शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

'तशी' ताकद काँग्रेस का लावत नाही, हा कळीचा मुद्दा आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:41 IST

मध्य प्रदेशात १५ वर्षांनंतर काँग्रेसने सत्ता मिळविली होती. देशभर मोदी-शहांचा अंमल असताना, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही फारसे प्रभावी नसताना मिळालेली ही सत्ता पक्षांतर्गत रोष आणि कुरघोडीमुळे गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली. अन्य राज्यांत आता काँग्रेसला सावध राहावे लागेल.

मध्य प्रदेशातील राजकीय धुळवडीने काँग्रेसच्या रंगाचा बेरंग झाला. गेले जवळपास तीन महिने भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची कुजबुज सुरू होती, तरीही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मध्य प्रदेशमधील सत्ता गमवावी लागणार आहे. खरे तर केंद्रातील भाजप सरकारच्या कारभाराविरोधात आक्रमक प्रचार करून मध्य प्रदेशात तब्बल १५ वर्षांनंतर काँग्रेसने सत्ता मिळविली होती. देशभर मोदी-शहांचा अंमल असताना, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही फारसे प्रभावी नसताना, तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनतीने सत्ता मिळविली होती. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठांबरोबरच ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे या विजयामध्ये मोठे कर्तृत्व होते. मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची वर्णी लागल्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या गटाला पुरेसे स्थान सत्तेत मिळेल, अशी आशा होती, परंतु कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली या गटाची कुचंबणा झाली.

राहुल गांधी यांच्या पाठिशी सातत्याने उभ्या राहणाऱ्या ज्योतिरादित्य यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा गट मध्य प्रदेशात आहे, याची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला होती, तरीही त्यांच्या अस्वस्थतेकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम अखेर ज्योतिरादित्य भाजपकडे जाण्यात झाला. मुळात सलग १५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पूर्व मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भाजपची पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. त्यामुळे गेल्या निकालावेळी ‘अ‍ॅन्टी इन्कंबसी’ असतानाही १0७ आमदार निवडून आले. काँग्रेसने १२१ आमदारांच्या जोरावर सत्ता आणली, परंतु कमलनाथ यांना पक्षांतर्गत रोष मात्र रोखता आला नाही. तरुण रक्ताला वाव द्यावा, अशी चर्चा काँग्रेस समितीत झाली, तरी राज्याची धुरा पुन्हा कमलनाथ यांच्याकडे देण्यात आल्याने पक्षात नाराजी होतीच. त्यातच कमलनाथ यांनी भाजपबरोबर काँग्रेसमधील अंतर्गत विरोधकांनाही संपविण्याचा घाट घातला; त्याचीही मोठी नाराजी होती. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तासभर चर्चा केल्यानंतर, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्यानंतर, जागे झालेल्या काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे निवेदन काढले, परंतु त्याला उशीर झाला होता. ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर जवळपास २२ आमदारांनी राजीनामे दिले. त्यात सहा मंत्र्यांचा समावेश आहे. यावरूनच कमलनाथ यांच्या कारभाराविषयी पक्षातच किती प्रचंड नाराजी होती, हे सिद्ध होते. आधीच वाताहत झालेल्या काँग्रेसला हा आणखी एक धक्का म्हणावा लागेल. सत्तेसाठी टपून बसलेल्या भाजपच्या गोटात या घडामोडीमुळे होळीचा आनंद द्विगुणित होणे स्वाभाविक आहे. ज्योतिरादित्य शिंदेंसारखा मोहरा भाजपच्या हाती लागणे हे काँग्रेसला नक्कीच परवडणारे नाही. काँग्रेसचे नेतृत्व यातून सावरण्याचा प्रयत्न करेल किंवा सत्ता टिकवून ठेवण्याची धडपड करेल. मात्र, संख्याबळ पुन्हा कसे मिळविणार, याचे उत्तर येत्या दोन-चार दिवसांत मिळेल. मध्य प्रदेशातील सत्ता टांगणीवर लागल्याने काँग्रेस सरकारने राजस्थानातील सरकार टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात जाहीर मतभेद आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीवरून सचिन पायलटांनी नाराजी व्यक्त केली होती. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानातील सत्ताही २०-२५ आमदारांच्या फरकाने जिंकली आहे. त्यामुळे सचिन पायलट यांच्या निष्ठावंत आमदारांची नाराजी मिटविण्याचे काम काँग्रेस नेतृत्वाला करावे लागणार आहे. अन्यथा तिथेही मध्य प्रदेशाची ‘रिप्लिका’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य प्रदेशात सत्ता परत मिळविण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शक्ती पणाला लावली होती. तशी ताकद काँग्रेस का लावत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसला आता हतबलता घालवून पुन्हा कसोशीने प्रयत्न करावे लागणार यात शंका नाही.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश