शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - माध्यमांचा करंटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 07:23 IST

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले आणि त्यानंतरचे, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनापर्यंतचे सगळे महत्त्वाचे निर्णय तेथे घेतले गेले. परवा २ आॅक्टोबरला झालेल्या बापूंच्या १५० व्या जयंतीचे व कस्तुरबांच्या ७५ व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून काँग्रेस पक्षाने आपला राष्ट्रीय मेळावा तेथे भरविला. राहुल गांधी, सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह त्या पक्षाचे देशभरातील सर्व नेते व कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित होते. पदयात्रा व जाहीर सभा असे सारे होऊन सुमारे पाऊण लाखांचा तो प्रचंड जनमेळावा गांधीजींना अभिवादन करून व २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकून अत्यंत उत्साही वातावरणात समाप्त झाला. आश्रमाच्या नियमाप्रमाणे सारे नेते जमिनीवर बसून जेवले व देशाच्या या नेत्यांनी नंतर त्यात स्वत:ची ताटेही धुतली! प्रार्थनेत सहभाग घेतला.

गांधीजींचे सारे यमनियम पाळून या मेळाव्याचा शेवट जाहीर सभेत झाला. तेव्हा तीत यापुढची निवडणूक गांधी वि. गोडसे या सूत्रावरच लढविण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून, भागीदार आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी या वेळी केली. त्यातील प्रचाराचा भाग वगळला तरी गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीला देशातून एवढ्या साऱ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करणे हीच मुळात एक विलक्षण व देशाच्या एकात्मतेएवढेच गांधीजींवरील त्यांच्या निष्ठेचे दर्शन घडविणारी बाब होती. एवढी मोठी घटना देशाच्या हृदयस्थानी घडत असताना व तिने देशात एक शांती व अहिंसेचा संदेश महात्म्याच्या नावासोबत पोहचविला असता त्या महाघटनेची घ्यावी तशी दखल देशातील प्रकाश व मुद्रित अशा दोन्ही माध्यमांनी फारशी घेऊ नये या करंटेपणाला काय म्हणायचे असते? देशभक्तीहून पक्षभक्ती आणि पक्षभक्तीहून पदभक्ती येथे मोठी झाली आहे काय? देशाच्या मध्यवर्ती स्थानी एवढे महाभारत घडत असताना या माध्यमांची तोंडे कुठे दिल्लीत, कुठे औरंगाबादेत तर कुठे शेजारच्या नागपुरात घडणाºया बारीकसारीक घटनांकडे व तेथील मध्यम वजनांच्या पुढाºयांकडे असावी हा काळाचा महिमा नसून सरकारने चालविलेल्या माध्यमांच्या गळचेपीचा व विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांना दिलेल्या निर्देशाचा परिणाम आहे. क्वचित एखाद दुसरे मराठी वृत्तपत्र सोडले तर या महान घटनेला कोणत्याही वृत्तसंस्थेने व पत्राने न्याय दिला नाही. देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या अवतीभवतीच घडत असतात. सामान्य माणूस सरकारचे हे अपयश त्याला दाखविले नाही तरी प्रत्यक्ष अनुभवत असतो. नेमक्या अशावेळी गांधीजी व कस्तुरबांसारख्या राष्टÑनिर्मात्यांच्या पुण्यस्मरणाकडे जनतेची म्हणविणारी माध्यमे दुर्लक्ष करतात आणि मोदीराजच्या कथा गाथेसारख्या आळवताना दिसतात तेव्हा त्यांचेही ढोंग जनतेच्या लक्षात येतच असते. त्यामुळे गांधी व कस्तुरबांसाठी नाही आणि काँग्रेस वा अन्य कुणासाठी नाही, तर केवळ स्वत:ची विश्वसनीयता टिकवायला तरी या माध्यमांनी जनतेच्या जवळ व तिच्या भावनांच्या आसपास राहिले पाहिजे. फार पूर्वी ‘विदर्भातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना तुमची पत्रे त्यांच्या बातम्याही देत नाहीत असे का’ असा प्रश्न एका बड्या इंग्रजी दैनिकाच्या महाव्यवस्थापकाला पत्रकारांनी विचारला तेव्हा तो निगरपट्टपणे म्हणाला, ‘ते मरणारे शेतकरी आमचे वर्तमानपत्र वाचत नाहीत?’ वृत्तपत्रांना जनतेशी संबंध राखायचे नसतील आणि केवळ सरकारचे गुणगान गाऊन त्याच्या जाहिरातीच तेवढ्या मिळवायच्या असतील तर त्या वृत्तपत्रांचा आधार न घेताही त्यांना जगता येईल. मात्र, त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नुसता पोखरलाच जाणार नाही तर एक दिवस तो उन्मळून जमिनीवर पडलेलाही जनतेला दिसेल.देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या भोवतीच घडत असतात. सामान्य माणूस ते अनुभवत असतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी