शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - माध्यमांचा करंटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 07:23 IST

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले आणि त्यानंतरचे, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनापर्यंतचे सगळे महत्त्वाचे निर्णय तेथे घेतले गेले. परवा २ आॅक्टोबरला झालेल्या बापूंच्या १५० व्या जयंतीचे व कस्तुरबांच्या ७५ व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून काँग्रेस पक्षाने आपला राष्ट्रीय मेळावा तेथे भरविला. राहुल गांधी, सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह त्या पक्षाचे देशभरातील सर्व नेते व कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित होते. पदयात्रा व जाहीर सभा असे सारे होऊन सुमारे पाऊण लाखांचा तो प्रचंड जनमेळावा गांधीजींना अभिवादन करून व २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकून अत्यंत उत्साही वातावरणात समाप्त झाला. आश्रमाच्या नियमाप्रमाणे सारे नेते जमिनीवर बसून जेवले व देशाच्या या नेत्यांनी नंतर त्यात स्वत:ची ताटेही धुतली! प्रार्थनेत सहभाग घेतला.

गांधीजींचे सारे यमनियम पाळून या मेळाव्याचा शेवट जाहीर सभेत झाला. तेव्हा तीत यापुढची निवडणूक गांधी वि. गोडसे या सूत्रावरच लढविण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून, भागीदार आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी या वेळी केली. त्यातील प्रचाराचा भाग वगळला तरी गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीला देशातून एवढ्या साऱ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करणे हीच मुळात एक विलक्षण व देशाच्या एकात्मतेएवढेच गांधीजींवरील त्यांच्या निष्ठेचे दर्शन घडविणारी बाब होती. एवढी मोठी घटना देशाच्या हृदयस्थानी घडत असताना व तिने देशात एक शांती व अहिंसेचा संदेश महात्म्याच्या नावासोबत पोहचविला असता त्या महाघटनेची घ्यावी तशी दखल देशातील प्रकाश व मुद्रित अशा दोन्ही माध्यमांनी फारशी घेऊ नये या करंटेपणाला काय म्हणायचे असते? देशभक्तीहून पक्षभक्ती आणि पक्षभक्तीहून पदभक्ती येथे मोठी झाली आहे काय? देशाच्या मध्यवर्ती स्थानी एवढे महाभारत घडत असताना या माध्यमांची तोंडे कुठे दिल्लीत, कुठे औरंगाबादेत तर कुठे शेजारच्या नागपुरात घडणाºया बारीकसारीक घटनांकडे व तेथील मध्यम वजनांच्या पुढाºयांकडे असावी हा काळाचा महिमा नसून सरकारने चालविलेल्या माध्यमांच्या गळचेपीचा व विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांना दिलेल्या निर्देशाचा परिणाम आहे. क्वचित एखाद दुसरे मराठी वृत्तपत्र सोडले तर या महान घटनेला कोणत्याही वृत्तसंस्थेने व पत्राने न्याय दिला नाही. देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या अवतीभवतीच घडत असतात. सामान्य माणूस सरकारचे हे अपयश त्याला दाखविले नाही तरी प्रत्यक्ष अनुभवत असतो. नेमक्या अशावेळी गांधीजी व कस्तुरबांसारख्या राष्टÑनिर्मात्यांच्या पुण्यस्मरणाकडे जनतेची म्हणविणारी माध्यमे दुर्लक्ष करतात आणि मोदीराजच्या कथा गाथेसारख्या आळवताना दिसतात तेव्हा त्यांचेही ढोंग जनतेच्या लक्षात येतच असते. त्यामुळे गांधी व कस्तुरबांसाठी नाही आणि काँग्रेस वा अन्य कुणासाठी नाही, तर केवळ स्वत:ची विश्वसनीयता टिकवायला तरी या माध्यमांनी जनतेच्या जवळ व तिच्या भावनांच्या आसपास राहिले पाहिजे. फार पूर्वी ‘विदर्भातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना तुमची पत्रे त्यांच्या बातम्याही देत नाहीत असे का’ असा प्रश्न एका बड्या इंग्रजी दैनिकाच्या महाव्यवस्थापकाला पत्रकारांनी विचारला तेव्हा तो निगरपट्टपणे म्हणाला, ‘ते मरणारे शेतकरी आमचे वर्तमानपत्र वाचत नाहीत?’ वृत्तपत्रांना जनतेशी संबंध राखायचे नसतील आणि केवळ सरकारचे गुणगान गाऊन त्याच्या जाहिरातीच तेवढ्या मिळवायच्या असतील तर त्या वृत्तपत्रांचा आधार न घेताही त्यांना जगता येईल. मात्र, त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नुसता पोखरलाच जाणार नाही तर एक दिवस तो उन्मळून जमिनीवर पडलेलाही जनतेला दिसेल.देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या भोवतीच घडत असतात. सामान्य माणूस ते अनुभवत असतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी