शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: महाराष्ट्रात उद्योगांची भरारी, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अन् दुसरीकडे बकाल MIDC

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 07:31 IST

राज्यात काही ठिकाणी खूपच विरोधाभासी चित्र आहे.

कबर, कामराशिवाय महाराष्ट्राचा प्राधान्यक्रम वेगळा आहे याचे भान राज्यकर्त्यांना आणि विरोधकांनाही आहे की नाही, असा प्रश्न पडला असताना विदर्भ, मराठवाड्यातील औद्योगिक गुंतवणुकीला मेगा बूस्टर मिळणे हे राज्यात काही चांगलेदेखील घडत आहे याचे शुभवर्तमान मानले पाहिजे. दावोसमधील जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली. त्यातून १७ लाख रोजगारही निर्माण होणार आहेत. हे केवळ दाव्यापुरते आणि कागदावर राहणार नाही याची खात्री देणारा घटनाक्रम म्हणजे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ३ लाख ९२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या आणि १ लाख ११ हजार रोजगार निर्माण होणार असलेल्या उद्योगांना मिळालेली मान्यता. त्यातील बहुतेक उद्योग हे विदर्भ, मराठवाड्यात येत आहेत. गडचिरोली या दुर्गम आदिवासी जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट फडणवीस यांनी ठेवले आहे.

उद्योगांना लागणाऱ्या अनेक लहान-मोठ्या परवानग्या या तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने कशा देता येतील यासाठीची परिणामकारक प्रणालीदेखील येऊ घातली आहे. विदर्भ, मराठवाडा या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागांमध्ये उद्योग आले पाहिजेत हे तर अपेक्षितच आहे, पण त्याचवेळी पुढारलेपणाचा शिक्का बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकास हा पुणे आणि परिसरात केंद्रित झाला आहे. त्याचे विकेंद्रीकरण करून सांगली, सातारा, सोलापुरातही उद्योगगंगा पोहोचावी अशी या भागातील भावना आहे. तशीच भावना औद्योगिक आणि एकूणच विकास हा नागपूरकेंद्रित झाला असल्याची जी भावना बळावत चालली आहे, ती अधिक तीव्र होत जाऊ नये यासाठी अमरावती विभागात आसलगावपासून वलगावपर्यंत उद्योगांची उभारणी होण्याची गरज आहे. हे दुखणे नेमके हेरून फडणवीस यांनी राज्याच्या औद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरण हा मुद्दा समोर ठेवूनच दावोसमध्ये गुंतवणूक करार केले, त्याचे फलित लवकरच दिसेल. राज्यभरात मोठ्या प्रमाणात येऊ घातलेली गुंतवणूक आणि दुसरीकडे बकाल झालेल्या अनेक ठिकाणच्या एमआयडीसी असे विरोधाभासी चित्र आहे.

आपल्याकडील उद्योगांची अनेक दुखणी आहेत, त्यावर अक्सीर इलाज केला पाहिजे. एक बडा उद्योग आला की त्याला लागणाऱ्या सामग्रीसाठी लहान लहान उद्योग उभे राहतात. रिकाम्या पडलेल्या जवळच्या एमआयडीसींमध्ये असे लहान उद्योग उभारले गेले तर सरकार आणत असलेल्या गुंतवणुकीचा फायदा लहान उद्योगांनादेखील होईल. त्या दृष्टीने एकात्मिक औद्योगिक विकास करण्यासाठी एक धोरण अमलात आणणे आवश्यक आहे. राज्यातील उद्योगांमध्ये आता मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असताना परप्रांतांमधून आलेल्या तरुणांऐवजी स्थानिकांना रोजगार कसा मिळेल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. आपल्याकडे भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही, परप्रांतीयांना प्राधान्य दिले जाते ही नाराजी पूर्वापार आहे. रोजगारासाठीचे आवश्यक कुशल मनुष्यबळ आपण हव्या त्या प्रमाणात तयार करू शकलो नाही हे एक आणि पडेल ते काम करण्याची तयारी असलेल्या अकुशल हातांची कमतरता अशी दोन प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळू शकत नाही.

चीनमधून अनेक नामवंत कंपन्या बाहेर पडत आहेत, चायना प्लस वन स्ट्रॅटेजी अंतर्गत हे उद्योग अन्य देशांचा पर्याय शोधत आहेत आणि त्यासाठी उत्तम पर्याय म्हणून ते भारताला पसंती देत आहेत, त्यातही भारतातील ज्या तीन-चार राज्यांना त्यांची पसंती आहे त्यात महाराष्ट्र अव्वल आहे. कोणताही बडा उद्योग एखाद्या देशात वा राज्यात गुंतवणूक करताना नेतृत्वाची विश्वासार्हता, पायाभूत सुविधांची गुणवत्ता, एकूणच स्थैर्य कसे आहे हे निकष तपासते. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने गुंतवणूक मोठ्या प्रामणात यावी यासाठी स्वत: झोकून देऊन काम करणारे नेतृत्व मिळाले आहे, त्यांच्या कार्यालयाचा त्या दृष्टीने प्रचंड फॉलोअप असतो. सीओडीबी म्हणजे कॉस्ट ऑफ डुइंग बिझनेस हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचा अर्थ असा की गुंतवणूक करताना खर्ची होणारी रक्कम, सरकारकडून मिळणाऱ्या सवलती आणि गुंतवणुकीचा परतावा किती आहे याला उद्योग खूपच महत्त्व देतात, त्या दृष्टीनेही आज महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य आहे, म्हणूनच महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकMIDCएमआयडीसी