प्रभावी उपाय ठरावा. शिवाय, कायद्याची बेडी अधिक कडक केली जाणे गरजेचे आहे. आपल्याकडे गर्भलिंग निदान कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करण्याचे प्रकार वेळोवेळी उघडकीस येतात, यातील दोषींना जरब बसेल अशी शिक्षा झाल्यास गर्भातच कळ्यांना खुडण्याच्या प्रकारास चाप बसेल. तिस-या मुलीचा गळा घोटण्याचा प्रकार उघडकीस येत असताना नाशकातच एका डॉक्टरला गर्भलिंग निदान कायदा उल्लंघनाबाबत दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जरब बसावयास मदत होईल. मुलगा व मुलगी यातील भेदाचे जळमट दूर करतानाच नकोशींबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी कन्या जन्माचे स्वागत करण्याची धारणा रुजवावी लागेल. ते केवळ शासनाच्या प्रयत्नांनी होणार नाही तर समाजातील विचारीवर्गाने त्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Nashikनाशिक