शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

संपादकीय - माध्यमांचा करंटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 07:23 IST

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले आणि त्यानंतरचे, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनापर्यंतचे सगळे महत्त्वाचे निर्णय तेथे घेतले गेले. परवा २ आॅक्टोबरला झालेल्या बापूंच्या १५० व्या जयंतीचे व कस्तुरबांच्या ७५ व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून काँग्रेस पक्षाने आपला राष्ट्रीय मेळावा तेथे भरविला. राहुल गांधी, सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह त्या पक्षाचे देशभरातील सर्व नेते व कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित होते. पदयात्रा व जाहीर सभा असे सारे होऊन सुमारे पाऊण लाखांचा तो प्रचंड जनमेळावा गांधीजींना अभिवादन करून व २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकून अत्यंत उत्साही वातावरणात समाप्त झाला. आश्रमाच्या नियमाप्रमाणे सारे नेते जमिनीवर बसून जेवले व देशाच्या या नेत्यांनी नंतर त्यात स्वत:ची ताटेही धुतली! प्रार्थनेत सहभाग घेतला.

गांधीजींचे सारे यमनियम पाळून या मेळाव्याचा शेवट जाहीर सभेत झाला. तेव्हा तीत यापुढची निवडणूक गांधी वि. गोडसे या सूत्रावरच लढविण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून, भागीदार आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी या वेळी केली. त्यातील प्रचाराचा भाग वगळला तरी गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीला देशातून एवढ्या साऱ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करणे हीच मुळात एक विलक्षण व देशाच्या एकात्मतेएवढेच गांधीजींवरील त्यांच्या निष्ठेचे दर्शन घडविणारी बाब होती. एवढी मोठी घटना देशाच्या हृदयस्थानी घडत असताना व तिने देशात एक शांती व अहिंसेचा संदेश महात्म्याच्या नावासोबत पोहचविला असता त्या महाघटनेची घ्यावी तशी दखल देशातील प्रकाश व मुद्रित अशा दोन्ही माध्यमांनी फारशी घेऊ नये या करंटेपणाला काय म्हणायचे असते? देशभक्तीहून पक्षभक्ती आणि पक्षभक्तीहून पदभक्ती येथे मोठी झाली आहे काय? देशाच्या मध्यवर्ती स्थानी एवढे महाभारत घडत असताना या माध्यमांची तोंडे कुठे दिल्लीत, कुठे औरंगाबादेत तर कुठे शेजारच्या नागपुरात घडणाºया बारीकसारीक घटनांकडे व तेथील मध्यम वजनांच्या पुढाºयांकडे असावी हा काळाचा महिमा नसून सरकारने चालविलेल्या माध्यमांच्या गळचेपीचा व विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांना दिलेल्या निर्देशाचा परिणाम आहे. क्वचित एखाद दुसरे मराठी वृत्तपत्र सोडले तर या महान घटनेला कोणत्याही वृत्तसंस्थेने व पत्राने न्याय दिला नाही. देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या अवतीभवतीच घडत असतात. सामान्य माणूस सरकारचे हे अपयश त्याला दाखविले नाही तरी प्रत्यक्ष अनुभवत असतो. नेमक्या अशावेळी गांधीजी व कस्तुरबांसारख्या राष्टÑनिर्मात्यांच्या पुण्यस्मरणाकडे जनतेची म्हणविणारी माध्यमे दुर्लक्ष करतात आणि मोदीराजच्या कथा गाथेसारख्या आळवताना दिसतात तेव्हा त्यांचेही ढोंग जनतेच्या लक्षात येतच असते. त्यामुळे गांधी व कस्तुरबांसाठी नाही आणि काँग्रेस वा अन्य कुणासाठी नाही, तर केवळ स्वत:ची विश्वसनीयता टिकवायला तरी या माध्यमांनी जनतेच्या जवळ व तिच्या भावनांच्या आसपास राहिले पाहिजे. फार पूर्वी ‘विदर्भातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना तुमची पत्रे त्यांच्या बातम्याही देत नाहीत असे का’ असा प्रश्न एका बड्या इंग्रजी दैनिकाच्या महाव्यवस्थापकाला पत्रकारांनी विचारला तेव्हा तो निगरपट्टपणे म्हणाला, ‘ते मरणारे शेतकरी आमचे वर्तमानपत्र वाचत नाहीत?’ वृत्तपत्रांना जनतेशी संबंध राखायचे नसतील आणि केवळ सरकारचे गुणगान गाऊन त्याच्या जाहिरातीच तेवढ्या मिळवायच्या असतील तर त्या वृत्तपत्रांचा आधार न घेताही त्यांना जगता येईल. मात्र, त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नुसता पोखरलाच जाणार नाही तर एक दिवस तो उन्मळून जमिनीवर पडलेलाही जनतेला दिसेल.देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या भोवतीच घडत असतात. सामान्य माणूस ते अनुभवत असतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी